शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

भाववाढीमुळे रब्बीचा कांदा जोरात; ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड

By admin | Updated: November 11, 2015 23:51 IST

भाववाढीमुळे रब्बीचा कांदा जोरात; ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड

 नाशिक : जिल्ह्यात सरासरी ६० टक्के पाऊस पडूनही येत्या रब्बी हंगामासह एकूण सर्व हंगाम मिळून कांद्याची लागवड ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्यामानाने रब्बीच्या मक्याचे क्षेत्र घटले आहे.विहिरीचे पाणी आणि बंधाऱ्यांच्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच तब्बल ७२ हजार हेक्टरची कांदा लागवड शेतकऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गहू, ज्वारी, हरभरा आदि कडधान्यांच्या पेरणीला वेग आला होता. दिवाळीपूर्वी रब्बीची पेरणी पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जानेवारी-फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई भासेल. तत्पूर्वी पीक हाती यावे, यासाठी खरिपाचे पीक हाती येताच त्वरित रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नऊ हजार ८६९ हेक्टरवर ज्वारी, दोन हजार २८४ हेक्टवर गव्हाची पेरणी झाली. कमी पाण्याचे अथवा बिनपाण्याचे पीक म्हणून चालू वर्षी ५ हजार १२५ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. तृणधान्यासह हंगामातील एकूण पाच हजार २१३ हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपली आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. (प्रतिनिधी)मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा घटल्याने कांदा आयात करण्यात आला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)