शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 17:50 IST

पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून व रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देजीव धोक्यात : खंडित, अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा परिणाम

यावर्षी खरीप हंगामात परतीच्या अवकाळी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, तसेच पोळ कांदा व कांदा रोप सडून खराब झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. केलेला खर्चही वसूल न झाल्याने खरिपाची तूट भरून काढण्यासाठी शेतकरी वर्गाने महागडे कांदा बियाणे उपलब्ध करीत कांदा रोप तयार केले व मोठ्या प्रमाणात रांगडा कांदा तसेच उन्हाळ कांद्याची लागवड केली. गहू हरभरा पिकाची पेरणी केली. पिकेही चांगली आहेत; मात्र पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचा जागता पहारा द्यावा लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी वर्गाने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. आजमितीस पिकांना पाणी देणे गरजेचे आहे; परंतु दिवसभर वारंवार खंडित होणारा अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे जागरण करीत पिकांना पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीजपंप जळण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती