शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढीमुळे रब्बीचा कांदा जोरात; ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड

By admin | Updated: November 11, 2015 23:51 IST

भाववाढीमुळे रब्बीचा कांदा जोरात; ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड

 नाशिक : जिल्ह्यात सरासरी ६० टक्के पाऊस पडूनही येत्या रब्बी हंगामासह एकूण सर्व हंगाम मिळून कांद्याची लागवड ७२ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली आहे. त्यामानाने रब्बीच्या मक्याचे क्षेत्र घटले आहे.विहिरीचे पाणी आणि बंधाऱ्यांच्या उपलब्ध होणाऱ्या पाण्यावरच तब्बल ७२ हजार हेक्टरची कांदा लागवड शेतकऱ्यांनी केल्याचे वृत्त आहे. रब्बी हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गहू, ज्वारी, हरभरा आदि कडधान्यांच्या पेरणीला वेग आला होता. दिवाळीपूर्वी रब्बीची पेरणी पूर्ण करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जानेवारी-फेब्रुवारीनंतर पाण्याची टंचाई भासेल. तत्पूर्वी पीक हाती यावे, यासाठी खरिपाचे पीक हाती येताच त्वरित रब्बीच्या पेरणीला सुरुवात झाली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नऊ हजार ८६९ हेक्टरवर ज्वारी, दोन हजार २८४ हेक्टवर गव्हाची पेरणी झाली. कमी पाण्याचे अथवा बिनपाण्याचे पीक म्हणून चालू वर्षी ५ हजार १२५ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. तृणधान्यासह हंगामातील एकूण पाच हजार २१३ हेक्टरवर रब्बीची पेरणी आटोपली आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये कांद्याचे दर १०० रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. (प्रतिनिधी)मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा घटल्याने कांदा आयात करण्यात आला होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन कांदा लागवडीस प्राधान्य दिले आहे. (प्रतिनिधी)