शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

लोखंडी पूल धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:05 IST

तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्गामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, या पुलावरून जाताना दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

नाशिक : तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्गामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, या पुलावरून जाताना दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.  प्रभू रामचंद्र वनवास काळात शहरातील तपोवनात काही काळ वास्तव्यास होते. या परिसराला धार्मिक पौराणिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने देशभरातील पर्यटकांची या ठिकाणी कायम वर्दळ असते. पूल ओलांडून टेकडीवर असलेल्या राम, सीता, लक्ष्मण यांच्या प्रतिमेच्या भव्य प्रतिकृतींसोबत सेल्फी काढण्यासासाठी पर्यटक जात असल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या प्रतिकृतींजवळ पोहचण्यासाठी हा लोखंडी पुलाचा एकमेव मार्ग आहे. सध्या नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली असून, मागील महिन्यात आलेल्या पुरामुळे या पुलाची दुरवस्था होऊन पुलाचा मार्ग धोकादायक बनला आहे. पुलावर टाकलेले लाकडी बांबूही पाण्याने भिजून कमकुवत झाले आहेत. तर काही लाकडी फळ्या तुटल्या आहेत. याबरोबरच लोखंडी पुलाला असलेल्या साखळ्यांचे संरक्षण ही तुटले आहे. एकूणच या पुलावरून मार्गस्थ होताना कुठलाही आधार राहिलेला नाही. केवळ तोल सांभाळत धाडस करून तरुण ये-जा करताना दिसत आहे. मात्र अनवधानाने लक्ष विचलित होऊन किंवा पाय घसरून तोल गेल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांनी बॅरिकेड लावावे; पर्यटकांनी दक्षता घ्यावीशहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असून, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. रविवारी दिवसभर तसेच सोमवारी पहाटेपर्यंत पाऊस जोरात सुरू असल्यामुळे धरणातून विसर्गही वाढविला गेला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २३ मि.मी. इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला. सध्या धरणातून ३१२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, होळकर पुलापासून पुढे तपोवनापर्यंत साडेचार हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी प्रवाहित आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत हा पूल बंद ठेवण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी पुलाच्या प्रारंभी बॅरिकेड लावण्याची गरज आहे. पावसाळ्यानंतर महापालिकेने सदर पुलाची पुन्हा दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.