शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणचे बकाल स्वरूप कायम

By admin | Updated: November 12, 2016 21:43 IST

सातपूर, एमआयडीसी : टाउन हॉल धूळ खात, भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण

गोकुळ सोनवणे  सातपूरसातपूर गावठाण आणि आजूबाजूच्या झोपडपट्ट्या असलेल्या या परिसराचे नेतृत्व गेल्या २५ वर्षांत काँग्रेस, शिवसेना, भाजपा, माकपा, मनसे अशा सर्वच राजकीय पक्षांनी केलेले आहे. त्यात स्वारबाबानगरात रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांनी तब्बल २० वर्षे प्रभागात स्थान निर्माण केले. गावठाण आणि झोपडपट्ट्यांना सोयी, सुविधा मिळाल्यात परंतु अपेक्षित विकास मात्र होऊ शकला नाही. सातपूर गावातील भाजी विक्रेत्यांचे अतिक्र मण आणि श्री छत्रपती शिवाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्या गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. गेल्या २० वर्षांपासून कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला टाउन हॉल अजूनही अक्षरश: धूळ खात पडून आहे.महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नव्याने प्रभागरचना आणि आरक्षण घोषित करण्यात आले आहे. त्यात पूर्वीचा प्रभाग क्र मांक २० संपूर्ण आणि प्रभाग क्रमांक ५० मधील सातपूर गाव, महादेववाडी, तर प्रभाग क्रमांक १९ मधील सातपूर कॉलनी, एमआयडीसी कॉलनी जोडून प्रभाग क्रमांक ११ ची निर्मिती करण्यात आली आहे. प्रभागात प्रबुद्धनगर, जगतापवाडी, महादेवनगर,संतोषीमातानगर, कांबळेवाडी या झोपडपट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. आरक्षणाचा विचार केल्यास प्रभागातील चारही जागांवर आरक्षण टाकण्यात आले आहे. त्यातील दोन जागांवर अनुसूचित जाती महिला, व सर्वसाधारण महिला, तर अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या दोन जागांपैकी ओबीसीच्या एका जागेवर उड्या पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यात सर्वसमावेशक उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. या प्रभागात समस्यादेखील मोठ्या प्रमाणात आहेत. अंतर्गत राजकारणामुळे विकास खुंटल्याची भावना व्यक्त होत आहे. एमआयडीसी याच भागात येत असल्याने तेथील पथदीप, घंटागाडी, रस्ते, साइडपट्ट्या आदि समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. एमआयडीसीत अद्याप भुयारी गटार योजना अंमलात आणलेली नाही, अशी उद्योजकांची ओरड आहे. मनपा विभागीय कार्यालयाशेजारीच २० वर्षांपूर्वी टाउन हॉल उभारण्यात आला असून, अजूनही त्याचे लोकार्पण झालेले नाही. सातपूर गावातील मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या समस्या २५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हा विषय अद्याप सुटलेला नाही. स्मार्ट सिटीकडे आगेकूच होत असताना गावठाण आणि झोपडपट्ट्यांना बकालपणा अजूनही कायम आहे.

.महापालिकेच्या निवडणुकीत ज्या- ज्यावेळी प्रभागरचना आणि आरक्षण घोषित झाले तसे या भागाचे कधी विभाजन तर कधी जोडणी झाल्याने मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधींना संधी मिळालेली आहे. ११९२ साली झालेल्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे रामचंद्र निगळ, दिलीप निगळ आणि माकपाच्या अ‍ॅड. वसुधा कराड यांनी या भागाचे नेतृत्व केले आहे. १९९७ सालीदेखील काँग्रेसच्या मंगला निगळ, रिपाइंचे प्रकाश लोंढे, भाजपाच्या कमल विधाते यांनी प्रतिनिधित्व केले आहे. २००२ च्या त्रिसदस्यीय निवडणुकीत माकपाच्या अ‍ॅड. वसुधा कराड, रिपाइंचे प्रकाश लोंढे आणि शिवसेनेचे सुरेश भंदुरे यांना मतदारांनी पसंती दिली होती. २००७ च्या निवडणुकीत अपक्ष सुवर्णा मोराडे, तसेच रिपाइंचे प्रकाश लोंढे, बसपाच्या सुजाता काळे यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. २००२ च्या द्विसदस्यीय प्रभागरचनेत या परिसराचे विभाजन झाल्याने रिपाइंचे प्रकाश लोंढे आणि मनसे लाटेत सविता काळे निवडून आल्या. म्हणजेच गेल्या २० वर्षांपासून प्रतिनिधित्व करणारे रिपाइंचे नगरसेवक प्रकाश लोंढे यांना नव्याने झालेल्या प्रभागरचनेचा आणि आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे.