शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

शहरातील सव्वा लाख शिधापत्रिकांची चौकशी

By admin | Updated: July 18, 2014 00:33 IST

शहरातील सव्वा लाख शिधापत्रिकांची चौकशी

नाशिक : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अन्नसुरक्षा कायद्यान्वये पात्र ठरलेल्या शहरातील शिधापत्रिकांची व त्यांच्या धारकांची चौकशी करण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतला असून, त्यासाठी रेशन दुकाननिहाय शिधापत्रिकाधारकांची यादी मागविण्यात आली आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून ही योजना लागू झाली आहे. या कायद्यान्वये पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकाला दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्यासाठी ग्रामीण व शहरी नागरिकांसाठी वेगवेगळे निकष ठरविण्यात आले आहेत. विशेष करून ग्रामीण भागातील जवळपास सर्वच कुटुंबे या योजनेसाठी पात्र ठरली असली, तरी शहरासाठी लागू असलेले निकष पाहता, त्यात बोगस लाभार्थी असण्याची दाट शक्यता पुरवठा खात्याला वाटू लागली आहे. कारण ग्रामीण भागात या योजनेसाठी पात्र ठरलेल्या व्यक्तींची नावे ग्रामसभेत वाचून दाखविण्यात आली असून, पात्र न ठरणारी कुटुंबे यादीतून कमी करण्यात आली आहेत. शहरी भागात मात्र या योजनेत कोण पात्र ठरले याचे सामाजिक लेखापरीक्षण झालेले नाही. नाशिक शहरातील जवळपास सव्वाचार लाख लोकसंख्येला या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येऊन त्यासाठी सव्वा लाख शिधापत्रिकांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. यातील बहुतांशी शिधापत्रिका रेशन दुकानदारांच्या फायद्यासाठीच असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. अन्नसुरक्षा कायद्यान्वये पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांची यादी प्रत्येक रेशन दुकानाबाहेर तसेच प्रभागातील मध्यवर्ती ठिकाणी प्रसिद्ध करण्याचा मानस पुरवठा अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला असून, त्यातून या योजनेसाठी खऱ्याखुऱ्या पात्र व्यक्तींना लाभ होऊन ज्यांना गरज नाही त्यांची नावे कमी करण्यात येणार आहेत. या तपासणीतून मात्र दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे तसेच अन्नपूर्णा व अंत्योदय योजनेच्या लाभार्थींना वगळण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)