शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

मनपात १९७ अनुकंपा तत्वावरील उमेदवारांच्या भरतीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:15 IST

नाशिक : महापालिकेने २००५ ते २०१३ या कालावधीत अतिरिक्त भरलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे निर्माण झालेला गेांधळ अखेरीस राज्य शासनाने निस्तरला आहे. ...

नाशिक : महापालिकेने २००५ ते २०१३ या कालावधीत अतिरिक्त भरलेल्या कर्मचाऱ्यांच्यामुळे निर्माण झालेला गेांधळ अखेरीस राज्य शासनाने निस्तरला आहे. या कालावधीत अतिरिक्त भरती केलेल्या १३२ कर्मचाऱ्यांची सेवा क्षमापीत करण्यात आली आहे. मात्र, त्याचबरोबर अशाप्रकारची कार्यवाही करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अर्थात यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनुकंपा भरती रखडल्याने १९७ उमेदवार ताटकळत होते. त्यांना आता सेवेत घेण्याचा देखील मार्ग मेाकळा झाला आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकांनी १६ जानेवारीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे व म्युनिसिपल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महापालिकेत गेल्या पाच वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या अनुकंपा तत्वावरील वारसांना सेवेत घेऊन त्यांना शासनाप्रमाणेच नियमित वेतनश्रेणी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्याचे मूळ कारण म्हणजे महापालिकेत २००५ ते २०१३ दरम्यान झालेल्या भरतीच्या वेळी १३२ कर्मचारी नियमापेक्षा अधिक प्रमाणात क आणि ड गटासाठी भरण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे २०१५ ते २०२० पर्यंत अनेक कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातत्वावर सेवेत घेण्यासाठी अर्ज देऊन देखील त्यात उपयोग होत नव्हता. त्यामुळे शासनाने आता हा गोंधळ निस्तरला आहे. नगरविकास खात्याचे उपसचिव शं. त्र्यं. जाधव यांनी १९ जानेवारीस महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार या १३२ कर्मचाऱ्यांची भरती क्षमापीत करण्यात आली आहे. मात्र, शासन धेारणानुसार ज्यांनी या कर्मचाऱ्यांना सेवेत घेतले त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शासनाच्या प्रचलित धोरणानुसार २०१५ पासून आतापर्यंतच्या प्रतीक्षा यादीतील कर्मचाऱ्यांची अनुकंपा तत्वावरील पदे भरण्यास मान्यता देत असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून अनुकंपातत्वावरील भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या १९७ वारसांचा भरतीचा मार्ग मेाकळा झाला आहे.

इन्फो..

महापालिकेत रखडलेली अनुकंपा भरती आता होणार असली तरी महापालिकेचा आकृतीबंध केव्हा मंजूर होणार हा प्रश्न आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पडून आहे. शासनाने हा आकृतीबंध मंजूर केल्यास रिक्तपदांच्या भरतीचा प्रश्न सुटणार आहे.