शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

पावसाअभावी जलाशये कोरडीच

By admin | Updated: October 6, 2015 22:13 IST

पूर्व बागलाण : काटवन परिसरात लाखो रुपये खर्च करून केलेल्या शेततळ्यात पाण्याचे दुर्भिक्ष

सटाणा : बागलाण तालुक्यातील पूर्व भाग, करंजाडी खोरे आणि काटवन भागातील जलाशये यंदा पावसाअभावी कोरडीठाक आहेत. लाखो रुपये खर्च करून शेततळ्यांच्या माध्यमातून उभारलेल्या पाण्याच्या बँकांमध्ये खडखडाट आहे. त्यामुळे रब्बीला मुकावे तर लागणारच परंतु पिण्याच्या पाण्यासाठी आजच भटकंती करावी लागत असल्याचे भयावह चित्र आहे. दरम्यान, पश्चिम पट्ट्यात भाताचे पीक जोमात असताना पावसाने ओढ दिल्याने पीक करपून उत्पादनात घट होणार आहे.टंचाईवर मात करण्यासाठी व कमी पाण्यात पिके घेता यावीत म्हणून शासनाने पाण्याची हक्काची बँक तयार व्हावी यासाठी शेततळ्यांची संकल्पना पुढे आणली. प्रोत्साहन म्हणून विविध योजनांमधून शेततळी उभारण्यासाठी अनुदानही दिले. त्याचा लाभ घेत कायमस्वरूपी टंचाईग्रस्त भाग म्हणून ओळखला जाणारा बागलाणचा पूर्व भाग, काटवन व करंजाडी खोरे या भागातील शेतकऱ्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उभारणीवर भर दिला. चौगाव, कऱ्हे, अजमिर सौंदाणे, देवळाणे, सुराणे, वायगाव, सारदे, रातीर, रामतीर, कूपखेडा, खिरमानी, फोपीर, शेमळी, काकडगाव, चिराई, महड, राहुड, बिलपुरी, टेंभे, तळवाडे भामेर, इजमाणे या गावांमध्ये शेततळी उभारली आहेत. यंदा मात्र यात खडखडाट दिसून येत आहे. दरवर्षी या भागातील शेतकरी नदीतील पूरपाणी अथवा जवळपास भरलेल्या पाझर तलावातून शेततळे भरून पीक लागवडीचे नियोजन करतात. यंदा अपुऱ्या पावसामुळे हरणबारी, केळझर या मध्यम प्रकल्पांसह दसाणे व पठावा हे लघुप्रकल्प वगळता जाखोड, रातीर , तळवाडे भामेर, बोढरी, रातीर, कऱ्हे, शेमळी, दोधेश्वर, टिंगरी, सुराने, चिराई येथील लघुप्रकल्प कोरडेच आहेत. मोसम, करंजाडी, आरम, दोध्याड या नद्यांना आलेल्या पुराचे पाणी शेवटच्या टोकापर्यंत न पोहचल्यामुळे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शेततळे भरण्यासाठी असलेले पाण्याचे स्रोतच कोरडेठाक असल्यामुळे हक्काच्या पाणी बँक रित्याच राहणार आहेत. या भीषण परिस्थितीमुळे यंदा रब्बी हंगामावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. या साठवलेल्या पाण्यावर या भागातील शेतकरी डाळींब व उन्हाळी कांद्याचे पीक काढत असतो. पाण्याअभावी या भागातील सात ते आठ हजार हेक्टर शेती ओस पडून कांद्याबरोबरच डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. (वार्ताहर)