शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

महिनाभर सेवा बंद, तरीही ‘सक्तवसुली’!

By admin | Updated: January 5, 2016 00:37 IST

रिलायन्स इंटरनेट सेवेचा खेळखंडोबा सुरुच; तक्रार करूनही बिलांत सूट नाहीच

 नाशिक : रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या इंटरनेटसेवेचा खेळखंडोबा गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरूच असून त्यात दिवसेंदिवस नव्याने भर पडत आहे. येथील खुटवडनगर, वावरेनगर, कामटवाडा भागात महिनाभरापेक्षाही अधिक काळ रिलायन्सची इंटरनेट सेवा बंद असतानाही त्या कालावधीतील हजारो रुपयांची बिले कंपनीतर्फे नुकतीच पाठविण्यात आली आहेत. दोन महिन्यापूर्वीदेखील इंटरनेट सेवा महिनाभरापेक्षाही अधिक काळ बंद होती. त्यावेळीही ग्राहकांना पूर्ण रकमेची बिले पाठविण्यात आली होती. कंपनीकडूनच सेवा बंद असतानाही बिलवसुली करणे ही फसवणूक असल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली असून अनेकांनी त्यांसदर्भात कंपनीकडे तशा तक्रारीही केल्या आहेत, मात्र अद्याप त्याची दखल घेतली गेलेली नाही.तक्रार करणाऱ्या ग्राहकांना, सेवा बंद असलेल्या कालावधीतील बिल माफ करण्याचे आश्वासन कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असले तरी यासंदर्भातली मेख अशी की, ज्या ग्राहकांनी रिलायन्सच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राकडे (आॅनलाइन कस्टमर केअर सेंटर) आपली तक्रार अथवा विनंती नोंदवली असेल त्यांनाच फक्त बिलात सूट मिळेल, असे सांगण्यात आले. तसेच इंटरनेट सेवा बंद असल्याची तक्रार ग्राहकांनी ज्या दिवशी केली, त्या दिवसापासूनच ही सूट मिळू शकेल असे कंपनीचे म्हणणे आहे. इंटरनेटची सेवा पूर्ववत सुरू होईल या आशेने ज्यांनी तक्रारच केली नाही, अशा ‘सोशिक’ ग्राहकांना मात्र सेवा बंद असूनही पूर्ण बिल भरावे लागेल किंवा तक्रार केल्याच्या तारखेपासून म्हणजेच मर्यादित सूट मिळेल! रिलायन्स इंटरनेटच्या खंडित सेवेमुळे परिसरातील ग्राहक वैतागले असून ज्यांनी वेगवान इंटरनेटसेवेच्या आश्वासनावर भविष्याचे आडाखे बांधले त्यांच्यावर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे. भलेमोठे आर्थिक नुकसान सोसून काहींना आपला ‘सायबर कॅफे’चा उद्योग गुंडाळावा लागला, तर रिलायन्स सेवेची ही गुणवत्ता पाहून काहींनी तो विचार ‘वेळीच’ सोडून दिला. सेवेत सुधारणा होत नसल्याने अनेकांनी आपली सेवाही बंद केली आहे. (प्रतिनिधी)