शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

शासकीय समन्वयातून नियमित कांदा लिलाव सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:24 IST

नाशिक : जगात दुस-या क्रमांकाचे कांदा उत्पादन घेणाºया भारतात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून कांदा निर्यात व देशांतर्गत विक्रीवर कमालीचे निर्बंध आले आहेत. त्यामुळे सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असून, देशातील क्रमांक एकवर उत्पादन घेणा-या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विविध बाजार समित्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत सरकार व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूर्वीप्रमाणेच नियमित लिलाव सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

नाशिक : जगात दुस-या क्रमांकाचे कांदा उत्पादन घेणाºया भारतात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून कांदा निर्यात व देशांतर्गत विक्रीवर कमालीचे निर्बंध आले आहेत. त्यामुळे सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असून, देशातील क्रमांक एकवर उत्पादन घेणा-या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विविध बाजार समित्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत सरकार व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूर्वीप्रमाणेच नियमित लिलाव सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.कोरोनामुळे देशातील शेतमाल विक्री व्यवस्था कोलमडल्याने सर्वच शेतमालाची निर्यात व विक्री प्रभावित झालेली आहे. याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकºयांना बसला आहे. परंतु, वर्षानुवर्षे देशाला निर्यातीतून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन व बाजार समित्यांना लाखो, करोडो रुपयांचा महसूल मिळवून देणाºया कांदा उत्पादकांच्या पाठीशी या संकटाच्या काळात केंद्रातील, राज्यातील सरकार, बाजार समित्यांचे सत्ताधारी, व्यापारी व निर्यातदार यापैकी कोणीही खंबीरपणे उभे नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केला आहे. सरकारी यंत्रणा व बाजार समिती सत्ताधाºयांच्या अशा अनास्थेमुळे कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, अहमदनगर, जळगाव, धुळे यासोबत सर्वच बाजार समित्यांनी सरकार व आरोग्य खात्यासोबत समन्वय साधत कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम व निकष यांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील कांदा लिलाव पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.कोट -कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री सुरू राहून एकदाच होणारी कांदा आवक थांबण्यास मदत होऊन उत्पादकांचे आर्थिक नुकसान टाळता येईल. कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असल्याने या पिकाचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना सरकारने कृषी विभाग, नाफेड व पणन विभागाच्या माध्यमातून एक स्वतंत्र रोडमॅप तयार करून देशभरात कांदाविक्री व्यवस्था सुरळीतपणे होण्यासाठी पुढील काही महिन्यांचे कांदा विक्री व्यवस्थापन करावे.- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

 

टॅग्स :Nashikनाशिक