शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पायी चालण्याची सवय मोडल्याने गुडघे, कंबरदुखीची व्याधी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST

नाशिक : घरोघरी वाहनांची संख्या वाढल्याने महानगरातील नागरिकांची पायी चालण्याची सवयच गत दशकभरात अत्यंत कमी झाली आहे. मात्र, अशा ...

नाशिक : घरोघरी वाहनांची संख्या वाढल्याने महानगरातील नागरिकांची पायी चालण्याची सवयच गत दशकभरात अत्यंत कमी झाली आहे. मात्र, अशा सुखासीन आयुष्यांमुळेच नागरिकांना पोटाचे विकार, रक्तदाबवृद्धी, लठ्ठपणा, गुडघे, कंबरदुखी यासह अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे.

अनेक शहरवासीयांना चाळिशीनंतर पोट साफ न होणे, जेवणानंतर शौचाला लागणे, खडा होणे इत्यादी वायूंचा प्रकोप झाल्याच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पायी न चालल्याने सगळ्य़ा आरोग्याच्या तक्रारींना प्रारंभ होतो. त्यात निद्रानाश, रक्तदाबवृद्धी, मधुमेह, मूळव्याध, लठ्ठपणा, अंगावर सूज येणे या विकारांचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या व्याधींवर चालणे हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. बैठ्या कामामुळे ज्यांचे अन्नपचन होत नाही, व्यायामाचा अभाव आहे त्यांनी दिवसा किंवा रात्री फिरण्याचा व्यायाम करणे आवश्यक आहे.

इन्फो

हे करून पहा

सकाळी फिरायला जाणे सर्वाधिक योग्यच असून सकाळी फिरणे हे आरोग्यरक्षणाकरिता आहे. तर रात्रीचे फिरणे हे रोगनिवारणासाठी उपयुक्त ठरते. मोकळी हवा घेऊन फुप्फुसे अधिक कार्यक्षम करता येतात. त्यामुळे जेवणानंतर शतपावली करताना किमान तीन-चार हजार पावले चालावे, सावकाश चालावे ज्यांना शक्य आहे, त्यांनी जवळच्या कामांसाठी वाहन वापरू नये किंवा शक्य असेल त्यांनी दिवसा सार्वजनिक वाहनातून ऑफिसला गेल्यानंतर कार्यालयातून घरी परत जाताना पायी गेल्यास त्यांच्या आरोग्याला अधिक फायदा होऊ शकतो.

इन्फो

या कारणांसाठीच होते चालणे

बहुतांश कुटुंबांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक सकाळ, संध्याकाळ पायी फिरण्याचा व्यायाम करताना दिसतात. तर मध्यमवयीन नागरिकांपैकी केवळ ५ ते १० टक्के नागरिक चालण्याचा व्यायाम करतात. बहुतांश मध्यमवयीन पुरुष हे वाहनाने कार्यालयात, वाहनाने कार्यालयातून घरी आणि कार्यालयात किंवा घरात इतकेच चालतात. तर तरुणाई केवळ गल्ली, कॉलनीतील मित्र-मैत्रिणीच्या घरापर्यंत चालतात, हेच वास्तव आहे.

इन्फो

म्हणून वाढले हाडांचे आजार

पायाच्या चलनवलनाअभावी हाडे ठिसूळ होण्यासह त्यांना अधिकच्या हालचालीची सवयच राहिली नाही. त्यामुळे अनेक घरांमध्ये गुडघेदुखी, पोटरीदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, यासारख्या हालचालीअभावी होणाऱ्या व्याधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ऑर्थोपेडीक डॉक्टरांकडील रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे.

इन्फो

पायी चालणे शक्यच नाही, त्यांच्यासाठी...

ज्या ज्येष्ठ नागरिकांना किंवा अन्य व्याधींनी ग्रस्त व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव पायी चालणे शक्यच नसते, त्यांनी खुर्चीत बसूनच शांततेत आणि विशिष्ट लयीत हातपाय हलवण्याची क्रिया केल्यासही अपेक्षित परिणाम साधता येऊ शकतो. भक्कम खुर्चीवर बसून अशा प्रकारचे हाता-पायांचे व्यायाम केले तरीदेखील पायांशी निगडीत अर्धी दुखणी संपुष्टात येऊ शकतात.