शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनियमित पावसामुळे हंगामाचे बदलले रूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:16 IST

येवला : सातत्याने दुष्काळी व विषम पाणीपुरवठ्याने तीन भागात विभागलेला तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत ...

येवला : सातत्याने दुष्काळी व विषम पाणीपुरवठ्याने तीन भागात विभागलेला तालुका म्हणून येवला तालुक्याची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत तालुक्यात झालेल्या जलसंधारण कामांमुळे तालुक्याचा खालावलेला जलस्तर काहीसा उंचावला आहे. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश शेती व्यवसाय हा आजही नैसर्गिक जलस्रोतावरच अवलंबून आहे. पडणारा पाऊस अन् काही भागात मिळणारे पाटाचे पाणी यावरच तालुक्यातील शेती टिकून आहे. यात अस्मानी व सुल्तानी संकटाशी सामना करताना शेती अन् शेतकरीही सातत्याने अडचणीत आले आहेत.

पारंपरिक शेतीत अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती केली जात असली तरी वाढत्या महागाईचा फटका शेतीला बसला आहे. तर गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारी व लहरी पावसाने शेती आणि शेतकरी दोन्ही उद्ध्वस्त झाले आहेत. तालुक्यात बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, कांदा ही नगदी पिके प्रामुख्याने घेतली जातात. अनियमित पावसाने तालुक्यातील हंगामाचे चित्रही बदलून टाकले आहे. हंगामातील पिकेही आता तीन टप्प्यांत पाहायला मिळतात. दुबार तर काही ठिकाणी तिबार पेरणीही बळीराजाला करावी लागली आहे. तालुक्यात चालू खरीप हंमागात ४० हजार ५५७ हेक्टर क्षेत्रावर मका, १७ हजार ५१७ हेक्टर क्षेत्रावर कांदा, १० हजार ४२ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ८ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर मूग, ४ हजार २३ हेक्टर क्षेत्रावर कापूस, २ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, तर ३२१ हेक्टरवर तूर पीक घेण्यात आले आहे. नियमित पिकांना समाधानकारक भाव मिळेलच, याची शाश्वती नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात शेतीपूरक व्यवसाय म्हणून भाजीपाला उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येतो. भाजीपाल्यासाठी कमी पाणी आणि मशागत देखील कमी लागत असल्याने कमी वेळेत अधिक उत्पादन म्हणून भाजीपाला पिकांकडे पाहिले गेले. यातून हिरवी मिरची, मेथी, कोथिंबीर, वांगे, टमाटे, सिमला मिरची आदी भाजीपाला पिके घेतली गेली. तालुक्यात सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर टोमॅटो पीक घेतले गेले आहे.

कांद्यास देशांतर्गत व परदेशात मागणी सर्वसाधारण राहिली. इतर राज्यांमध्ये उपलब्ध झालेला कांदा तसेच कांदा निर्यात खुली असली तरी पाकिस्तान, अफगाणिस्तानचा कांदा आपल्या कांद्यापेक्षा स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. यातून हमीभावाने कांदा खरेदी करण्याची मागणी पुढे येत आहे. भाजीपाला पिकांच्या आवकेत वाढ झाल्याने व देशांर्तगत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला पिकांबाबतही शासनाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली जात आहे.

तालुक्यातील पश्चिम व दक्षिण भागात पाटपाण्यावर तर उत्तर-पूर्व भागात नैसर्गिक जलस्रोतांवरच शेतीचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या दोन वर्षांत गारपीट, वादळी व जोरदार पावसाचा फटका शेतीला बसला.

इन्फ...

उत्पन्नात घट होण्याची शक्यता

पिकवलेल्या व हाती आलेल्या पिकाला बाजारात भाव मिळत नसल्याने शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरला आहे.

शासनाच्या कृषी विभागाकडून मका, बाजरी, कापूस, सोयाबीन पिकांसाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी पीक प्रात्यक्षिके, शेतीशाळा, शेतकरी बैठका, डिजिटल माध्यमातून मार्गदर्शन, बियाणे बीजप्रक्रिया व कीडनियंत्रणासाठी अनुदान, पीकविमा योजना, तुषार व ठिबक सिंचनासाठी अनुदान, कांदाचाळ आदी उपक्रम, योजना राबविण्यात आल्या आहेत. तालुक्यात खरीप हंगामात ५ हजार २४१ इतका पीकविमा काढण्यात आला आहे. सद्य:स्थितीत काही भागात सोयाबीनला शेंगा लागल्या असून मक्याला बिट्ट्या आल्या आहेत. तर कांदा लागवडही सुरू आहे. तालुक्यातील सर्वच पिके रोगराईला बळी पडत असल्याचे चित्र असून अनेक ठिकाणी पावसाअभावी तर काही ठिकाणी अति पावसाने पिके धोक्यात आल्याचे चित्र आहे. यामुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फोटो- १० येवला खबरबात

100921\10nsk_36_10092021_13.jpg

फोटो- १० येवला खबरबात