शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

अवयवदान एक चळवळ व्हावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:15 IST

नाशिक : भारतात अवयवदानाविषयी पुरेशी जनजागृती नाही,यास सरकारसह डॉक्टर आणि समाजही कारणीभूत असल्याची खंत डॉ. संजय रकिबे यांनी ...

नाशिक : भारतात अवयवदानाविषयी पुरेशी जनजागृती नाही,यास सरकारसह डॉक्टर आणि समाजही कारणीभूत असल्याची खंत डॉ. संजय रकिबे यांनी मांडली.

डिजिटल वसंत व्याख्यानमालेत विसावे पुष्प त्यांनी गुंफले. स्व. माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘अवयवदान महापुण्य’ या विषयावर ते बोलत होते. अवयवदानाविषयी समाजात मोठे गैरसमज आहेत, आपल्या मृत्यूनंतर या अवयवांच्या माध्यमातून आपण कुणाला जीवदान देऊ शकतो, ही भावना महत्त्वाची आहे.आपल्या देशात एक लाख लोकांनी मूत्रपिंड हवे आहे, म्हणून नावनोंदणी केली. नाशिकमध्ये ४ ते ५ हजार लोक मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत; पण किडनीसाठी नोंदणी फक्त ३०० जणांनी केली, कारण नोंदणी करावी लागते यासंदर्भात लोक अनभिज्ञ आहेत, अशी माहिती डॉ. रकिबे यांनी दिली.

जिवंत व्यक्तीही अवयवदान करू शकतो, किडनी, यकृताचा काही भाग, कॅन्सर रुग्णांसाठी बोनमॅरो या अवयवांचे दान जिवंत व्यक्ती करू शकतो, तर मेंदूमृत व्यक्ती ३६ लोकांना जीवन देऊ शकतो असेही डॉ. रकिबे यांनी स्पष्ट केले. डॉक्टर्स अवयव विक्री करतात,असा मोठा गैरसमज जनमानसात आहे. त्याचप्रमाणे काही धर्मांमध्येही अवयवदानाविषयी जागृती नाही. यावरही डॉ. रकिबे यांनी बोट ठेवले. कुठलाच धर्म दानाला नाही म्हणत नाही, म्हणून अवयवदान करायला हवे. उत्तर महाराष्ट्राची गरज नऊ हजार डोळ्यांसाठीची आहे; पण वर्षात केवळ शंभर डोळे मिळतात. भारतात नेत्रदान झाले तर संपूर्ण जगाला आपण डोळे पुरवू शकू, असेही डॉ. रकिबे यांनी सांगितले. ग्रीन कॉरिडॉरमुळे अवयवदान प्रक्रियेला काहीशी गती प्राप्त झाली आहे. जीवन अनमोल असून, समाजऋण फेडण्यासाठी अवयवदान करण्याची मानसिकता तयार करा, असे भावनिक आवाहन डॉ. रकिबे यांनी केले.

व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.

आजचे व्याख्यान

वक्ता : गौतम संचेती

विषय : प्रसिद्धी माध्यमांपुढील नवनवीन आव्हाने