शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उत्पन्नवाढीसाठी व्हावी पर्यायी उपायांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:00 IST

कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्षभर बंद असल्याने त्यातूनदेखील उत्पन्न शून्य आहे.

नाशिक : कालिदास कलामंदिरात खानपान टाळण्याच्या उद्देशाने कंपन्यांचे गॅदरिंग, शालेय स्नेहसंमेलने, दिवसभराच्या व्यावसायिक कार्यशाळा बंद करण्यात आल्याने उत्पन्न बुडत आहे. तसेच कालिदासला लागूनच असलेले महात्मा फुले कलादालन, तर वर्षभरात तीन-चार कार्यक्रम वगळता वर्षभर बंद असल्याने त्यातूनदेखील उत्पन्न शून्य आहे. त्यामुळे या दोन्ही बाबींची व्यवस्थित सांगड घालत फुले कलादालनाचा कल्पक वापर केला, तर कालिदास कलामंदिराला आत्मनिर्भर करणे शक्य आहे.कालिदास कलामंदिराला आत्मनिर्भर करण्यासाठी केवळ तेथील व्यावसायिक नाटकांवरच अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. मात्र, त्यासाठी महापालिकेला कालिदास आणि त्याशेजारील फुले कलादालनाचा कल्पक वापर करण्याची आवश्यकता आहे. गॅदरिंग, स्नेहसंमेलने, कार्यशाळांची खानपान व्यवस्था फुले कलादालनाखालील जागेत करून ते कार्यक्रमदेखील प्राइम टाइम नसलेल्या दुपारच्या सत्रांमध्ये घेण्यास कुणाचीच हरकत राहणार नाही. तसेच कालिदासचे उत्पन्नदेखील वाढू शकेल. महानगरातील सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या आणि कलाप्रेमी नागरिकांची भूक वाढत असताना फुले कलादालन वर्षभर जवळपास बंद अवस्थेत पडून राहणे कितपत योग्य आहे. महापालिकेच्या या कोट्यवधींच्या मिळकती अशा धूळ खात पडण्यापेक्षा त्यांचा समर्पक वापर करण्यासाठी कला क्षेत्राशी निगडीत मान्यवरांची आणि त्या विषयांवर काम करू इच्छिणाऱ्यांसह त्याकरिता वेळ देऊ शकणाऱ्यांची समिती गठीत करून त्यांच्या अहवाल आणि मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.सिनेनाट्यगृहाच्या पर्यायाचाही विचार व्हावाएकीकडे कालिदाससारखे अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण नाट्यगृह सकाळ आणि दुपारच्या दोन सत्रांमध्ये प्रामुख्याने रिकामेच असते. केवळ शनिवारी आणि रविवारच्या दोन दिवसांतच त्यात दोन किंवा तीन सत्रांमध्ये नाटके किंवा कार्यक्रम होतात, तर दुसरीकडे हल्ली सामान्य नागरिकाला मल्टिफ्लेक्समध्ये जाऊन एकेका तिकिटाला २५०-३०० रुपये याप्रमाणे कुटुंबासह सिनेमा बघण्यासाठी दीड हजार रुपये एकावेळी खर्च करणे परवडत नाही. मग अशा सामान्य नागरिकांसाठी १००-१५० रुपयांमध्ये चित्रपटांचे दोन शो सकाळी व दुपारच्या वेळेत ठेवले तरी अनेक बाबी शक्य होतील. मुंबई आणि ठाण्यात अशा प्रकारच्या पर्यायांवर विचारमंथन होत आहे. त्यासाठी व्यासपीठावर काही किरकोळ बदल तसेच मंजुरी घेण्यासह विशेष परवानग्या घेऊन मगच त्याची अंमलबजावणी करावी लागेल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcultureसांस्कृतिक