शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

बिबटे वाढले; पिंजरे कमी !

By admin | Updated: April 7, 2017 01:43 IST

बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे

 बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच तारुखेडले शिवारात एका पाचवर्षीय गुड्डी हांडगे या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निफाड तालुक्यात उसाबरोबरच मका, गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शंभर ते हजारो हेक्टरवर असलेल्या शेतीमुळे बिबट्यांना जणू कृत्रिम जंगलच मिळाले आहे. याबरोबरच परिसरात रानडुक्कर, कोल्ह्यांची संख्यादेखील जास्त असल्यामुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास व मुबलक अन्न-पाणी मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. चेहडी खुर्दपासून सायखेडा, गोदानगर तर थेट नांदूरमधमेश्वरपर्यंत संपूर्ण गोदाकाठावर बिबट्याच्या दहशतीची छाया अधिक गडद झाली आहे. उसाच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच बिबट्याची संख्यादेखील या भागात वाढू लागली आहे.प्रजननासाठी अत्यंत पोषक असे वातावरण व अधिवास उपलब्ध असल्यामुळे बिबटे या भागात सक्रिय झाले आहेत. कोल्हे, रानडुक्कर, गाय, बैल, वासरू, शेळ्या यांसारख्या जनावरांसह बिबट्यांकडून मानवालाही लक्ष्य केले जात असल्याने अवघा गोदाकाठ थरारला आहे. एकूणच वाढता मानव-बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी वनखात्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे; मात्र अपुरे पिंजरे आणि मनुष्यबळामुळे वनखात्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसत आहेत. बिबट्याचे वाढते हल्ले आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत येवला किंवा मनमाड येथून अंतर कापून निफाडच्या गोदाकाठावर पोहचणाऱ्या वनअधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाचा सामनाही करावा लागतो. निफाडच्या गोदाकाठावरून सातत्याने स्वतंत्र वनविभागाचे उपकार्यालय निफाडला स्थापन करावे व पुरेसे मनुष्यबळ व रेस्क्यू पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरत आहे, मात्र त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीही दिसून येणे साहजिक आहे. पिंजऱ्यांची संख्यादेखील अल्प असून, निफाड परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्यामुळे पिंजरेही या भागात वनविभागाने सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे. येवला वनपरिक्षेत्रामधील सहा ते सात कर्मचाऱ्यांवरच मनमाड व निफाड तालुक्याची दारोमदार नाशिक वनविभागाकडून (पूर्व) सोपविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहचताना त्रेधातिरपिट उडते. रेस्क्यू पथकाची स्वतंत्र रचना करून ‘निफाड फॉरेस्ट रेस्क्यू टीम’चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आता वाढल्याचे पंचक्रोशीच्या सरपंच व गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या वनविभागाकडून येवला वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांवरच ‘रेस्क्यू’ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून, कर्मचारी निफाड भागात असले तर येवला, ममदापूर, विसापूर, अंकाई, राजापूर या भागाची पंचाईत होते. या भागातही शेड्यूल एकमध्ये संरक्षित बिबट्या व काळवीट या वन्यजीवांचे वास्तव्य अधिक आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. निफाडचा गोदाकाठ परिसर यापूर्वी नाशिक वनविभाग पश्चिमच्या अखत्यारित होता; मात्र सहा महिन्यांपूर्वीच हा संपूर्ण परिसर नव्याने वनविभाग पूर्वकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.