शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो द्राक्ष, कांदा, भाजीपाला जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:51 IST

नाशिक : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली असून, ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ५८ हजार हेक्टरवर द्राक्ष लागवड झाालेली आहे. ढगाळ वातावरणाचा गहू, हरभऱ्यापेक्षाही द्राक्ष, नवीन लागण झालेला कांदा, कांदा रोप आणि भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या पिकांवर डावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देहवामानाचा फटका : पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

सध्या द्राक्ष पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी द्राक्षामध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि बेमोसमी पावसामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत असून, वातावरण निवळल्यानंतर मण्यांना क्रॅक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली असून कांद्याच्या उगवणक्षमतेवरही वातावरणाचा परिनाम होऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप पातळ पडले आहे. काही ठिकाणी रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वच प्रकारच्या भाजीपाला आणि फळ पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम जाणवू लागला आहे. अशा वातावरणात भाजीपाला पीक लवकर रोगांना बळी पडत असल्याने शेतकऱ्यांनी विविध कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे. जिल्ह्यातील पीकनिहाय रब्बीचे क्षेत्र (हेक्टर)गहू - २८,६५५हरभरा - १९,६८९ज्वारी - २,१७५कांदा - ७८,४७९.४५द्राक्षाला सर्वाधिक फटकामागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही भागात तर सूर्यदर्शनच झालेले नाही. यात मागील दोन दिवसात जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, कांदा, गहू आणि भाजीपाला ही पिके धोक्यात आली आहेत. सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पदकांना बसला असून, शेतकऱ्यांना दररोज वेगवेगळी कीटकनाशक आणि पोषकांची फवारणी करावी लागत आहे.प्रमाणित कीटकनाशकांची फवारणी कराढगाळ वातावरणापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित कीटकनाशकांची वेळच्या वेळी फवारणी करावी. द्राक्षबागांमधील तपमान स्थिर रहाण्यासाठी उपाययोजना कराव्यात भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळीच औषध फवारणी करावी.ढगाळ वातावरणाचा द्राक्ष, कांदा, भाजीपाला, कांदा रोप, नवीन लागवड केलेला कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती