शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अवयवदान एक चळवळ व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST

नाशिक : भारतात अवयवदानाविषयी पुरेशी जनजागृती नाही,यास सरकारसह डॉक्टर आणि समाजही कारणीभूत असल्याची खंत डॉ. संजय रकिबे यांनी ...

नाशिक : भारतात अवयवदानाविषयी पुरेशी जनजागृती नाही,यास सरकारसह डॉक्टर आणि समाजही कारणीभूत असल्याची खंत डॉ. संजय रकिबे यांनी मांडली.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत विसावे पुष्प त्यांनी गुंफले. स्व. माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘अवयवदान महापुण्य’ या विषयावर ते बोलत होते. अवयवदानाविषयी समाजात मोठे गैरसमज आहेत, आपल्या मृत्यूनंतर या अवयवांच्या माध्यमातून आपण कुणाला जीवदान देऊ शकतो, ही भावना महत्त्वाची आहे.आपल्या देशात एक लाख लोकांनी मूत्रपिंड हवे आहे, म्हणून नावनोंदणी केली. नाशिकमध्ये ४ ते ५ हजार लोक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत; पण किडनीसाठी नोंदणी फक्त ३०० जणांनी केली, कारण नोंदणी करावी लागते यासंदर्भात लोक अनभिज्ञ आहेत, अशी माहिती डॉ. रकिबे यांनी दिली.

जिवंत व्यक्तीही अवयवदान करू शकतो, किडनी, यकृताचा काही भाग, कॅन्सर रुग्णांसाठी बोनमॅरो या अवयवांचे दान जिवंत व्यक्ती करू शकतो, तर मेंदूमृत व्यक्ती ३६ लोकांना जीवन देऊ शकतो असेही डॉ. रकिबे यांनी स्पष्ट केले. डॉक्टर्स अवयव विक्री करतात,असा मोठा गैरसमज जनमानसात आहे. त्याचप्रमाणे काही धर्मांमध्येही अवयवदानाविषयी जागृती नाही. यावरही डॉ. रकिबे यांनी बोट ठेवले. कुठलाच धर्म दानाला नाही म्हणत नाही, म्हणून अवयवदान करायला हवे. उत्तर महाराष्ट्राची गरज नऊ हजार डोळ्यांसाठीची आहे; पण वर्षात केवळ शंभर डोळे मिळतात. भारतात नेत्रदान झाले तर संपूर्ण जगाला आपण डोळे पुरवू शकू, असेही डॉ. रकिबे यांनी सांगितले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदान प्रक्रियेला काहीशी गती प्राप्त झाली आहे. जीवन अनमोल असून, समाजऋण फेडण्यासाठी अवयवदान करण्याची मानसिकता तयार करा, असे भावनिक आवाहन डॉ. रकिबे यांनी केले.

व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ता : गौतम संचेती

विषय : प्रसिद्धी माध्यमांपुढील नवनवीन आव्हाने