शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो द्राक्ष, कांदा, भाजीपाला जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:51 IST

नाशिक : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली असून, ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ५८ हजार हेक्टरवर द्राक्ष लागवड झाालेली आहे. ढगाळ वातावरणाचा गहू, हरभऱ्यापेक्षाही द्राक्ष, नवीन लागण झालेला कांदा, कांदा रोप आणि भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या पिकांवर डावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहवामानाचा फटका : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

सध्या द्राक्ष पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी द्राक्षामध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि बेमोसमी पावसामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत असून, वातावरण निवळल्यानंतर मण्यांना क्रॅक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली असून कांद्याच्या उगवणक्षमतेवरही वातावरणाचा परिनाम होऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप पातळ पडले आहे. काही ठिकाणी रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वच प्रकारच्या भाजीपाला आणि फळ पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम जाणवू लागला आहे. अशा वातावरणात भाजीपाला पीक लवकर रोगांना बळी पडत असल्याने शेतकऱ्यांनी विविध कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील पीकनिहाय रब्बीचे क्षेत्र (हेक्टर)गहू - २८,६५५हरभरा - १९,६८९ज्वारी - २,१७५कांदा - ७८,४७९.४५द्राक्षाला सर्वाधिक फटकामागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही भागात तर सूर्यदर्शनच झालेले नाही. यात मागील दोन दिवसात जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, कांदा, गहू आणि भाजीपाला ही पिके धोक्यात आली आहेत. सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पदकांना बसला असून, शेतकऱ्यांना दररोज वेगवेगळी कीटकनाशक आणि पोषकांची फवारणी करावी लागत आहे.प्रमाणित कीटकनाशकांची फवारणी कराढगाळ वातावरणापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित कीटकनाशकांची वेळच्या वेळी फवारणी करावी. द्राक्षबागांमधील तपमान स्थिर रहाण्यासाठी उपाययोजना कराव्यात भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळीच औषध फवारणी करावी.ढगाळ वातावरणाचा द्राक्ष, कांदा, भाजीपाला, कांदा रोप, नवीन लागवड केलेला कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती