शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

सायबर गुन्हेगारांचा चिमुकल्यांवर डोळा

By admin | Updated: July 20, 2015 00:39 IST

रक्षित टंडन : वर्षभरात दीड लाख अल्पवयीन ठरले बळी; तंत्रज्ञान वापरा पण जपून

नाशिक : घराघरात पोहोचलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करणे सहज शक्य झाल्याने एका घरात किमान चार ते पाच मोबाइल सहज आढळतात. मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत अ‍ॅँड्रॉइड मोबाइल असणे प्रतिष्ठेचे समजले जात आहे. मात्र यामुळे धोकेही वाढले असून, सायबर गुन्हेगार लहानग्यांवर डोळा ठेवून आहेत. २०१२ मध्ये केलेल्या सर्व्हेनुसार सायबर गुन्हेगारीचे शिकार ठरत असलेले ८ ते १७ वर्ष वयोगटातील मुलांचे प्रमाण ३५ टक्के आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत सतर्कता बाळगावी, असे प्रतिपादन सायबरतज्ज्ञ रक्षित टंडन यांनी केले. कालिदास कलामंदिर येथे जैन सोशल गु्रपतर्फे आयोजित ‘सायबर सेक्युरिटी’ या विषयावर ते बोलत होते. पुढे बोलताना रक्षित यांनी सांगितले की, आपल्या चहूबाजूने हॅकर्सचे जाळे पसरलेले आहे. इंटरनेट वापरताना आपल्याकडून होत असलेल्या चुकांवर हे बारीक लक्ष ठेवून असतात. त्यातच अल्पवयीन मुले सोशल मीडियाच्या माध्यमातून इंटरनेटवर सक्रिय असल्याने हॅकर्स त्यांनाच लक्ष्य करीत असल्याचे गेल्या काही वर्षांत घडलेल्या घटनांवरून समोर आले. त्यामुळे पालकांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हॅकर्सचे बळी केवळ लहान मुलेच ठरतात असे अजिबात नाही, तर मोठे तथा उच्चशिक्षितांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही मूलभूत व सोप्या बाबी लक्षात ठेवल्यास तंत्रज्ञानाचा प्रभावी व सुरक्षितपणे वापर करता येत असल्याचे टंडन यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महिला तसेच लहान मुलांना इंटरनेट वापरताना विशेष दक्षता घेण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच फेसबुकवर १३ वर्षांपेक्षा कमी व व्हॉट्स अ‍ॅपवर १६ वर्षापेक्षा कमी मुलांनी अकाउंट ओपन करू नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. यावेळी अजय ब्रह्मेचा, विजय लोहाडे, तरुण कादरी, हेमंत दुग्गड, विनोद पहाडे आदि उपस्थित होते.