शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी जलाशये कोरडीच

By admin | Updated: October 6, 2015 22:13 IST

पूर्व बागलाण : काटवन परिसरात लाखो रुपये खर्च करून केलेल्या शेततळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष

सटाणा : बागलाण तालुक्यातील पूर्व भाग, करंजाडी खोरे आणि काटवन भागातील जलाशये यंदा पावसाअभावी कोरडीठाक आहेत. लाखो रुपये खर्च करून शेततळ्यांच्या माध्यमातून उभारलेल्या पाण्याच्या बँकांमध्ये खडखडाट आहे. त्यामुळे रब्बीला मुकावे तर लागणारच परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आजच भटकंती करावी लागत असल्याचे भयावह चित्र आहे. दरम्यान, पश्चिम पट्ट्यात भाताचे पीक जोमात असताना पावसाने ओढ दिल्याने पीक करपून उत्पादनात घट होणार आहे.टंचाईवर मात करण्यासाठी व कमी पाण्यात पिके घेता यावीत म्हणून शासनाने पाण्याची हक्काची बँक तयार व्हावी यासाठी शेततळ्यांची संकल्पना पुढे आणली. प्रोत्साहन म्हणून विविध योजनांमधून शेततळी उभारण्यासाठी अनुदानही दिले. त्याचा लाभ घेत कायमस्वरूपी टंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा बागलाणचा पूर्व भाग, काटवन व करंजाडी खोरे या भागातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उभारणीवर भर दिला. चौगाव, कऱ्हे, अजमिर सौंदाणे, देवळाणे, सुराणे, वायगाव, सारदे, रातीर, रामतीर, कूपखेडा, खिरमानी, फोपीर, शेमळी, काकडगाव, चिराई, महड, राहुड, बिलपुरी, टेंभे, तळवाडे भामेर, इजमाणे या गावांमध्ये शेततळी उभारली आहेत. यंदा मात्र यात खडखडाट दिसून येत आहे. दरवर्षी या भागातील शेतकरी नदीतील पूरपाणी अथवा जवळपास भरलेल्या पाझर तलावातून शेततळे भरून पीक लागवडीचे नियोजन करतात. यंदा अपुऱ्या पावसामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांसह दसाणे व पठावा हे लघुप्रकल्प वगळता जाखोड, रातीर , तळवाडे भामेर, बोढरी, रातीर, कऱ्हे, शेमळी, दोधेश्वर, टिंगरी, सुराने, चिराई येथील लघुप्रकल्प कोरडेच आहेत. मोसम, करंजाडी, आरम, दोध्याड या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत न पोहचल्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शेततळे भरण्यासाठी असलेले पाण्याचे स्रोतच कोरडेठाक असल्यामुळे हक्काच्या पाणी बँक रित्याच राहणार आहेत. या भीषण परिस्थितीमुळे यंदा रब्बी हंगामावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. या साठवलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी डाळींब व उन्हाळी कांद्याचे पीक काढत असतो. पाण्याअभावी या भागातील सात ते आठ हजार हेक्टर शेती ओस पडून कांद्याबरोबरच डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. (वार्ताहर)