शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

बिबटे वाढले; पिंजरे कमी !

By admin | Updated: April 7, 2017 01:43 IST

बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे

 बागायती तालुका म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्ह्यातील निफाडमधील गोदाकाठावर मानव-बिबट्याचा संघर्ष अद्यापही ‘जैसे थे’ असून, दिवसेंदिवस हा संघर्ष अधिक गंभीर बनला आहे. दोन दिवसांपूर्वीच तारुखेडले शिवारात एका पाचवर्षीय गुड्डी हांडगे या बालिकेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने हा संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. निफाड तालुक्यात उसाबरोबरच मका, गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. शंभर ते हजारो हेक्टरवर असलेल्या शेतीमुळे बिबट्यांना जणू कृत्रिम जंगलच मिळाले आहे. याबरोबरच परिसरात रानडुक्कर, कोल्ह्यांची संख्यादेखील जास्त असल्यामुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास व मुबलक अन्न-पाणी मिळत असल्याने बिबट्यांचा वावर वाढला आहे. चेहडी खुर्दपासून सायखेडा, गोदानगर तर थेट नांदूरमधमेश्वरपर्यंत संपूर्ण गोदाकाठावर बिबट्याच्या दहशतीची छाया अधिक गडद झाली आहे. उसाच्या वाढत्या उत्पादनाबरोबरच बिबट्याची संख्यादेखील या भागात वाढू लागली आहे.प्रजननासाठी अत्यंत पोषक असे वातावरण व अधिवास उपलब्ध असल्यामुळे बिबटे या भागात सक्रिय झाले आहेत. कोल्हे, रानडुक्कर, गाय, बैल, वासरू, शेळ्या यांसारख्या जनावरांसह बिबट्यांकडून मानवालाही लक्ष्य केले जात असल्याने अवघा गोदाकाठ थरारला आहे. एकूणच वाढता मानव-बिबट्याचा संघर्ष कमी करण्यासाठी वनखात्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे; मात्र अपुरे पिंजरे आणि मनुष्यबळामुळे वनखात्याचे प्रयत्न तोकडे पडत असल्याचे दिसत आहेत. बिबट्याचे वाढते हल्ले आणि दुर्दैवी घटना घडल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत येवला किंवा मनमाड येथून अंतर कापून निफाडच्या गोदाकाठावर पोहचणाऱ्या वनअधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेकदा नागरिकांच्या रोषाचा सामनाही करावा लागतो. निफाडच्या गोदाकाठावरून सातत्याने स्वतंत्र वनविभागाचे उपकार्यालय निफाडला स्थापन करावे व पुरेसे मनुष्यबळ व रेस्क्यू पथक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावे, अशी मागणी जोर धरत आहे, मात्र त्यांच्या मागणीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीही दिसून येणे साहजिक आहे. पिंजऱ्यांची संख्यादेखील अल्प असून, निफाड परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्यामुळे पिंजरेही या भागात वनविभागाने सज्ज ठेवणे गरजेचे असल्याचे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे. येवला वनपरिक्षेत्रामधील सहा ते सात कर्मचाऱ्यांवरच मनमाड व निफाड तालुक्याची दारोमदार नाशिक वनविभागाकडून (पूर्व) सोपविण्यात आली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी पोहचताना त्रेधातिरपिट उडते. रेस्क्यू पथकाची स्वतंत्र रचना करून ‘निफाड फॉरेस्ट रेस्क्यू टीम’चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आता वाढल्याचे पंचक्रोशीच्या सरपंच व गावकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या वनविभागाकडून येवला वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांवरच ‘रेस्क्यू’ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण निर्माण होत असून, कर्मचारी निफाड भागात असले तर येवला, ममदापूर, विसापूर, अंकाई, राजापूर या भागाची पंचाईत होते. या भागातही शेड्यूल एकमध्ये संरक्षित बिबट्या व काळवीट या वन्यजीवांचे वास्तव्य अधिक आहे. त्यांच्या संवर्धन व संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. निफाडचा गोदाकाठ परिसर यापूर्वी नाशिक वनविभाग पश्चिमच्या अखत्यारित होता; मात्र सहा महिन्यांपूर्वीच हा संपूर्ण परिसर नव्याने वनविभाग पूर्वकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.