शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 17:50 IST

पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून व रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देजीव धोक्यात : खंडित, अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा परिणाम

यावर्षी खरीप हंगामात परतीच्या अवकाळी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, तसेच पोळ कांदा व कांदा रोप सडून खराब झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. केलेला खर्चही वसूल न झाल्याने खरिपाची तूट भरून काढण्यासाठी शेतकरी वर्गाने महागडे कांदा बियाणे उपलब्ध करीत कांदा रोप तयार केले व मोठ्या प्रमाणात रांगडा कांदा तसेच उन्हाळ कांद्याची लागवड केली. गहू हरभरा पिकाची पेरणी केली. पिकेही चांगली आहेत; मात्र पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचा जागता पहारा द्यावा लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी वर्गाने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. आजमितीस पिकांना पाणी देणे गरजेचे आहे; परंतु दिवसभर वारंवार खंडित होणारा अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे जागरण करीत पिकांना पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीजपंप जळण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती