शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

लांब पल्ल्याचे धोरण आखण्याची गरज

By admin | Updated: May 20, 2017 01:49 IST

शासन एकाच वर्षात दोनदा निर्णय बदलत असल्याने शेतकरी गोंधळात पडत असल्याचे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी हा निसर्ग, शासन, वित्तीय संस्था आणि बाजारपेठ या चौकटीत अडकला आहे. या चौकटीच्या मर्जीवर शेतकऱ्यांचा कारभार चालतो. शासन व्यवस्थेने धोरण आखताना ते लांब पल्ल्याचे आखले पाहिजे. परंतु, एकाच वर्षात दोनदा निर्णय बदलत असल्याने शेतकरी गोंधळात पडत असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे माजी मंत्री व वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलताना केले. अधिवेशनात मार्गदर्शन करताना विनायकादादा पाटील यांनी सांगितले, शेतकरी प्रश्नावर एकच मार्ग असू शकत नाही. त्यांचा प्रश्न दहा तोंडासारखा आहे. प्रत्येक तोंड आपल्या आवाजात बोलत असते. त्यामुळे तो प्रश्न अधिक गुंतागुंतीचा व व्यापक बनला आहे. मायेच्या हाताने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. भारतासारख्या विकसनशील खंडप्राय देशात पीकपद्धती ठरवू शकत नाही. शासनकर्त्यांनीच धोरणे आखताना ती किमान दहा वर्षांसाठी आखली पाहिजे. लांब पल्ल्याचे निर्णय घेतल्यास शेतकऱ्याला निर्णय घेणे सोपे जाईल. तेलबियांची टंचाई ही मानवनिर्मित नाही तर सरकारनिर्मित आहे. परदेशी शेतकऱ्याच्या डाळीला जो भाव दिला तोच सन्मान भारतीय शेतकऱ्यालाही दिला पाहिजे. कर्जमुक्तीचा मार्ग हा शेतकऱ्यांना समृद्ध करणारा आहे. परंतु, कर्जमुक्ती येणार म्हणून ज्याने कर्ज फेडले नाही, तो शहाणा ठरतो आणि ज्याने वेळेत कर्ज भरले तो वेडा ठरतो. पुढे वीज बिल माफीची मागणी होईल त्यावेळी लोक वीज बिलेही भरणार नाहीत. शेतकऱ्याला डून स्कूलचे स्वप्न जरूर दाखवा, परंतु त्याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेचीही जाणीव करून द्या. मुळात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन शोधले पाहिजे, असे विनायकदादा म्हणाले. दोन एकर बाजरीचे पीक घेणारा आणि वीस एकरवर द्राक्षपीक घेणारा दोन्हीही अस्वस्थ असतात. कारण मात्र कुणीच सांगत नाही. असेही विनायकदादा पाटील यांनी स्पष्ट केले.