शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना करावा लागतोय रात्रीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 17:50 IST

पाटोदा : विहिरी तसेच बोअरवेलला मुबलक पाणी असूनही केवळ वीज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे दिवसा खंडित तसेच अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने रब्बी हंगामातील पिके सुकू लागल्याने शेतकरी वर्गाला पिकांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून व रात्रीचा दिवस करून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देजीव धोक्यात : खंडित, अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा परिणाम

यावर्षी खरीप हंगामात परतीच्या अवकाळी पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामातील बाजरी, सोयाबीन, मका, तसेच पोळ कांदा व कांदा रोप सडून खराब झाल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. केलेला खर्चही वसूल न झाल्याने खरिपाची तूट भरून काढण्यासाठी शेतकरी वर्गाने महागडे कांदा बियाणे उपलब्ध करीत कांदा रोप तयार केले व मोठ्या प्रमाणात रांगडा कांदा तसेच उन्हाळ कांद्याची लागवड केली. गहू हरभरा पिकाची पेरणी केली. पिकेही चांगली आहेत; मात्र पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचा जागता पहारा द्यावा लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरी, बोअरवेल तसेच साठवण तलावातील पाण्याची उपलब्धता पाहून शेतकरी वर्गाने रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. आजमितीस पिकांना पाणी देणे गरजेचे आहे; परंतु दिवसभर वारंवार खंडित होणारा अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे जागरण करीत पिकांना पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अनियमित व कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे वीजपंप जळण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती