शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

‘स्मार्ट सिटी’च्या प्रकल्प अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: January 29, 2017 23:03 IST

एसपीव्हीचा मुद्दा : निवडणूक प्रचारात विरोधकांकडून भाजपाला घेरण्याची शक्यता; गोदावरी सुशोभिकरणाचाही मुद्दा

नाशिक : देशातील शंभर शहरे स्मार्ट करण्याचा मोदी सरकारचा अजेंडा असला तरी नाशिकला स्मार्ट सिटी करण्याबाबत तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी तयार केलेल्या प्रकल्प आराखड्याच्या अंमलबजावणीवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने, एसपीव्ही अर्थात कंपनीकरणाचा मुद्दा महापालिका निवडणुकीत पुन्हा उचल खाण्याची चिन्हे असून, त्यातून स्वायत्ततेचा प्रश्नही चर्चिला जाण्याची शक्यता आहे. केंद्रातील मोदी सरकारने देशातील शंभर शहरांना स्मार्ट सिटी अभियानांतर्गत विकसित करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार ९८ शहरांच्या यादीत नाशिक शहराचाही समावेश करण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्यात २० शहरांच्या यादीत नाशिकचा समावेश होण्यासाठी नाशिक महापालिकेने तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प आराखडा तयार केला होता. त्यासाठी शहरभर स्मार्ट सिटीचा जागर घडवून आणला गेला होता. लोकसहभाग घेत काही नावीन्यपूर्ण प्रकल्पांची चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार, गेडाम यांनी हरित क्षेत्र, पुनर्विकास आणि विशेष क्षेत्र विकास या अंतर्गत प्रकल्प आराखडा तयार करत शहर विकासाची अनेक स्वप्ने दाखविली होती. त्यात जुन्या नाशिक गावठाण परिसराचा पुनर्विकास करण्यापासून ते गोदावरी नदीपात्रालगत सुशोभिकरणापर्यंतचा समावेश होता. परंतु, स्मार्ट सिटी अभियानात सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र कंपनी अर्थात एसपीव्ही (स्पेशल परपज व्हेईकल) स्थापन करणे अनिवार्य होते आणि त्यात लोकप्रतिनिधींना फारसे स्थान नव्हते. त्यामुळे महासभेत भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी कंपनीकरणाला तीव्र विरोध दर्शविला होता. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही स्मार्ट सिटीवर कडाडून प्रहार केले होते. परंतु, जादूची कांडी फिरली, मनसेचाही विरोध मावळला आणि काही अटी-शर्तींवर स्मार्ट सिटीसाठी कंपनीकरणाला मान्यता देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नाशिकचा ‘स्मार्ट सिटी’त समावेश करण्यात आला आणि सध्या कंपनी स्थापनेची कार्यवाही सुरू आहे.  महापालिका निवडणुकीत भाजपाकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे समर्थन केले जाईल, परंतु विरोधकांनी मात्र, स्मार्ट सिटीचा फोलपणा मतदारांसमोर मांडण्याची तयारी केली आहे. त्यासाठी पुणे व सोलापूर शहराचे उदाहरण समोर ठेवले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शहरांत  तब्बल दीड वर्ष उलटूनही अद्याप विकासाच्या पाऊलखुणा उमटलेल्या  नाहीत. (प्रतिनिधी)