शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

‘अन्नसुरक्षे’ची धुरा रेशन दुकानदारांच्या हाती

By admin | Updated: October 6, 2015 23:25 IST

सर्वेक्षण : गरजवंताला धान्य देण्याची तयारी

नाशिक : केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा धोरणात गरजवंताला स्वस्त दरात रेशनवर धान्य मिळावे अशी तरतूद असल्याने अशा गरजवंतांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने आता चक्क रेशन दुकानदारांमार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करण्याचा व त्याची पडताळणी तलाठ्यांकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज नसलेल्यांना रेशन नाकारण्याचा व त्या जागी खऱ्या गरजवंताला न्याय देण्याची पुरवठा खात्याची भूमिका स्तुत्य असली तरी, ज्या दुकानदारांचे भवितव्य शिधापत्रिकाधारकांवर अवलंबून आहे, त्यांच्याकरवी केल्या जाणाऱ्या मूल्यमापनाची सत्यता किती असेल व तलाठ्यांकडून खरोखरीच घरोघरी जाऊन त्याची पडताळणी केली जाईल काय याविषयी साशंकता असल्याने अखेर रेशन दुकानदार ठरवतील त्यालाच न्याय मिळणार आहे. अन्नसुरक्षा कायद्यान्वये शहरी भागात ७७ टक्के व ग्रामीण भागात ४६ टक्के नागरिकांना प्राधान्य कुटुंबात समावेश करून त्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ देण्याची तरतूद आहे व त्यासाठी आर्थिक निकषही महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्यावेळी ही योजना लागू करण्यात आली त्यावेळी यंत्रणेने आपल्या मर्जीनुसारच प्राधान्य कुटुंब ठरविले, परिणामी ज्यांना खरोखर गरज होती ते डावलले गेले, तर सधन कुटुंबीयांना याचा लाभ मिळाल्याची ओरड करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून हा सारा प्रकार सुरू असला तरी, जिल्हा पुरवठा कार्यालयाने आपल्याच अखत्यारित आता या योजनेसाठी पात्र ठरू पाहणाऱ्यांचा शोध घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी ज्याच्याकडे स्वत:चे वन बीएचके म्हणजे शयनगृह, हॉल व स्वयंपाकघर मालकीचे असेल व कुटुंबीयांसमवेत चारचाकीत जो फिरत असेल अशांना प्राधान्य कुटुंबातून म्हणजे स्वस्त दरात रेशन देण्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी सर्व रेशन दुकानदारांची बैठक घेण्यात आली असून, त्यांना विहित नमुन्यातील अर्ज देण्यात येऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांची माहिती येत्या आठ दिवसांत गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेशन दुकानदार देणाऱ्या माहितीची तलाठ्यांमार्फत खातरजमा करण्यात येईल, असेही ठरविण्यात आले आहे.