शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

संकटाचा सामना : हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड यशस्वी

By admin | Updated: April 11, 2015 00:38 IST

शंभर दिवसात एक लाखाचे उत्पन्न

खामखेडा : दोन वर्षापासून कधी गारपिटीने तर कधी अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक संकटांनी खामखेडासह परिसराला चांगलाच फटका बसला आहे. तरी या संकटांवर मात करून खामखेडा येथील शेतकरी अशोक अहिरे यांनी हरितगृहात वीस गुंठे क्षेत्रात काकडीचे पीक यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. बेभरवश्याच्या काकडी पिकातून अवघ्या शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेत नैसर्गिक संकटापुढे हार न मानता चांगले उत्पन्न घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. निसर्गाचा लहरीपणा अलीकडे वाढला आहे. तरीही प्राप्त परिस्थितीत आपले कौशल्य पणाला लावून उत्कृष्ट नियोजन करणारे शेतकरी असतात. खामखेडा येथील अशोक अहिरे यांनी आपल्या वीस गुंठे हरितगृहात काकडीचे पीक यशस्वी घेत शंभर दिवसांत चार लाखाचे उत्पादन घेतले आहे. वीस गुंठ्यात काकडीची लागवडयावर्षी वीस गुंठे क्षेत्रावर काकडीची लागवड करण्याचे ठरवले. पाच फुटाच्या अंतरावर चाळीस मीटर लांबीच्या अठ्ठावीस बेड तयार केले. पुणे येथून नेदर्लंड सीड्स कंपनीच्या नऊ रु पये किमतीचे बियाणे घरी तयार करत पंचवीस जानेवारीला या बेडवर दोन बाय दीड फुटावर रोपांची लागवड केली. काकडी पंधरा फुटापर्यंत वाढत असल्याने या वनस्पतीचा वेल त्यांनी हरितगृहवरील लावलेल्या अ‍ॅँगलला प्लॅस्टिक दोराच्या साहाय्याने चढवली. काकडीची वेलीची रोजच वाढ होत असल्याने त्यांनी काळजी घेतली. पिकाची चौदा फुटांपर्यंत वाढ झाली आहे. ठिबक सिंचनातून पाणी व विद्राव्य खते दिली जातात. त्यामुळे झाडाची वाढ होण्यासाठी, चांगली फळधारणा होण्यासाठी शेणखताबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्ये दिलीत. लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसांत पीक निघण्यास सुरवात होते. (वार्ताहर)काकडीवर येणारे रोग, कीड, डावन्या, भुऱ्या, पांढरी माशी इत्यादी रोगांना बळी पडते; मात्र योग्य वेळी निरीक्षणातून लक्षणे दिसू लागताच फवारणी केल्यास लवकर रोग आटोक्यात येतात. याव्यतिरिक्त या पिकावर फवारणीची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले. इतर पिकांच्या तुलनेत काकडीला कीडनाशके व खते कमी लागतात. उत्पादन सुरू झाल्यानंतर जास्तीस जास्त दोन महिने या पिकापासून उत्पादन निघते. अहिरे यांनी पंचावन्न दिवसांत दहा तोडे घेतले असून, एका तोड्यास सुमारे दीड टन अशी वीस गुंठ्यात त्यांना पंधरा टन काकडीचे उत्पादन मिळाले आहे. या पिकामध्ये फळांची तोडणी करणे खूप चिवट काम आहे. पंधरा फुटापर्यंत उंच वाढलेल्या वेलीवरून एकेक फळ काढताना सतत वरच्या दिशेला पाहून शिडी अथवा स्टूलच्या साहाय्याने तोडणी करावी लागते. त्यामुळे ह्या कामासाठी आठ मजूर कायमस्वरूपी लागत असल्याचे असल्याचे अहिरे यांचे चिरंजीव रवींद्र यांनी सांगितले. काकडीस पहिल्यांदा पस्तीस ते चाळीस रु पये बाजारभाव मिळाला आणि दोन महिन्यात सरासरी तीस रुपयांपर्यंत बाजार मिळाला. प्लॅस्टिक पाऊचमध्ये भरणा करत संपूर्ण माल त्यांनी व्यापाऱ्यामार्फत मुंबई येथेच विक्री केला. लागवडीपासून काढणीपर्यंत अहिरे यांना एक लाख रु पये खर्च आला तर खर्च वजा जाता अवघ्या वीस गुंठ्यात शंभर दिवसाच्या पिकातून चार ते साढेचार लाखाचे उत्पादन काढले आहे.