शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:26 IST

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.

सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पहिल्यांदाच जून अखेरीस पेरण्यांची कामे उरकली आहेत. मृगाच्या दमदार पावसाने पिकांची उगवन जोरदार झाली असली तरी पावसाने ओढ दिल्याने या पिकांना आता वरुणराजाची ओढ लागली आहे.पिकांना पाण्याचा ताण पडत असल्याने पुर्व भागातील बळीराजा येथील येरे येरे पावसा म्हणत अर्जव करताना दिसतो आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वेळेआधीच वाटचाल सुरू झाली. दुष्काळी म्हणून गणल्या जाणाऱ्या सिन्नरच्या पूर्व भागात जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यानीदेखील वेग घेतला.शेतकऱ्यांना बांधावर खतांचे वाटपपाथरे : जामनदी फार्मर प्रोडूसर कंपनीच्या वतीने पाथरे येथील शेतकरी सभासदांना थेट बांधावर युरिया खताचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने, संचालक नारायण शिंदे, वारेगावचे सरपंच मिननाथ माळी यांचेसह शेतकरी सभासद उपस्थित होते. ना नफा ना तोटा या तत्वाने केवळ शेतकºयांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेल्या या कंपनीने आज सर्वत्र युरिया खताची टंचाई निर्माण झाली असताना हा उपक्रम राबवला. ज्या सभासद शेतकºयांनी संस्थेकडे खताची मागणी नोंदविली होती त्या शेतकºयांच्या बांधावर रास्त किमतीत युरिया खत पोहोच करण्यात आले. गत चार वर्षांपासून शेतकरी हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवणाºया या संस्थेने डाळिंब, भाजीपाला, कांदा आदी शेतमालाची रास्त भावात खरेदी करून विक्री केली आहे. कंपनीमार्फत शेतकºयांना खात्रीशीर बियाणे, औषधे उपलब्ध करून दिली जातात. शेतकरी ते ग्राहक या तत्त्वाने संस्था कार्य करत असून वावी येथे शेतीसाठी आवश्यक असणाºया खते, बी - बियाणे, अवजारांचे विक्री केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र चिने यांनी दिली.---------------------कमी-अधिक प्रमाणात पावसाचा जोर राहिल्याने पिकांसाठी अनुकूल परिस्थिती राहिली. मात्र, ऊन सावल्यांचा खेळात पिकांना पाण्याची गरज असल्याने आता येरे येरे पावसा मांडण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. अनेक भागात शेतकºयांनी पिकांना युरियाचा पहिला डोस दिला आहे. तर असंख्य शेतकºयांनी युरियाची खरेदी करून ठेवली आहे.-----------पाऊस नसल्याने खतांची ही मात्रा वापरतात येत नसल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. सध्यस्थितीत पिकांना खतांची मात्रा मिळाली तर पुढच्या पावसात पिके बहरतील अशी आस आहे.---------------कारण पुढच्या काळात श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पूर्वभागात जेमतेम पडणाºया पावसावर पिकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पिके वाढीच्या काळात पाण्याचा ताण बसला तर त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार आहे. अनेक भागात मका, सोयाबीन वर किडीचे अस्तित्व जाणवत आहे. पावसाची वाट बघावी लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक