शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
2
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
3
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
4
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
5
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
6
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
7
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
8
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
9
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
10
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
11
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
12
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
13
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
14
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
15
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
16
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
17
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
18
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
19
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
20
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...

वेधकाळातही बांधता येईल भाऊरायाला राखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 01:04 IST

नाशिक : येत्या सोमवार, दि. ७ आॅगस्ट रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी नारळीपौर्णिमा असल्याने ग्रहणाच्या वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. परंतु, चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाला कोणताही अडसर नसून वेधकाळातही रात्री १० वाजेपर्यंत राख्या बांधता येणार असल्याचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : येत्या सोमवार, दि. ७ आॅगस्ट रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण असून, त्याच दिवशी नारळीपौर्णिमा असल्याने ग्रहणाच्या वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करता येईल किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे. परंतु, चंद्रग्रहणाचा रक्षाबंधनाला कोणताही अडसर नसून वेधकाळातही रात्री १० वाजेपर्यंत राख्या बांधता येणार असल्याचे दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी स्पष्ट केले आहे. वेधकाळात रक्षाबंधनाबाबत अनेक गैरसमज असल्याने सण साजरा करण्याबाबत महिलांमध्ये संभ्रमावस्था आहे.सोमवार, दि. ७ रोजी भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. सोमवारी सायंकाळी ६.५४ वाजता चंद्रोदय होणार असून, त्यावेळी चंद्रबिंब ९९.६ टक्के असेल. त्यानंतर रात्री १०.५२ वाजता खंडग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्शकाळ सुरू होईल. ग्रहणाचा मध्यकाळ हा रात्री ११.५१ वाजता असून, त्यावेळी चंद्रबिंबाचा २४.६ टक्के भाग पृथ्वीच्या छायेत आलेला असेल. रात्री १२.४९ वाजता मोक्षकाळ आहे, त्यावेळी ग्रहण सुटेल.सोमवारी रात्री १०.५२ ते १२.४९ वाजेपर्यंत ग्रहण पर्वकाळ असल्याने आणि ग्रहण रात्रीच्या दुसºया प्रहरात असल्याने ३ प्रहर आधीच म्हणजे दुपारी १ वाजेपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेधकाळ आहे. चंद्रग्रहण आणि नारळीपौर्णिमा तथा राखीपौर्णिमा एकाच दिवशी आल्याने वेधकाळात रक्षाबंधनाचा सण साजरा करावा किंवा नाही, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.परंतु, वेधकाळात रक्षाबंधन साजरा करण्यास कोणताही अडसर नसल्याचे पंचांगकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. रात्री १० वाजेपर्यंत बहिणींना आपल्या लाडक्या भावाला राख्या बांधता येणार असल्याचे पंचांगकर्त्यांनी म्हटले आहे. रक्षाबंधन साजरा करताना पंचांग आणि मुहूर्तदेखील अनेकजण महत्त्वाचा मानतात. त्यामुळे पंचांगकर्त्यांनी सांगितल्यानुसार वेधकाळातही राखी बांधण्यास अडसर नाही.नऊ वर्षांनंतर श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण सोमवार, दिनांक ७ आॅगस्ट रोजी चंद्रग्रहण आहे. रात्री १०.५२ ते १२.४९ ग्रहण पर्वकाळ असून, या ग्रहणाचा वेध दुपारी १ पासून आहे. त्यामुळे दुपारी १ वाजेपूर्वी घरातील सर्वांचे भोजन होईल, अशा पद्धतीने कुलधर्म कुलाचार निमित्ताचे पूजन करावे. सोमवारचा उपवास असल्यास दुपारी १ पूर्वी फलाहार करून वेधात सायंकाळी सोमवारची पूजा करून उपवास सोडीत आहे, असा संकल्प करून नुसते तीर्थ घेणे योग्य होईल. कारण वेधात भोजन निषेध आहे मात्र जलपान निषेध नाही. वेधकाळात रक्षाबंधन करता येत असल्याने रात्री १० पर्यंत राखी बांधता येईल. यापूर्वी ६ आॅगस्ट १९९० रोजी श्रावण पौर्णिमेस सोमवारी चंद्रग्रहण होते आणि त्यानंतर १६ आॅगस्ट २००८ रोजी शनिवारी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते.- मोहनराव दाते, दाते पंचांगकर्ते, सोलापूर