शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

लॉकडाऊननंतरही अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात ...

नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्या धावत असून काही मार्गांवरील बसेस बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. जिल्ह्याला अवघे ४९ टक्के इतके उत्पन्न मिळत असून अजूनही १० टक्के बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात ८३२ बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरू होती. बसेस सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी सध्या मार्गावर केवळ ६६७ बसेस धावत आहेत. नाशिक शहरात महापालिकेने अजूनही बसेस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे मनपाची सेवा सुरू नसली तरी महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात केवळ ५९० बसेस सुरू केल्या आहेत. उर्वरित जवळपास ७० बसेस अजूनही बंदच आहेत. याचा फटका शहरालगतच्या गावांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

महामंडळाचे सर्वाधिक उत्पन्न हे यात्रा स्पेशल गाड्यांमधून मिळते. परंतु यंदा त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा बंदचा फटका महामंडळाला बसला. वणी येथील बसफेऱ्यादेखील बंद करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची संख्यादेखील कमी झालेली आहे. त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे.

--इन्फो---

सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्गही बंद

नाशिक ते पुणे हा महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग आहे. मात्र प्रवासीच नसल्याने या मार्गावरील बसेसच्या संख्येत कपात करण्यात आलेली आहे. खासगी शिवशाही चालकांनी आगोदरच या मार्गावरील काही फेऱ्या बंद केलेेल्या आहेत. याशिवाय पुण्यातील आयटी पार्क अजूनही बंद असल्यामुळे त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे. त्यामुळे उत्पन्न घटले आहे.

--कोट--

महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या असल्या तरी शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यात शहर बसेस धावत नाहीत. त्याचा फटका शहरात दैनंदिन येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खेड्यातही बसेस नसल्याचा प्रवााशांना त्रास होत आहे.

- किसनराव क्षिरसागर, प्रवासी

--कोट--

बसफेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगार, मजुरांना सर्वाधिक फटका बसत आहे. वेळेत बस नसल्याने कामावर आणि घरी पोहोचण्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. बसेस नसल्यामुळे जादा पैसे देऊन खासगी वाहनातून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

- दतू आव्हाड, प्रवासी

--इन्फो-

महामंडळाला अजूनही प्रवासी वाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. उत्पन्न केवळ ४९ टक्के इतके मिळत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यांचा मेळ बसवावा लागतो. कमी उत्पन्न झाल्याचा परिणाम महामंडळाच्या कामकाजावर नक्कीच होतो. परंतु परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. येत्या काही दिवसात आणखी परिस्थिती बदलू शकेल अशी अपेक्षा आहे.

- वरिष्ठ अधिकारी, एस.टी. महामंडळ