शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

बिबटे वाढले; पिंजरे कमी !

By admin | Updated: April 7, 2017 01:43 IST

बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे

 बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच तारुखेडले शिवारात एका पाचवर्षीय गुड्डी हांडगे या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निफाड तालुक्यात उसाबरोबरच मका, गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शंभर ते हजारो हेक्टरवर असलेल्या शेतीमुळे बिबट्यांना जणू कृत्रिम जंगलच मिळाले आहे. याबरोबरच परिसरात रानडुक्कर, कोल्ह्यांची संख्यादेखील जास्त असल्यामुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास व मुबलक अन्न-पाणी मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. चेहडी खुर्दपासून सायखेडा, गोदानगर तर थेट नांदूरमधमेश्वरपर्यंत संपूर्ण गोदाकाठावर बिबट्याच्या दहशतीची छाया अधिक गडद झाली आहे. उसाच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच बिबट्याची संख्यादेखील या भागात वाढू लागली आहे.प्रजननासाठी अत्यंत पोषक असे वातावरण व अधिवास उपलब्ध असल्यामुळे बिबटे या भागात सक्रिय झाले आहेत. कोल्हे, रानडुक्कर, गाय, बैल, वासरू, शेळ्या यांसारख्या जनावरांसह बिबट्यांकडून मानवालाही लक्ष्य केले जात असल्याने अवघा गोदाकाठ थरारला आहे. एकूणच वाढता मानव-बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी वनखात्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे; मात्र अपुरे पिंजरे आणि मनुष्यबळामुळे वनखात्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसत आहेत. बिबट्याचे वाढते हल्ले आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत येवला किंवा मनमाड येथून अंतर कापून निफाडच्या गोदाकाठावर पोहचणाऱ्या वनअधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाचा सामनाही करावा लागतो. निफाडच्या गोदाकाठावरून सातत्याने स्वतंत्र वनविभागाचे उपकार्यालय निफाडला स्थापन करावे व पुरेसे मनुष्यबळ व रेस्क्यू पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरत आहे, मात्र त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीही दिसून येणे साहजिक आहे. पिंजऱ्यांची संख्यादेखील अल्प असून, निफाड परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्यामुळे पिंजरेही या भागात वनविभागाने सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे. येवला वनपरिक्षेत्रामधील सहा ते सात कर्मचाऱ्यांवरच मनमाड व निफाड तालुक्याची दारोमदार नाशिक वनविभागाकडून (पूर्व) सोपविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहचताना त्रेधातिरपिट उडते. रेस्क्यू पथकाची स्वतंत्र रचना करून ‘निफाड फॉरेस्ट रेस्क्यू टीम’चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आता वाढल्याचे पंचक्रोशीच्या सरपंच व गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या वनविभागाकडून येवला वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांवरच ‘रेस्क्यू’ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून, कर्मचारी निफाड भागात असले तर येवला, ममदापूर, विसापूर, अंकाई, राजापूर या भागाची पंचाईत होते. या भागातही शेड्यूल एकमध्ये संरक्षित बिबट्या व काळवीट या वन्यजीवांचे वास्तव्य अधिक आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. निफाडचा गोदाकाठ परिसर यापूर्वी नाशिक वनविभाग पश्चिमच्या अखत्यारित होता; मात्र सहा महिन्यांपूर्वीच हा संपूर्ण परिसर नव्याने वनविभाग पूर्वकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.