शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

पावसाने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:16 IST

श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता.

नाशिकरोड : श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता. पोलीस प्रशासनाने लादलेल्या जाचक अटी, नियम यामुळे मंडळांना अगदी वेळेवर मंडपाचा आकार बदलण्याची, तर काही मंडळांना जागा बदलण्याची पाळी आली. दिवसेंदिवस कमी होत चाललेला सहभाग, वर्गणी, जाहिरातीची चणचण आदी कारणांमुळे मंडळांची संख्या घटत चालली आहे. अशा सर्व परिस्थितीवर मात करून गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांना गेल्या पाच-सहा दिवसांपासून दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वैतागून सोडले होते. श्री गणरायाची स्थापना होऊन सोमवारी चौथा दिवस होता. मात्र सलग सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे भाविक घराबाहेर पडत नसल्याने मंडळाच्या देखाव्याकडे सामसूम पसरली आहे, तर अर्धवट देखावा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते व कारागिरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. थोडीशी विश्रांती घेत बरसणारा वरूणराजा यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पोलिसांचा बंदोबस्त अपुराकाही मंडळांच्या ठिकाणी दिवसा, तर काही ठिकाणी रात्री असणारा पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा अद्याप बंदोबस्त लावलेला नाही. यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व भाविक यांच्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसामुळे बंदोबस्ताचा ताण तूर्त सैल झाला असला तरी सर्व मंडळांजवळ बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली जात आहे.