शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा

By admin | Updated: January 14, 2016 22:50 IST

येवला : साठवण तलावात केवळ ३० दलघफू पाणी; शहराला यापुढे पाच दिवसाआड पाणीपुरवठा

येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ ३० दलघफू पाणी आले. सध्या पालखेडचे पाणी मनमाड शहर व रेल्वेसाठी असणाऱ्या पाणीपुरवठा तलावाकडे वळविण्यात आले आहे. ५० दलघफू क्षमता असलेल्या येवला शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान ४५ दलघफू पाणी भरले जावे, अशी अपेक्षा होती व तसे पालिकेचे नियोजनही होते. तरच पाच दिवसाआड पाणी देऊन एप्रिल-अखेरपर्यंत येवलेकरांची तहान भागली जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात पुन्हा येवल्याला पाणी मिळणार असल्याची भाबडी अशा पालिका बाळगून असली तरी, आता पाणी मिळणार नसल्याची माहिती आहे.शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आवर्तनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत किमान ४५ दलघफू पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. कदाचित केवळ ३२ दलघफू पाणीसाठ्यावर समाधान मानले तर मार्चअखेरच अवघ्या तीन महिन्यांनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याचे स्पष्ट संकेत आजच स्पष्ट झाले आहेत. हतबल झालेल्या पालखेड प्रशासनाला येवला पालिका प्रशासनाने स्वत: अधिक लक्ष घालून मदत केल्याने किमान ३० दलघफू पाणीसाठा तरी उपलब्ध झाला. कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनधिकृत उपसा, पालखेड कालव्याचे प्रशासन, पोलीस या सर्वांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊन पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे येवल्याला तब्बल चार दिवस उशिरा पाणी पोहोचले. नवीन साठवण तलावालगत ५०० मीटरपर्यंत १०९ विहिरी कागदावर असल्या तरी पुन्हा सर्वेक्षण करून नेमक्या विहिरी किती याची आकडेवारी निश्चित करून त्यांच्या होणाऱ्या अमर्याद उपशाबाबत कायदेशीर कृतियुक्त बंधने आणावी लागतील. तलावालगतच्या खासगी विहिरीतून पाणी विकले जाते यावरदेखील टाच आणावी लागेल. पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला व दरडोई १०० लिटर पाणी दिले तरी महिन्याला पाच दलघफू पाणी खर्ची पडते. या आकडेवारीवरून सध्या साठवण तलावात भरलेले ३० दलघफू पाणी सहा महिने पुरायला हवे; परंतु चार महिनेदेखील पुरत नाही.(वार्ताहर)