शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लांब पल्ल्याचे धोरण आखण्याची गरज

By admin | Updated: May 20, 2017 01:49 IST

शासन एकाच वर्षात दोनदा निर्णय बदलत असल्याने शेतकरी गोंधळात पडत असल्याचे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलताना केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी हा निसर्ग, शासन, वित्तीय संस्था आणि बाजारपेठ या चौकटीत अडकला आहे. या चौकटीच्या मर्जीवर शेतकऱ्यांचा कारभार चालतो. शासन व्यवस्थेने धोरण आखताना ते लांब पल्ल्याचे आखले पाहिजे. परंतु, एकाच वर्षात दोनदा निर्णय बदलत असल्याने शेतकरी गोंधळात पडत असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे माजी मंत्री व वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलताना केले. अधिवेशनात मार्गदर्शन करताना विनायकादादा पाटील यांनी सांगितले, शेतकरी प्रश्नावर एकच मार्ग असू शकत नाही. त्यांचा प्रश्न दहा तोंडासारखा आहे. प्रत्येक तोंड आपल्या आवाजात बोलत असते. त्यामुळे तो प्रश्न अधिक गुंतागुंतीचा व व्यापक बनला आहे. मायेच्या हाताने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची गरज आहे. भारतासारख्या विकसनशील खंडप्राय देशात पीकपद्धती ठरवू शकत नाही. शासनकर्त्यांनीच धोरणे आखताना ती किमान दहा वर्षांसाठी आखली पाहिजे. लांब पल्ल्याचे निर्णय घेतल्यास शेतकऱ्याला निर्णय घेणे सोपे जाईल. तेलबियांची टंचाई ही मानवनिर्मित नाही तर सरकारनिर्मित आहे. परदेशी शेतकऱ्याच्या डाळीला जो भाव दिला तोच सन्मान भारतीय शेतकऱ्यालाही दिला पाहिजे. कर्जमुक्तीचा मार्ग हा शेतकऱ्यांना समृद्ध करणारा आहे. परंतु, कर्जमुक्ती येणार म्हणून ज्याने कर्ज फेडले नाही, तो शहाणा ठरतो आणि ज्याने वेळेत कर्ज भरले तो वेडा ठरतो. पुढे वीज बिल माफीची मागणी होईल त्यावेळी लोक वीज बिलेही भरणार नाहीत. शेतकऱ्याला डून स्कूलचे स्वप्न जरूर दाखवा, परंतु त्याला म्युन्सिपाल्टीच्या शाळेचीही जाणीव करून द्या. मुळात शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन शोधले पाहिजे, असे विनायकदादा म्हणाले. दोन एकर बाजरीचे पीक घेणारा आणि वीस एकरवर द्राक्षपीक घेणारा दोन्हीही अस्वस्थ असतात. कारण मात्र कुणीच सांगत नाही. असेही विनायकदादा पाटील यांनी स्पष्ट केले.