शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतरही अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात ...

नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्या धावत असून काही मार्गांवरील बसेस बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. जिल्ह्याला अवघे ४९ टक्के इतके उत्पन्न मिळत असून अजूनही १० टक्के बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात ८३२ बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरू होती. बसेस सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी सध्या मार्गावर केवळ ६६७ बसेस धावत आहेत. नाशिक शहरात महापालिकेने अजूनही बसेस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे मनपाची सेवा सुरू नसली तरी महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात केवळ ५९० बसेस सुरू केल्या आहेत. उर्वरित जवळपास ७० बसेस अजूनही बंदच आहेत. याचा फटका शहरालगतच्या गावांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

महामंडळाचे सर्वाधिक उत्पन्न हे यात्रा स्पेशल गाड्यांमधून मिळते. परंतु यंदा त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा बंदचा फटका महामंडळाला बसला. वणी येथील बसफेऱ्यादेखील बंद करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची संख्यादेखील कमी झालेली आहे. त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे.

--इन्फो---

सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्गही बंद

नाशिक ते पुणे हा महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग आहे. मात्र प्रवासीच नसल्याने या मार्गावरील बसेसच्या संख्येत कपात करण्यात आलेली आहे. खासगी शिवशाही चालकांनी आगोदरच या मार्गावरील काही फेऱ्या बंद केलेेल्या आहेत. याशिवाय पुण्यातील आयटी पार्क अजूनही बंद असल्यामुळे त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे. त्यामुळे उत्पन्न घटले आहे.

--कोट--

महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या असल्या तरी शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यात शहर बसेस धावत नाहीत. त्याचा फटका शहरात दैनंदिन येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खेड्यातही बसेस नसल्याचा प्रवााशांना त्रास होत आहे.

- किसनराव क्षिरसागर, प्रवासी

--कोट--

बसफेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगार, मजुरांना सर्वाधिक फटका बसत आहे. वेळेत बस नसल्याने कामावर आणि घरी पोहोचण्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. बसेस नसल्यामुळे जादा पैसे देऊन खासगी वाहनातून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

- दतू आव्हाड, प्रवासी

--इन्फो-

महामंडळाला अजूनही प्रवासी वाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. उत्पन्न केवळ ४९ टक्के इतके मिळत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यांचा मेळ बसवावा लागतो. कमी उत्पन्न झाल्याचा परिणाम महामंडळाच्या कामकाजावर नक्कीच होतो. परंतु परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. येत्या काही दिवसात आणखी परिस्थिती बदलू शकेल अशी अपेक्षा आहे.

- वरिष्ठ अधिकारी, एस.टी. महामंडळ