शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषण निर्मूलनाचा ‘नाशिक पॅटर्न’ यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:12 IST

मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या कुपोषित बालकांच्या आरोग्याचा व पोषणाचा प्रश्न ...

मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अंगणवाड्या बंद करण्यात आल्या. त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या कुपोषित बालकांच्या आरोग्याचा व पोषणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र शासनाने या बालकांना घरपोच पोषण आहार देण्याचा निर्णय घेऊन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या माध्यमातून तो पोहोचविला. मार्च महिन्यात जिल्ह्यात ८१० बालके तीव्र कुपोषित होती. कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प होऊन ग्रामीण भागात शेतकामे बंद असताना कुपोषित बालकांचे उदरभरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असता, जिल्हा परिषदेने ‘एक मूठ पोषण आहार’ योजना राबवून गावागावांतील ग्रामपंचायतींच्या निधीतून गावातील कुपोषित बालके, गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार पुरविला. परिणामी कुपोषित बालकांचे पोषण झालेच, त्याचबरोबर गरोदर मातांचे उदरभरण होऊन कुपोषित बालके जन्मास येण्याचे प्रमाण घटले. नोव्हेंबर अखेर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३७१ होऊन जवळपास ४३९ बालकांचे वजन वाढून ते सुदृढ झाले.

-------

पालकांनीही घेतली बालकांची काळजी

कोरोनाचा परिणाम आदिवासी भागातील जनजीवनावरही झाला. शहरात रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्यांना पुन्हा गावी परतावे लागले. शेतीची कामेही ठप्प झाल्याने हाताला काम नसल्याने कसेबसे उदरभरण करणाऱ्या पालकांनी मात्र या काळात आपल्या बालकांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली. त्यांना वेळीच्या वेळी पोषण आहार देण्यावर लक्ष केंद्रित केले. परिणामी कुपोषण कमी करण्यास हातभार लागला.

-----

अंगणवाडी सेविका, मदतनिसांना श्रेय

कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याकामी गावोगावच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची मेहनत महत्त्वाची ठरली. कोरोनाच्या काळात स्वत:ची काळजी घेतानाच गावातील कुपोषित बालके, गरोदर व स्तनदा मातांना वेळेच्या वेळी पोषण आहाराचे वाटप, आरोग्यविषयक मार्गदर्शन, प्रसंगी औषधोपचारासाठी मदत केल्याने या काळात बालमृत्यू व बाळंतपणातील मृत्यूचे प्रमाण घटले.

-----

अशा राबविल्या योजना

* बालकांना दररोज गूळ, शेंगदाणे, फुटाणे, खोबरेल तेल, बटाटे, मूग, चणे, अंडी, केळी आदींचा पोषण आहार देण्यात आला.

* बालकांना नियमित अन्न दिले जावे यासाठी भात, नागली, भुईमूग, वरई यांच्या वेगवेगळ्या रेसिपीचे प्रात्यक्षिक त्यांच्या पालकांना अंगणवाडी सेविकांनी दिले.

* पोषण आहार वेळीच्या वेळी दिला जावा यासाठी बालकाच्या घरात वेळापत्रक लावण्यात आले.

* पोषण आहाराचा विनियोग योग्य होतो की नाही, यासाठी दर आठवड्याला घरभेटी, दर महिन्यात बालकांचे वजन घेऊन त्याद्वारे आहारात बदल.