शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

स्थानकात आगोदरच जागा अपुरी; आडव्या-तिरप्या उभ्या लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:19 IST

नाशिक : बसेस कोणत्या फलाटावर उभ्या कराव्यात, बस उभी करताना फ्लॅटफॉर्मवरच बस उभी राहील अशी व्यवस्था करण्यात आलेली असतानाही ...

नाशिक : बसेस कोणत्या फलाटावर उभ्या कराव्यात, बस उभी करताना फ्लॅटफॉर्मवरच बस उभी राहील अशी व्यवस्था करण्यात आलेली असतानाही जुने सीबीएस तसेच नवीन सीबीएस येथील बसस्थानकामध्ये बसचालकांकडून बेशिस्तपणे बसेस उभ्या केल्याचे दिसून येते. याचा त्रास स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो.

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या बसफेऱ्या आता पूर्वपदावर येत आहेत. जवळपास ८० टक्के प्रवासी वाहतूक सुरू झाली असल्यामुळे साहजिकच स्थानकांवरील बसेसेची ये-जा वाढलेली आहे. स्थानकात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असले तरी स्थानक आवारात उभ्या राहणाऱ्या अस्ताव्यस्त बसेसमुळे प्रवाशांची धावाधाव होते.

जुने सीबीएस स्थानकात काही बसेस प्रवेशद्वारालगतच, तर काही बसेस या शौचालयाच्या बाजूला उभ्या केल्या जातात. प्लॅटफॉर्मवर अर्धवट स्थितीत उभ्या केलेल्या बसेसमुळे इतर बसेसचे फलकही दिसत नाहीत. ठक्कर बाजार अर्थात नवीन सीबीएसमध्ये तर गाड्यांचे मोठे कोंडाळे असते. हव्या तिथे बसेस उभ्या केल्या जातात. प्लॅटफॉर्मवरून गाडी रिव्हर्स घ्यावी लागते. त्यामुळे तर पाठीमागे उभ्या असलेल्या बसेसची अडचण होते.

--कोट--

प्रवाशांची प्रतिक्रिया

स्थानकात येणाऱ्या बसेस नेमक्या कुठे उभ्या राहतील हे सांगता येत नाही. त्यामुळे आलेल्या बसेसच्या मागे पळत जावे लागते. गावानुसार प्लॅटफार्म तयार करण्यात आलेले आहेत, मात्र समोर उभ्या राहणाऱ्या बसेसमुळे बसमधील फलकही दिसत नाही. प्रत्येकवेळी नवीन बस आली की गाडीवर फलक बघायला धावत जावे लागते.

-मनीष निरगुडे, प्रवासी

नवीन सीबीएस स्थानकाच्या आवारात उभ्य राहणाऱ्या बसेसची गर्दी अधिक असते. या गर्दीतून मार्ग काढत जावे लागते. कधी बस रिव्हर्स येईल हे सांगता येत नाही. प्लॅटफॉर्मव्यक्तिरिक्त चालक इतर ठिकाणी जागा दिसेल तेथे बस उभी करतात. कुणाला काही विचाराचीदेखील सोय नसते. कुणाला काहीही माहीत नसल्याचा अनुभव नेहमीच येतो.

- श्रीपत गायखे, प्रवासी

--इन्फो--

उद्घाेषणा उरली नावालाच

बसस्थानकात आलेली बस तसेच जाणारी बस यांची माहिती देण्यासाठीची उद्घोषणा कधी बंद तर कधी सुरू असते. बसेसची माहिती खिडकीतील कर्मचाऱ्यांनाही पुरेशी नसते. नवीन बसस्थानकाचे आवार मोठे असले तरी शिवशाहीसारख्या मोठ्या बसेस वळताना आणि रिव्हर्स येतांना प्रवाशांनाच धावाधाव करावी लागते. उद्घाेषणा तर नावालाच उरली आहे.