शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संकटाचा सामना : हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड यशस्वी

By admin | Updated: April 11, 2015 00:38 IST

शंभर दिवसात एक लाखाचे उत्पन्न

खामखेडा : दोन वर्षापासून कधी गारपिटीने तर कधी अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांनी खामखेडासह परिसराला चांगलाच फटका बसला आहे. तरी या संकटांवर मात करून खामखेडा येथील शेतकरी अशोक अहिरे यांनी हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. बेभरवश्याच्या काकडी पिकातून अवघ्या शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेत नैसर्गिक संकटापुढे हार न मानता चांगले उत्पन्न घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाचा लहरीपणा अलीकडे वाढला आहे. तरीही प्राप्त परिस्थितीत आपले कौशल्य पणाला लावून उत्कृष्ट नियोजन करणारे शेतकरी असतात. खामखेडा येथील अशोक अहिरे यांनी आपल्या वीस गुंठे हरितगृहात काकडीचे पीक यशस्वी घेत शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेतले आहे. वीस गुंठ्यात काकडीची लागवडयावर्षी वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड करण्याचे ठरवले. पाच फुटाच्या अंतरावर चाळीस मीटर लांबीच्या अठ्ठावीस बेड तयार केले. पुणे येथून नेदर्लंड सीड्स कंपनीच्या नऊ रु पये किमतीचे बियाणे घरी तयार करत पंचवीस जानेवारीला या बेडवर दोन बाय दीड फुटावर रोपांची लागवड केली. काकडी पंधरा फुटापर्यंत वाढत असल्याने या वनस्पतीचा वेल त्यांनी हरितगृहवरील लावलेल्या अ‍ॅँगलला प्लॅस्टिक दोराच्या साहाय्याने चढवली. काकडीची वेलीची रोजच वाढ होत असल्याने त्यांनी काळजी घेतली. पिकाची चौदा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. ठिबक सिंचनातून पाणी व विद्राव्य खते दिली जातात. त्यामुळे झाडाची वाढ होण्यासाठी, चांगली फळधारणा होण्यासाठी शेणखताबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये दिलीत. लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसांत पीक निघण्यास सुरवात होते. (वार्ताहर)काकडीवर येणारे रोग, कीड, डावन्या, भुऱ्या, पांढरी माशी इत्यादी रोगांना बळी पडते; मात्र योग्य वेळी निरीक्षणातून लक्षणे दिसू लागताच फवारणी केल्यास लवकर रोग आटोक्यात येतात. याव्यतिरिक्त या पिकावर फवारणीची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर पिकांच्या तुलनेत काकडीला कीडनाशके व खते कमी लागतात. उत्पादन सुरू झाल्यानंतर जास्तीस जास्त दोन महिने या पिकापासून उत्पादन निघते. अहिरे यांनी पंचावन्न दिवसांत दहा तोडे घेतले असून, एका तोड्यास सुमारे दीड टन अशी वीस गुंठ्यात त्यांना पंधरा टन काकडीचे उत्पादन मिळाले आहे. या पिकामध्ये फळांची तोडणी करणे खूप चिवट काम आहे. पंधरा फुटापर्यंत उंच वाढलेल्या वेलीवरून एकेक फळ काढताना सतत वरच्या दिशेला पाहून शिडी अथवा स्टूलच्या साहाय्याने तोडणी करावी लागते. त्यामुळे ह्या कामासाठी आठ मजूर कायमस्वरूपी लागत असल्याचे असल्याचे अहिरे यांचे चिरंजीव रवींद्र यांनी सांगितले. काकडीस पहिल्यांदा पस्तीस ते चाळीस रु पये बाजारभाव मिळाला आणि दोन महिन्यात सरासरी तीस रुपयांपर्यंत बाजार मिळाला. प्लॅस्टिक पाऊचमध्ये भरणा करत संपूर्ण माल त्यांनी व्यापाऱ्यामार्फत मुंबई येथेच विक्री केला. लागवडीपासून काढणीपर्यंत अहिरे यांना एक लाख रु पये खर्च आला तर खर्च वजा जाता अवघ्या वीस गुंठ्यात शंभर दिवसाच्या पिकातून चार ते साढेचार लाखाचे उत्पादन काढले आहे.