शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

कसारा घाटात चार दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

घोटी : मुंबई, कोकणासह कसारा घाट व इगतपुरी तालुक्यात आभाळ फाटल्यागत पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिशय मुसळधार ...

घोटी : मुंबई, कोकणासह कसारा घाट व इगतपुरी तालुक्यात आभाळ फाटल्यागत पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिशय मुसळधार पावसामुळे कसारा घाटात चार दिवसांत दुसऱ्यांदा दरड कोसळून रेल्वे व महामार्गावरील वाहतूकव्यवस्था ठप्प झाली होती. मध्यरात्रीच महामार्गारील दरड हटविल्याने वाहतूक सुरळीत झाली. मात्र, कसाऱ्याहून नाशिककडे जाणाऱ्या मध्यरेल्वे मार्गावर ठिकठिकाणी दरड कोसळून मलबा व मोठे दगड रेल्वे रुळांवर आल्याने रेल्वेची दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद करण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास मध्य रेल्वेच्या जव्हार फाट्याजवळील टीजीआर-१ जवळील १२५/४०० डाउन मार्गावर दरड कोसळली असून, त्याच्याच पुढे ओव्हरहेड वायरवर झाड पडले आहे, तसेच कथरुवंगण वाडी येथील टीजीआर-२ येथील १३१/३ मिडल लाइनवर मातीचा खच पडला आहे, तर मानस हॉटेलजवळील टीजीआर-१/ १३३/५३ अप लाइनच्या ट्रॅकखालील खडी वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. ओव्हरहेड वायरवरचे झाड काढण्यात आले असून, जेसीबी ट्रॅकजवळ येण्यास अडचण येत असल्याकारणाने बाकी कामे करण्यास अडचणी येत होत्या.

-------------------------

वाहतुकीसाठी मार्ग खुला

महामार्गावरील जुना कसारा घाटातून दरड हटविण्याचे काम पहाटे ४ वाजता संपले असून, मुंबईहून नाशिकला जाणारा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तर दुसरीकडे मध्य रेल्वेच्या डाउन व मिडल लाइन कोसळलेल्या दरडी व माती हटविण्याचे काम सुरू आहे, तसेच अप लाइनखालील वाहून गेलेल्या खडीचे पुन्हा भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एनडीआरएफ, आरपीएफ व रेल्वे कर्मचाऱ्यांची रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल असून, अजून मध्य रेल्वेची सेवा दुपारपर्यंत चालू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

-------------------------

लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द

मध्य रेल्वेची दोन्ही मार्गांची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे गोरखपूर- हावडा, पवन एक्स्प्रेस इगतपुरी स्थानकात रद्द करण्यात आल्या असून, राज्यराणी, पंचवटी, सेवाग्राम एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्पेस या रद्द करण्यात आल्या आहेत. इगतपुरी रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कल्याणला जाण्यासाठी नाशिक, इगतपुरी आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात आली. सकाळी १० वाजेपर्यंत इगतपुरीहून १८ बसेस कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आल्या असून, अजून ४० बसेस रेल्वे प्रशासनाने मागविल्या आहेत. मुंबईहून येणाऱ्या गाड्या वसई, विरारमार्गे वळविण्यात आल्या असून, भुसावळहून मुंबईकडे येणाऱ्या गाड्या जळगाव- मनमाडमार्गे वळविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

----------------------------------

बससेवाही विस्कळीत

इगतपुरी- कसारादरम्यान कसारा घाटात रेल्वे ट्रॅकवर ठिकठिकाणी दरड कोसळल्याने व ओव्हरहेडची वायर तुटल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या इगतपुरी येथेच थांबविल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. इगतपुरीहुन रेल्वेच्या प्रवाशांना कल्याणपर्यंत सोडण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली. इगतपुरी आगारातून अनेक बसेस कल्याणला पाठविल्याने इगतपुरी घोटी येथून नाशिक व अन्य काही ठिकाणच्या बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे बससेवाही विस्कळीत झाल्याने अनेक बस प्रवाशांना याचा फटका बसला.

(२२ घोटी १/२/३)