शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी पूल धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 01:05 IST

तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्गामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, या पुलावरून जाताना दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.

नाशिक : तपोवनमधील गोदावरी-कपिला संगम येथील गोदावरीवरील धोकादायक लोखंडी पुलाची पुराच्या पाण्यामुळे दुर्दशा झाली आहे. तरीदेखील काही तरु ण जीव धोक्यात घालून या पुलावरून नदी ओलांडत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पावसाची संततधार आणि गंगापूर धरणातून सुरू असलेला विसर्गामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, या पुलावरून जाताना दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.  प्रभू रामचंद्र वनवास काळात शहरातील तपोवनात काही काळ वास्तव्यास होते. या परिसराला धार्मिक पौराणिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने देशभरातील पर्यटकांची या ठिकाणी कायम वर्दळ असते. पूल ओलांडून टेकडीवर असलेल्या राम, सीता, लक्ष्मण यांच्या प्रतिमेच्या भव्य प्रतिकृतींसोबत सेल्फी काढण्यासासाठी पर्यटक जात असल्याचे येथील विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या प्रतिकृतींजवळ पोहचण्यासाठी हा लोखंडी पुलाचा एकमेव मार्ग आहे. सध्या नदीच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली असून, मागील महिन्यात आलेल्या पुरामुळे या पुलाची दुरवस्था होऊन पुलाचा मार्ग धोकादायक बनला आहे. पुलावर टाकलेले लाकडी बांबूही पाण्याने भिजून कमकुवत झाले आहेत. तर काही लाकडी फळ्या तुटल्या आहेत. याबरोबरच लोखंडी पुलाला असलेल्या साखळ्यांचे संरक्षण ही तुटले आहे. एकूणच या पुलावरून मार्गस्थ होताना कुठलाही आधार राहिलेला नाही. केवळ तोल सांभाळत धाडस करून तरुण ये-जा करताना दिसत आहे. मात्र अनवधानाने लक्ष विचलित होऊन किंवा पाय घसरून तोल गेल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांनी बॅरिकेड लावावे; पर्यटकांनी दक्षता घ्यावीशहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम असून, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक आहे. रविवारी दिवसभर तसेच सोमवारी पहाटेपर्यंत पाऊस जोरात सुरू असल्यामुळे धरणातून विसर्गही वाढविला गेला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत २३ मि.मी. इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात झाला. सध्या धरणातून ३१२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, होळकर पुलापासून पुढे तपोवनापर्यंत साडेचार हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी प्रवाहित आहे. यामुळे पावसाळ्यापर्यंत हा पूल बंद ठेवण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी पुलाच्या प्रारंभी बॅरिकेड लावण्याची गरज आहे. पावसाळ्यानंतर महापालिकेने सदर पुलाची पुन्हा दुरुस्ती करून पर्यटकांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.