शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

एप्रिलअखेरपर्यंत पुरेल एवढाच साठा

By admin | Updated: January 14, 2016 22:50 IST

येवला : साठवण तलावात केवळ ३० दलघफू पाणी; शहराला यापुढे पाच दिवसाआड पाणीपुरवठा

येवला : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ ३० दलघफू पाणी आले. सध्या पालखेडचे पाणी मनमाड शहर व रेल्वेसाठी असणाऱ्या पाणीपुरवठा तलावाकडे वळविण्यात आले आहे. ५० दलघफू क्षमता असलेल्या येवला शहर पाणीपुरवठा साठवण तलावात किमान ४५ दलघफू पाणी भरले जावे, अशी अपेक्षा होती व तसे पालिकेचे नियोजनही होते. तरच पाच दिवसाआड पाणी देऊन एप्रिल-अखेरपर्यंत येवलेकरांची तहान भागली जाणार आहे. अखेरच्या टप्प्यात पुन्हा येवल्याला पाणी मिळणार असल्याची भाबडी अशा पालिका बाळगून असली तरी, आता पाणी मिळणार नसल्याची माहिती आहे.शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव सुमारे ९० एकरांचा असून, त्याची क्षमता ५० दलघफू आहे. आवर्तनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत किमान ४५ दलघफू पाणी तलावात भरले गेले तर चार महिने शहराला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा असतो. कदाचित केवळ ३२ दलघफू पाणीसाठ्यावर समाधान मानले तर मार्चअखेरच अवघ्या तीन महिन्यांनंतर पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार असल्याचे स्पष्ट संकेत आजच स्पष्ट झाले आहेत. हतबल झालेल्या पालखेड प्रशासनाला येवला पालिका प्रशासनाने स्वत: अधिक लक्ष घालून मदत केल्याने किमान ३० दलघफू पाणीसाठा तरी उपलब्ध झाला. कालव्याच्या वरच्या भागातील शेतकऱ्यांकडून होणारा अनधिकृत उपसा, पालखेड कालव्याचे प्रशासन, पोलीस या सर्वांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती जाऊन पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडे योग्य ते मनुष्यबळ नव्हते. त्यामुळे येवल्याला तब्बल चार दिवस उशिरा पाणी पोहोचले. नवीन साठवण तलावालगत ५०० मीटरपर्यंत १०९ विहिरी कागदावर असल्या तरी पुन्हा सर्वेक्षण करून नेमक्या विहिरी किती याची आकडेवारी निश्चित करून त्यांच्या होणाऱ्या अमर्याद उपशाबाबत कायदेशीर कृतियुक्त बंधने आणावी लागतील. तलावालगतच्या खासगी विहिरीतून पाणी विकले जाते यावरदेखील टाच आणावी लागेल. पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला व दरडोई १०० लिटर पाणी दिले तरी महिन्याला पाच दलघफू पाणी खर्ची पडते. या आकडेवारीवरून सध्या साठवण तलावात भरलेले ३० दलघफू पाणी सहा महिने पुरायला हवे; परंतु चार महिनेदेखील पुरत नाही.(वार्ताहर)