शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

‘अन्नसुरक्षे’ची धुरा रेशन दुकानदारांच्या हाती

By admin | Updated: October 6, 2015 23:25 IST

सर्वेक्षण : गरजवंताला धान्य देण्याची तयारी

नाशिक : केंद्र सरकारच्या अन्नसुरक्षा धोरणात गरजवंताला स्वस्त दरात रेशनवर धान्य मिळावे अशी तरतूद असल्याने अशा गरजवंतांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने आता चक्क रेशन दुकानदारांमार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांच्या आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करण्याचा व त्याची पडताळणी तलाठ्यांकडून करण्याचा निर्णय घेतला आहे. गरज नसलेल्यांना रेशन नाकारण्याचा व त्या जागी खऱ्या गरजवंताला न्याय देण्याची पुरवठा खात्याची भूमिका स्तुत्य असली तरी, ज्या दुकानदारांचे भवितव्य शिधापत्रिकाधारकांवर अवलंबून आहे, त्यांच्याकरवी केल्या जाणाऱ्या मूल्यमापनाची सत्यता किती असेल व तलाठ्यांकडून खरोखरीच घरोघरी जाऊन त्याची पडताळणी केली जाईल काय याविषयी साशंकता असल्याने अखेर रेशन दुकानदार ठरवतील त्यालाच न्याय मिळणार आहे. अन्नसुरक्षा कायद्यान्वये शहरी भागात ७७ टक्के व ग्रामीण भागात ४६ टक्के नागरिकांना प्राधान्य कुटुंबात समावेश करून त्यांना दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ देण्याची तरतूद आहे व त्यासाठी आर्थिक निकषही महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्यावेळी ही योजना लागू करण्यात आली त्यावेळी यंत्रणेने आपल्या मर्जीनुसारच प्राधान्य कुटुंब ठरविले, परिणामी ज्यांना खरोखर गरज होती ते डावलले गेले, तर सधन कुटुंबीयांना याचा लाभ मिळाल्याची ओरड करण्यात आली होती. गेल्या तीन वर्षांपासून हा सारा प्रकार सुरू असला तरी, जिल्हा पुरवठा कार्यालयाने आपल्याच अखत्यारित आता या योजनेसाठी पात्र ठरू पाहणाऱ्यांचा शोध घेण्याचे ठरविले असून, त्यासाठी ज्याच्याकडे स्वत:चे वन बीएचके म्हणजे शयनगृह, हॉल व स्वयंपाकघर मालकीचे असेल व कुटुंबीयांसमवेत चारचाकीत जो फिरत असेल अशांना प्राधान्य कुटुंबातून म्हणजे स्वस्त दरात रेशन देण्यातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मंगळवारी सर्व रेशन दुकानदारांची बैठक घेण्यात आली असून, त्यांना विहित नमुन्यातील अर्ज देण्यात येऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील शिधापत्रिकाधारकांची माहिती येत्या आठ दिवसांत गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेशन दुकानदार देणाऱ्या माहितीची तलाठ्यांमार्फत खातरजमा करण्यात येईल, असेही ठरविण्यात आले आहे.