शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

पावसाने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:16 IST

श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता.

नाशिकरोड : श्री गणरायाच्या स्थापनेनंतर सोमवारी सलग चौथ्या दिवशी पावसाची रिमझिम सुरू राहिल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे, तर श्री महालक्ष्मीच्या स्वागताची तयारी करणाºया कुटुंबांच्या कामात अडथळा आला होता. पोलीस प्रशासनाने लादलेल्या जाचक अटी, नियम यामुळे मंडळांना अगदी वेळेवर मंडपाचा आकार बदलण्याची, तर काही मंडळांना जागा बदलण्याची पाळी आली. दिवसेंदिवस कमी होत चाललेला सहभाग, वर्गणी, जाहिरातीची चणचण आदी कारणांमुळे मंडळांची संख्या घटत चालली आहे. अशा सर्व परिस्थितीवर मात करून गणेशोत्सव साजरा करणाºया मंडळांना गेल्या पाच-सहा दिवसांपासून दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे वैतागून सोडले होते. श्री गणरायाची स्थापना होऊन सोमवारी चौथा दिवस होता. मात्र सलग सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपमुळे भाविक घराबाहेर पडत नसल्याने मंडळाच्या देखाव्याकडे सामसूम पसरली आहे, तर अर्धवट देखावा पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते व कारागिरांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. थोडीशी विश्रांती घेत बरसणारा वरूणराजा यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पोलिसांचा बंदोबस्त अपुराकाही मंडळांच्या ठिकाणी दिवसा, तर काही ठिकाणी रात्री असणारा पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा अद्याप बंदोबस्त लावलेला नाही. यामुळे मंडळाचे कार्यकर्ते व भाविक यांच्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसामुळे बंदोबस्ताचा ताण तूर्त सैल झाला असला तरी सर्व मंडळांजवळ बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली जात आहे.