शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मालेगावी शाळा बंद करण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST

शासनाच्या परिपत्रक दिनांक ५ जुलै व १० ऑगस्ट २०२१ नुसार शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग ...

शासनाच्या परिपत्रक दिनांक ५ जुलै व १० ऑगस्ट २०२१ नुसार शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग व ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे वर्ग कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे परिपत्रकातील अटी व शर्तीनुसार सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाचे आदेश असताना, महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानाचे काही कर्मचारी शहरातील विविध शाळांना अचानक भेट देत असून शाळा बंद करण्याबाबत मुख्याध्यापकांना धमकावत आहेत. यासंदर्भात माध्यमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष आर.डी. निकम व पदाधिकाऱ्यांनी गुरुवार, शुक्रवार व शनिवारी महानगरपालिकेच्या आयुक्त, उपायुक्त यांना यासंदर्भात भेटण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे मनपाचे प्रशासन अधिकारी फ्रान्सिस चव्हाण यांची भेट घेतली. त्यांनी कर्मचाऱ्यांना आपण शाळा सुरू आहेत किंवा बंद आहेत या संदर्भात बघायला सांगितले होते. त्यांना शाळा बंद करण्याबाबत सांगितले नव्हते असे स्पष्ट केले, यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व एम.आय.एमच्या काही नगरसेवकांनी धारेवर धरत मनपा शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली,

शुक्रवारी ( दि.१७ ) मालेगाव गर्ल्स हायस्कूलला आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना शाळा बंद करण्यास सांगितल्याने शाळेत प्रचंड घबराट निर्माण झाली. शाळेत प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क केला. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली असता त्यांनी आपण अशा प्रकारचे कुठलेही आदेश दिले नसल्याचे सांगितले.

इन्फो

मनपा आयुक्तांना निवेदन

मालेगाव गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक लियाकत यांनी सांगितले की, पोलीस व मनपाचे प्रशासन अधिकारी, कर्मचारी आमच्या शाळेत येऊन वारंवार शालेय कामकाजात व्यत्यय निर्माण करत आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनी व मनपा आयुक्तांनी तत्काळ दखल घेऊन शासन निर्णयाप्रमाणे योग्य ते आदेश काढावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि.२०) संघटनेचे पदाधिकारी यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन शाळा सुरू करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आमदार मौलाना मुफ्ती मोहमद, राज्य उपाध्यक्ष आर.डी. निकम, तालुकाध्यक्ष निंबा बोरसे,जाहीर हुसेन, फयाज, शाहिद, नईमुररहमान,शफीक, एजाज नासीर, निजाम, जलीसुरहमान, शंकर खैरनार, जयेश सावंत, शिदीक भाई, उबेदूरराहमान आदी उपस्थित होते.

कोट...

खबरदारी घेऊन शाळा चालू करण्याचे परिपत्रक शासनाने काढलेले असून मालेगावातील मनपा कर्मचारी हकनाक शाळा बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भासते. मुलांचे शिक्षण त्यांच्या मानसिक, शारीरिक, सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण असून मालेगावातील शाळा पूर्ण काळजी घेऊन शिक्षण देत असतांना मनपाने शाळा बंद पडण्याचा घाट का घातला?

- आर.डी. निकम, राज्यउपाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघ

फोटो- २० मालेगाव स्कूल

200921\20nsk_58_20092021_13.jpg

फोटो- २० मालेगाव स्कूल