शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

दोन वर्षांपासून सुरू आहेत रस्त्यांची कामे !

By admin | Updated: June 10, 2017 00:20 IST

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत दहा लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून अंतर्गत रस्ते बनविण्याची कामे सुरू आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्ककनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी येथे ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत दहा लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेतर्फे गेल्या दोन वर्षांपासून अंतर्गत रस्ते बनविण्याची कामे सुरू आहेत. दारांसमोर खडीचे ढीग अनेक दिवसांपासून पडून असल्याने व अगदी धिम्या गतीने काम होत असल्याने ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडून ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत गावातील रस्ते खडीकरणासह डांबरीकरण करण्यात येत आहेत. गावात खडी टाकण्यात आलेली आहे. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींनंतर काही रस्त्यांच्या खडीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र डांबरीकरणाच्या कामाला सदर ठेकेदाराने पूर्णविराम दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या घरांसमोर खडीचे ढीग अनेक दिवसांपासून पडून असून, ग्रमास्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. घरासमोर खडीचे ढीग पडून असल्याने पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याची भीती ग्रामस्थांमधून व्यस्त केली जात आहे. सदर काम पावसाच्या आधी पूर्ण करण्याबाबत ठेकेदारास वारंवार विनंती करून तो याकडे कामाकडे दुर्लक्ष करत आहे. गाव अंतर्गत रस्ते वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या अर्धवट खडीकरण झालेल्या रस्त्यांवरून प्रवास करणे अवघड झाले आहे. सदर कामाला सुरुवात होऊन दोन वर्षे झाली मात्र जिल्हा परिषदचे अधिकारी व लोकप्रतिनिधी या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे. धिम्या गदीने होत असलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. डांबरीकरणाचे काम लवकर सुरू करून पूर्ण करावे, अशी मागणी अशोक बोरसे, राकेश गोविंद, केदा वाघ, गंगाधर पवार, अशोक वाघ, सोहन महाजन, गोविंद वाघ, ज्ञानेश्वर वाघ, नारायण वाघ, बापू वाघ, भावडू भालेराव, आप्पा भालेराव, बापू जाधव, श्यामकांत जाधव, गोरख बोरसे, संजय बागुल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.