शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
3
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
4
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
5
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
6
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
7
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
8
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
9
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
10
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
11
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
12
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
13
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
14
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
15
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
16
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
17
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
18
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
19
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
20
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या

नव्या जीवनमूल्यात साहित्य बाजूला पडले

By admin | Updated: October 17, 2016 01:08 IST

रंगनाथ पठारे : नारायण सुर्वे व कैलास पगारे साहित्य पुरस्कार वितरण सोहळा

नाशिक : माणसाच्या जगण्याची मूल्ये व अग्रक्रम बदलत चालले असून, नव्या जीवनमूल्यात साहित्य हा प्रकार बाजूला पडत चालला आहे, त्याची जागा आता वेगळ्याच आभासी गोष्टींनी घेतली आहे. तसेच असहिष्णुता हा माणसाचा स्वभाव असून तो अधिक प्रमाणात वाढत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.सुर्वे सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ‘कविवर्य नारायण सुर्वे व कैलास पगारे साहित्य पुरस्कार २०१६’ या कार्यक्रमात प्रा. पठारे बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित होते.यावेळी प्रा. पठारे पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी मराठी साहित्याला मराठी मनात मानाचे स्थान होते. परंतु आता चांगली पुस्तके आली तरी कुणी वाचत नाही. तसेच चांगले समीक्षकदेखील नाहीत. समीक्षक हा चांगला वाचक असतो, तर कलावंत हा सत्याच्या निकट जाण्याचा प्रयत्न करतो. लेखनासाठी वाचन ही प्रथम अट असावी, असेही ते म्हणाले. तसेच पुरस्कारार्थींचा त्यांनी गौरव केला.याप्रसंगी डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांगितले की, मराठी साहित्यात कविवर्य नारायण सुर्वे यांचे नाव मोठे असून, त्यांच्यामुळे या पुरस्काराला उंची प्राप्त झाली आहे. जागतिक वाङ्मयात अनेक महान कलाकृती असून, त्या मानाने आपल्याकडे मात्र तोकडे साहित्य आहे असेही कसबे म्हणाले. अध्यक्षीय मनोगतात कांबळे म्हणाले, कविवर्य नारायण सुर्वे हे कवितेतील बाप माणूस होते. सुर्वे यांचे साहित्य वाचून त्यांच्या आजूबाजूला फिरत आम्ही लिहिते झालो. सुर्वे हे कविता जगत होते. आजच्या नव्या पिढीला अशा साहित्यिकाकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.याप्रसंगी व्यासपीठावर निशांत पगारे, प्रा. डॉ. विवेक खरे, राजू नाईक, डॉ. मनीषा जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘मी जन्माला आलो तेव्हा जात नव्हती आणि कार्ल मार्क्स’ या कवितेचे वाचन करण्यात आले, तर समारोपप्रसंगी कामगार आहे, मी तळपती तलवार आहे या कवितेचे वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. नागार्जुन वाडेकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. जगताप यांनी, तर डॉ. रोहित कसबे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कवी किशोर पाठक, प्रा. रामदास भोंग, राजू देसले, विलास नलावडे आदिंसह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)