शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बिबटे वाढले; पिंजरे कमी !

By admin | Updated: April 7, 2017 01:43 IST

बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे

 बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच तारुखेडले शिवारात एका पाचवर्षीय गुड्डी हांडगे या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निफाड तालुक्यात उसाबरोबरच मका, गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शंभर ते हजारो हेक्टरवर असलेल्या शेतीमुळे बिबट्यांना जणू कृत्रिम जंगलच मिळाले आहे. याबरोबरच परिसरात रानडुक्कर, कोल्ह्यांची संख्यादेखील जास्त असल्यामुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास व मुबलक अन्न-पाणी मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. चेहडी खुर्दपासून सायखेडा, गोदानगर तर थेट नांदूरमधमेश्वरपर्यंत संपूर्ण गोदाकाठावर बिबट्याच्या दहशतीची छाया अधिक गडद झाली आहे. उसाच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच बिबट्याची संख्यादेखील या भागात वाढू लागली आहे.प्रजननासाठी अत्यंत पोषक असे वातावरण व अधिवास उपलब्ध असल्यामुळे बिबटे या भागात सक्रिय झाले आहेत. कोल्हे, रानडुक्कर, गाय, बैल, वासरू, शेळ्या यांसारख्या जनावरांसह बिबट्यांकडून मानवालाही लक्ष्य केले जात असल्याने अवघा गोदाकाठ थरारला आहे. एकूणच वाढता मानव-बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी वनखात्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे; मात्र अपुरे पिंजरे आणि मनुष्यबळामुळे वनखात्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसत आहेत. बिबट्याचे वाढते हल्ले आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत येवला किंवा मनमाड येथून अंतर कापून निफाडच्या गोदाकाठावर पोहचणाऱ्या वनअधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाचा सामनाही करावा लागतो. निफाडच्या गोदाकाठावरून सातत्याने स्वतंत्र वनविभागाचे उपकार्यालय निफाडला स्थापन करावे व पुरेसे मनुष्यबळ व रेस्क्यू पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरत आहे, मात्र त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीही दिसून येणे साहजिक आहे. पिंजऱ्यांची संख्यादेखील अल्प असून, निफाड परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्यामुळे पिंजरेही या भागात वनविभागाने सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे. येवला वनपरिक्षेत्रामधील सहा ते सात कर्मचाऱ्यांवरच मनमाड व निफाड तालुक्याची दारोमदार नाशिक वनविभागाकडून (पूर्व) सोपविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहचताना त्रेधातिरपिट उडते. रेस्क्यू पथकाची स्वतंत्र रचना करून ‘निफाड फॉरेस्ट रेस्क्यू टीम’चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आता वाढल्याचे पंचक्रोशीच्या सरपंच व गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या वनविभागाकडून येवला वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांवरच ‘रेस्क्यू’ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून, कर्मचारी निफाड भागात असले तर येवला, ममदापूर, विसापूर, अंकाई, राजापूर या भागाची पंचाईत होते. या भागातही शेड्यूल एकमध्ये संरक्षित बिबट्या व काळवीट या वन्यजीवांचे वास्तव्य अधिक आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. निफाडचा गोदाकाठ परिसर यापूर्वी नाशिक वनविभाग पश्चिमच्या अखत्यारित होता; मात्र सहा महिन्यांपूर्वीच हा संपूर्ण परिसर नव्याने वनविभाग पूर्वकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.