शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

कलगीतुरा : विकासकामांच्या स्पर्धेऐवजी उणेदुणे

By admin | Updated: January 22, 2015 00:26 IST

आमदार-महापौरांत आरोप-प्रत्यारोप

मालेगाव : येथील मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र आणि दुसरीकडे महापौर हाजी मोहंमद इब्राहिंम व उपमहापौर हाजी मोहंमद युनूस ईसा शेख यांच्यात सध्या शहर विकास आराखडा, आरक्षित जमिनींचा विकास व मनपा महासभेतील मंजूर झालेल्या विषयांवरून कलगीतुरा रंगला आहे. मात्र यातून केवळ राजकीय उणेदुण्याचे नाट्य न रंगता त्यातून नेमका शहर विकासास हातभार लागावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.विधानसभा निवडणुका व मनपातील झालेल्या महापौर - उपमहापौर पदांच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय परिस्थिती आणि समीकरणांमध्ये बदल झालेला आहे. काँग्रेसचे निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, विद्यमान महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, उपमहापौर हाजी युनूस ईसा आणि सहकारी पक्ष अशी राजकीय स्थिती आहे. एकीकडे आमदारकी तर दुसरीकडे मनपाची सत्ता अशा परस्परविरोधी गडकिल्ल्यावरून एकमेकांविरोधात राजकीय आरोप- प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मनपाने विकास आराखडा आखताना विविध नागरी सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी ज्या जागा आरक्षित केल्या त्या आरक्षणांचा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. जागा आरक्षित करताना शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वर्दळ कमी व्हावी यासाठी पार्किंग झोनची व्यवस्था व्हावी, टाउन हॉल बांधावा, नवीन अग्निशमन केंद्र व्हावे, झोपडपट्टी भागात व त्यालगत प्राथमिक शाळा व मैदानाची व्यवस्था करावी असा उद्देश होता. मात्र या आरक्षित जागांपैकी काही जागांवर मनपातर्फे व्यापारी संकुलांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात मनपाच्या आर्थिक फायद्यापेक्षा मनपातील संबंधित राजकीय व पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक लागेबांध्याचा विचार जास्त असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे आरक्षित जागांच्या मूळ उद्देशास हरताळ फासला गेला आहे. परिणामी मनपाने विकास आराखडा मंजूर करताना ज्या विविध आरक्षणांवर मंजुरी दिली त्या आरक्षणाप्रमाणे जागेचा उपयोग व्हावा अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अशा प्रकारच्या मागणीतून आमदार शेख यांनी मनपातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. थेट राज्य शासनाकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच दुसरीकडे सर्वसामान्य मालेगावकर जनतेत मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात रोष निर्माण होईल अशी व्यवस्था केली. मात्र महापौर व उपमहापौर यांनी याप्रश्नीदेखील ठरावीक भागातीलच आरक्षित जागेचा प्रश्न आमदारानी का उपस्थित केला आहे, असा प्रतिप्रश्न करत परतफेड केली आहे. महासभेत रविवार वॉर्ड भागात झोपडपट्टी भागात दुकानांसाठी लोखंडी कॅबिन उभारण्याचा विषय मंजूर करण्यात आला. त्यास माजी महापौर ताहेरा शेख यांनी केलेला विरोध डावलण्यात आला. शहराला नवीन आमदार आणि नवीन महापौर - उपमहापौर लाभल्यानंतर आता शहराच्या विकासकामांना वाव मिळेल, नवीन दिशा मिळेल, शहराचे प्रश्न - समस्या सुटतील अशी सर्वसामान्य मालेगावकरांची अपेक्षा होती. मात्र या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात शहरातील प्रश्न - समस्या मात्र जैसे थे आहे. (प्रतिनिधी)