शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा

By admin | Updated: January 14, 2016 22:50 IST

येवला : साठवण तलावात केवळ ३० दलघफू पाणी; शहराला यापुढे पाच दिवसाआड पाणीपुरवठा

येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ ३० दलघफू पाणी आले. सध्या पालखेडचे पाणी मनमाड शहर व रेल्वेसाठी असणाऱ्या पाणीपुरवठा तलावाकडे वळविण्यात आले आहे. ५० दलघफू क्षमता असलेल्या येवला शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान ४५ दलघफू पाणी भरले जावे, अशी अपेक्षा होती व तसे पालिकेचे नियोजनही होते. तरच पाच दिवसाआड पाणी देऊन एप्रिल-अखेरपर्यंत येवलेकरांची तहान भागली जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात पुन्हा येवल्याला पाणी मिळणार असल्याची भाबडी अशा पालिका बाळगून असली तरी, आता पाणी मिळणार नसल्याची माहिती आहे.शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आवर्तनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत किमान ४५ दलघफू पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. कदाचित केवळ ३२ दलघफू पाणीसाठ्यावर समाधान मानले तर मार्चअखेरच अवघ्या तीन महिन्यांनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याचे स्पष्ट संकेत आजच स्पष्ट झाले आहेत. हतबल झालेल्या पालखेड प्रशासनाला येवला पालिका प्रशासनाने स्वत: अधिक लक्ष घालून मदत केल्याने किमान ३० दलघफू पाणीसाठा तरी उपलब्ध झाला. कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनधिकृत उपसा, पालखेड कालव्याचे प्रशासन, पोलीस या सर्वांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊन पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे येवल्याला तब्बल चार दिवस उशिरा पाणी पोहोचले. नवीन साठवण तलावालगत ५०० मीटरपर्यंत १०९ विहिरी कागदावर असल्या तरी पुन्हा सर्वेक्षण करून नेमक्या विहिरी किती याची आकडेवारी निश्चित करून त्यांच्या होणाऱ्या अमर्याद उपशाबाबत कायदेशीर कृतियुक्त बंधने आणावी लागतील. तलावालगतच्या खासगी विहिरीतून पाणी विकले जाते यावरदेखील टाच आणावी लागेल. पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला व दरडोई १०० लिटर पाणी दिले तरी महिन्याला पाच दलघफू पाणी खर्ची पडते. या आकडेवारीवरून सध्या साठवण तलावात भरलेले ३० दलघफू पाणी सहा महिने पुरायला हवे; परंतु चार महिनेदेखील पुरत नाही.(वार्ताहर)