शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
4
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
5
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
6
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
7
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
8
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
9
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
11
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
12
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
13
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
14
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
15
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
16
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
17
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
18
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
19
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
20
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?

शासकीय समन्वयातून नियमित कांदा लिलाव सुरू करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:24 IST

नाशिक : जगात दुस-या क्रमांकाचे कांदा उत्पादन घेणाºया भारतात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून कांदा निर्यात व देशांतर्गत विक्रीवर कमालीचे निर्बंध आले आहेत. त्यामुळे सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असून, देशातील क्रमांक एकवर उत्पादन घेणा-या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विविध बाजार समित्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत सरकार व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूर्वीप्रमाणेच नियमित लिलाव सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

नाशिक : जगात दुस-या क्रमांकाचे कांदा उत्पादन घेणाºया भारतात कोरोनाचा फैलाव झाल्यामुळे मागील काही दिवसांपासून कांदा निर्यात व देशांतर्गत विक्रीवर कमालीचे निर्बंध आले आहेत. त्यामुळे सातत्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असून, देशातील क्रमांक एकवर उत्पादन घेणा-या महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील विविध बाजार समित्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत सरकार व आरोग्य विभागाच्या समन्वयातून पूर्वीप्रमाणेच नियमित लिलाव सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेतर्फे करण्यात आली आहे.कोरोनामुळे देशातील शेतमाल विक्री व्यवस्था कोलमडल्याने सर्वच शेतमालाची निर्यात व विक्री प्रभावित झालेली आहे. याचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकºयांना बसला आहे. परंतु, वर्षानुवर्षे देशाला निर्यातीतून कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन व बाजार समित्यांना लाखो, करोडो रुपयांचा महसूल मिळवून देणाºया कांदा उत्पादकांच्या पाठीशी या संकटाच्या काळात केंद्रातील, राज्यातील सरकार, बाजार समित्यांचे सत्ताधारी, व्यापारी व निर्यातदार यापैकी कोणीही खंबीरपणे उभे नसल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केला आहे. सरकारी यंत्रणा व बाजार समिती सत्ताधाºयांच्या अशा अनास्थेमुळे कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये प्रचंड संतापाची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, अहमदनगर, जळगाव, धुळे यासोबत सर्वच बाजार समित्यांनी सरकार व आरोग्य खात्यासोबत समन्वय साधत कोरोना प्रतिबंधात्मक सर्व नियम व निकष यांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील कांदा लिलाव पूर्वीप्रमाणेच सुरळीत सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केले आहे.कोट -कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री सुरू राहून एकदाच होणारी कांदा आवक थांबण्यास मदत होऊन उत्पादकांचे आर्थिक नुकसान टाळता येईल. कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत असल्याने या पिकाचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना सरकारने कृषी विभाग, नाफेड व पणन विभागाच्या माध्यमातून एक स्वतंत्र रोडमॅप तयार करून देशभरात कांदाविक्री व्यवस्था सुरळीतपणे होण्यासाठी पुढील काही महिन्यांचे कांदा विक्री व्यवस्थापन करावे.- भारत दिघोळे, संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

 

टॅग्स :Nashikनाशिक