शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

गिरीश महाजन : सिन्नर तालुक्यातील नुकसानीची पाहणी

By admin | Updated: March 16, 2015 01:21 IST

आणेवारीची पद्धत बदलण्याचे प्रयत्न

सिन्नर : बेमोसमी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल. शाश्वत शेतीसाठी शेडनेटचा पर्याय व राष्ट्रीय विमा योजना राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, आणेवारीची पद्धतही बदलण्यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.सलग तीन दिवस सिन्नर तालुक्यात बेमोसमी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी रविवारी सकाळी तालुक्याच्या पूर्वभागात दौरा केला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी त्यांच्या सोबत आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार माणिकराव कोकाटे, वसंत गिते, पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे, उपसभापती राजेंद्र घुमरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण, भाऊसाहेब शिंदे, पद्माकर गुजराथी, गंगाधर वरंदळ, विजय काटे, आनंदा कांदळकर, नवनाथ गडाख यांच्यासह जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशावह, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.शुक्रवारी सायंकाळी सिन्नरच्या पूर्वभागात गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकांची पाहणी करण्यासाठी महाजन यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख आले होते. पंचाळे, शिंदेवाडी, शहा, उजनी, दहीवाडी, सांगवी, सोमठाणे व खडांगळी आदि भागांत त्यांनी द्राक्षे, डाळींबबागांसह गहू, कांदा, हरबरा, मका या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ अनेक संकटे येत आहेत. अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे महाजन म्हणाले. बेमोसमी पावसामुळे राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात झाल्याचे ते म्हणाले. सिन्नरच्या पूर्वभागात दुष्काळी शेतकऱ्यांनी ठिबक व शेततळ्याच्या पाण्यावर शेती उभी केली होती. त्यांची मोठी हानी झाल्याने शेतकऱ्यांचे सांत्वन कोणत्या शब्दात करावे हे आपल्याला सुचत नसल्याचे ते म्हणाले. पंचनामे करताना कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आपण महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई देता येणे शक्य नाही मात्र शासनाच्या नियमानुसार शक्य तितकी मदत शेतकऱ्यांना तत्काळ देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. सतत येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शेडनेटचा पर्याय योग्य असून, शेतकऱ्यांची अल्प रक्कम व शासनाचे अनुदान यातून शेडनेट उभारणीची योजना राबविण्यासाठी विचार करीत आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारची राष्ट्रीय विमा योजना राज्यात राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर)