शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

पावसाअभावी जलाशये कोरडीच

By admin | Updated: October 6, 2015 22:13 IST

पूर्व बागलाण : काटवन परिसरात लाखो रुपये खर्च करून केलेल्या शेततळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष

सटाणा : बागलाण तालुक्यातील पूर्व भाग, करंजाडी खोरे आणि काटवन भागातील जलाशये यंदा पावसाअभावी कोरडीठाक आहेत. लाखो रुपये खर्च करून शेततळ्यांच्या माध्यमातून उभारलेल्या पाण्याच्या बँकांमध्ये खडखडाट आहे. त्यामुळे रब्बीला मुकावे तर लागणारच परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आजच भटकंती करावी लागत असल्याचे भयावह चित्र आहे. दरम्यान, पश्चिम पट्ट्यात भाताचे पीक जोमात असताना पावसाने ओढ दिल्याने पीक करपून उत्पादनात घट होणार आहे.टंचाईवर मात करण्यासाठी व कमी पाण्यात पिके घेता यावीत म्हणून शासनाने पाण्याची हक्काची बँक तयार व्हावी यासाठी शेततळ्यांची संकल्पना पुढे आणली. प्रोत्साहन म्हणून विविध योजनांमधून शेततळी उभारण्यासाठी अनुदानही दिले. त्याचा लाभ घेत कायमस्वरूपी टंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा बागलाणचा पूर्व भाग, काटवन व करंजाडी खोरे या भागातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उभारणीवर भर दिला. चौगाव, कऱ्हे, अजमिर सौंदाणे, देवळाणे, सुराणे, वायगाव, सारदे, रातीर, रामतीर, कूपखेडा, खिरमानी, फोपीर, शेमळी, काकडगाव, चिराई, महड, राहुड, बिलपुरी, टेंभे, तळवाडे भामेर, इजमाणे या गावांमध्ये शेततळी उभारली आहेत. यंदा मात्र यात खडखडाट दिसून येत आहे. दरवर्षी या भागातील शेतकरी नदीतील पूरपाणी अथवा जवळपास भरलेल्या पाझर तलावातून शेततळे भरून पीक लागवडीचे नियोजन करतात. यंदा अपुऱ्या पावसामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांसह दसाणे व पठावा हे लघुप्रकल्प वगळता जाखोड, रातीर , तळवाडे भामेर, बोढरी, रातीर, कऱ्हे, शेमळी, दोधेश्वर, टिंगरी, सुराने, चिराई येथील लघुप्रकल्प कोरडेच आहेत. मोसम, करंजाडी, आरम, दोध्याड या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत न पोहचल्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शेततळे भरण्यासाठी असलेले पाण्याचे स्रोतच कोरडेठाक असल्यामुळे हक्काच्या पाणी बँक रित्याच राहणार आहेत. या भीषण परिस्थितीमुळे यंदा रब्बी हंगामावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. या साठवलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी डाळींब व उन्हाळी कांद्याचे पीक काढत असतो. पाण्याअभावी या भागातील सात ते आठ हजार हेक्टर शेती ओस पडून कांद्याबरोबरच डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. (वार्ताहर)