शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

लॉकडाऊननंतरही अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात ...

नााशिक : कोरोनाचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला आहे. सुरक्षितता नियमांच्या आधीन राहून बसेसची प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने जिल्ह्यातील अनेक मार्गांवरील बसेस रिकाम्या धावत असून काही मार्गांवरील बसेस बंद करण्याची वेळ महामंडळावर आली आहे. जिल्ह्याला अवघे ४९ टक्के इतके उत्पन्न मिळत असून अजूनही १० टक्के बसेस सुरू करण्यात आलेल्या नाहीत.

लॉकडाऊनपूर्वी जिल्ह्यात ८३२ बसेसच्या माध्यमातून प्रवासी सेवा सुरू होती. बसेस सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने बसेस सुरू करण्यात आल्या असल्या तरी सध्या मार्गावर केवळ ६६७ बसेस धावत आहेत. नाशिक शहरात महापालिकेने अजूनही बसेस सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे मनपाची सेवा सुरू नसली तरी महामंडळाने तात्पुरत्या स्वरूपात केवळ ५९० बसेस सुरू केल्या आहेत. उर्वरित जवळपास ७० बसेस अजूनही बंदच आहेत. याचा फटका शहरालगतच्या गावांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचाच आधार घ्यावा लागत आहे.

महामंडळाचे सर्वाधिक उत्पन्न हे यात्रा स्पेशल गाड्यांमधून मिळते. परंतु यंदा त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा बंदचा फटका महामंडळाला बसला. वणी येथील बसफेऱ्यादेखील बंद करण्याची वेळ आली आहे. पंढरपूर, तुळजापूर, जेजुरीला जाणाऱ्या भाविकांची संख्यादेखील कमी झालेली आहे. त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे.

--इन्फो---

सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्गही बंद

नाशिक ते पुणे हा महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणारा मार्ग आहे. मात्र प्रवासीच नसल्याने या मार्गावरील बसेसच्या संख्येत कपात करण्यात आलेली आहे. खासगी शिवशाही चालकांनी आगोदरच या मार्गावरील काही फेऱ्या बंद केलेेल्या आहेत. याशिवाय पुण्यातील आयटी पार्क अजूनही बंद असल्यामुळे त्याचाही फटका महामंडळाला बसत आहे. त्यामुळे उत्पन्न घटले आहे.

--कोट--

महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या असल्या तरी शहरालगत असलेल्या खेड्यापाड्यात शहर बसेस धावत नाहीत. त्याचा फटका शहरात दैनंदिन येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खेड्यातही बसेस नसल्याचा प्रवााशांना त्रास होत आहे.

- किसनराव क्षिरसागर, प्रवासी

--कोट--

बसफेऱ्या कमी करण्यात आल्यामुळे कामावर जाणाऱ्या कामगार, मजुरांना सर्वाधिक फटका बसत आहे. वेळेत बस नसल्याने कामावर आणि घरी पोहोचण्याचे वेळापत्रकच कोलमडले आहे. बसेस नसल्यामुळे जादा पैसे देऊन खासगी वाहनातून प्रवास करण्याची वेळ आली आहे.

- दतू आव्हाड, प्रवासी

--इन्फो-

महामंडळाला अजूनही प्रवासी वाहतुकीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. उत्पन्न केवळ ४९ टक्के इतके मिळत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च यांचा मेळ बसवावा लागतो. कमी उत्पन्न झाल्याचा परिणाम महामंडळाच्या कामकाजावर नक्कीच होतो. परंतु परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. येत्या काही दिवसात आणखी परिस्थिती बदलू शकेल अशी अपेक्षा आहे.

- वरिष्ठ अधिकारी, एस.टी. महामंडळ