शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

अकार्यक्षम नगरसेवकांची तिकिटे कापणार ?

By admin | Updated: January 29, 2017 22:58 IST

वाढती स्पर्धा : सुमारे २५ नगरसेवकांचा होणार पत्ता कट

नाशिक : महापालिका निवडणुकीत प्रामुख्याने सेना-भाजपात उमेदवारी मिळविण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा दिसून येत आहे. याशिवाय मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही तिकिटासाठी बऱ्यापैकी गर्दी झालेली आहे. मात्र, या सर्वच राजकीय पक्षांकडून गेल्या पाच वर्षांत कर्तृत्वाचा ठसा उमटू न शकलेल्या अकार्यक्षम नगरसेवकांना घरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यमान सुमारे २५ नगरसेवकांची तिकिटे कापली जाण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत प्रत्यक्ष याद्या जाहीर झाल्यानंतर त्याबाबतचे वास्तव समोर येईल.  महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रमही आटोपला आहे. आता प्रत्यक्ष तिकिटाच्या स्पर्धेत कोण टिकतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. प्रामुख्याने, सेना-भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे. निवडणुकीपूर्वी पक्षांतराला वेग येऊन आतापर्यंत ४३ नगरसेवकांनी पक्षनिष्ठेला तिलांजली दिलेली आहे. त्यात शिवसेनेकडे १७, तर भाजपात ९ नगरसेवक दाखल झालेले आहेत. पक्षांतराचा सर्वाधिक फटका मनसेला बसून त्यांचे २८ नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. सेना-भाजपात तिकिटासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना पक्षात एण्ट्री दिल्याने दोन्ही पक्षांतील निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आता उमेदवारी घोषित होण्याची प्रतीक्षा होत असतानाच सुमारे २५ विद्यमान नगरसेवकांची अकार्यक्षमता, पुन्हा निवडून न येण्याची क्षमता या गोष्टी लक्षात ठेवून त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामध्ये १८ महिला नगरसेवकांचाच समावेश असल्याचे समजते. प्रामुख्याने, सेना-भाजपात गेलेल्या काही नगरसेवकांना तिकीट न मिळण्याची चर्चा होत आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादीतही काही नगरसेवकांना नारळ देऊन निरोप दिला जाण्याची शक्यता आहे. सेना-भाजपात दाखल झालेल्या मनसेच्या काही नगरसेवकांची पंचवार्षिक कारकीर्द यथातथाच राहिल्याने त्यांना पुन्हा तिकिटे देण्यास पक्षातूनच विरोध होत आहे. पक्षाने जर त्यांना तिकिटे नाकारली तर त्यांची स्थिती ‘ना घरका ना घाटका’ अशी होणार आहे. कारण, मनसेने पक्ष सोडून गेलेल्या नगरसेवकांना पुन्हा पक्षात न घेण्याचे याआधीच जाहीर केले आहे. येत्या दोन दिवसांत राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल, त्यावेळी कुणाचा पत्ता कट झाला, याचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत संबंधितांनी मात्र धसका घेतला आहे.काही नगरसेवकांची विश्रांतीसन २०१२-१७ या पंचवार्षिक काळात महापालिका सभागृहातील पाच नगरसेवकांना राज्य विधिमंडळात जाण्याचे भाग्य लाभले. त्यात, भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल अहेर व अपूर्व हिरे यांचा समावेश आहे. त्यामुळे यंदा महापालिका निवडणुकीत हे पाचही आमदार रिंगणात नसतील. त्यांच्याऐवजी त्यांचे वारसदार प्रभागाचा भार सांभाळण्याची शक्यता आहे. याशिवाय, शिवसेनेचे शिवाजी सहाणे, रिपाइंच्या ललिता भालेराव यांनी पुन्हा निवडणूक न लढविण्याचे सभागृहातच जाहीर केले आहे. तर विद्यमान नगरसेवकांपैकी सुमारे १८ ते २० नगरसेवकांकडून विश्रांती घेणे पसंत केले असल्याचे समजते. त्यांच्याऐवजी कुटुंबातील कुणीतरी सदस्य निवडणूक रिंगणात दिसेल.