शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कलगीतुरा : विकासकामांच्या स्पर्धेऐवजी उणेदुणे

By admin | Updated: January 22, 2015 00:26 IST

आमदार-महापौरांत आरोप-प्रत्यारोप

मालेगाव : येथील मालेगाव मध्यचे आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र आणि दुसरीकडे महापौर हाजी मोहंमद इब्राहिंम व उपमहापौर हाजी मोहंमद युनूस ईसा शेख यांच्यात सध्या शहर विकास आराखडा, आरक्षित जमिनींचा विकास व मनपा महासभेतील मंजूर झालेल्या विषयांवरून कलगीतुरा रंगला आहे. मात्र यातून केवळ राजकीय उणेदुण्याचे नाट्य न रंगता त्यातून नेमका शहर विकासास हातभार लागावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.विधानसभा निवडणुका व मनपातील झालेल्या महापौर - उपमहापौर पदांच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय परिस्थिती आणि समीकरणांमध्ये बदल झालेला आहे. काँग्रेसचे निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार आसिफ शेख व माजी आमदार रशीद शेख हे पिता-पुत्र एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला माजी आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद ईस्माईल, विद्यमान महापौर हाजी मोहम्मद इब्राहिम, उपमहापौर हाजी युनूस ईसा आणि सहकारी पक्ष अशी राजकीय स्थिती आहे. एकीकडे आमदारकी तर दुसरीकडे मनपाची सत्ता अशा परस्परविरोधी गडकिल्ल्यावरून एकमेकांविरोधात राजकीय आरोप- प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मनपाने विकास आराखडा आखताना विविध नागरी सुविधा नागरिकांना पुरविण्यासाठी ज्या जागा आरक्षित केल्या त्या आरक्षणांचा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. जागा आरक्षित करताना शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून वर्दळ कमी व्हावी यासाठी पार्किंग झोनची व्यवस्था व्हावी, टाउन हॉल बांधावा, नवीन अग्निशमन केंद्र व्हावे, झोपडपट्टी भागात व त्यालगत प्राथमिक शाळा व मैदानाची व्यवस्था करावी असा उद्देश होता. मात्र या आरक्षित जागांपैकी काही जागांवर मनपातर्फे व्यापारी संकुलांचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यात मनपाच्या आर्थिक फायद्यापेक्षा मनपातील संबंधित राजकीय व पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक लागेबांध्याचा विचार जास्त असल्याचा आरोप आमदार शेख यांनी केला आहे. अशा प्रकारांमुळे आरक्षित जागांच्या मूळ उद्देशास हरताळ फासला गेला आहे. परिणामी मनपाने विकास आराखडा मंजूर करताना ज्या विविध आरक्षणांवर मंजुरी दिली त्या आरक्षणाप्रमाणे जागेचा उपयोग व्हावा अशी मागणी आमदार शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अशा प्रकारच्या मागणीतून आमदार शेख यांनी मनपातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. थेट राज्य शासनाकडे याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच दुसरीकडे सर्वसामान्य मालेगावकर जनतेत मनपातील सत्ताधाऱ्यांविरोधात रोष निर्माण होईल अशी व्यवस्था केली. मात्र महापौर व उपमहापौर यांनी याप्रश्नीदेखील ठरावीक भागातीलच आरक्षित जागेचा प्रश्न आमदारानी का उपस्थित केला आहे, असा प्रतिप्रश्न करत परतफेड केली आहे. महासभेत रविवार वॉर्ड भागात झोपडपट्टी भागात दुकानांसाठी लोखंडी कॅबिन उभारण्याचा विषय मंजूर करण्यात आला. त्यास माजी महापौर ताहेरा शेख यांनी केलेला विरोध डावलण्यात आला. शहराला नवीन आमदार आणि नवीन महापौर - उपमहापौर लाभल्यानंतर आता शहराच्या विकासकामांना वाव मिळेल, नवीन दिशा मिळेल, शहराचे प्रश्न - समस्या सुटतील अशी सर्वसामान्य मालेगावकरांची अपेक्षा होती. मात्र या सर्व राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या गदारोळात शहरातील प्रश्न - समस्या मात्र जैसे थे आहे. (प्रतिनिधी)