शहरं
Join us  
Trending Stories
1
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
2
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
3
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
4
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
5
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
7
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
8
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
9
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
10
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
11
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
12
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
13
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
14
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
15
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
16
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
17
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
18
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
19
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
20
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा

उद्योजकांसाठी तवंदी घाटात जागा संपादन करा

By admin | Updated: December 17, 2014 00:24 IST

उद्योग स्थलांतर : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापुरातील उद्योजकांसाठी निपाणीजवळील तवंदी घाटातील ८४८ एकर जमीन तातडीने संपादित करावी व तिथे औद्योगिक वसाहत उभारणीच्या कामास सुरुवात करावी, असे आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज, मंगळवारी बेळगाव येथे दिले. येथील उद्योजकांच्या शिष्टमंडळाने त्यांची नवीन शासकीय विश्रामगृहात रात्री आठच्या सुमारास सुमारे अर्धा तास भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आमदार वीरकुमार पाटील, प्रधान सचिव रत्नप्रभा प्रमुख उपस्थित होते.महाराष्ट्रातील औद्योगिक विजेचे दर गगनाला भिडले आहेत. त्याशिवाय उद्योजकांच्या प्रश्नांकडे महाराष्ट्र शासन लक्ष द्यायला तयार नसल्याने येथील उद्योजकांनी शेजारच्या कर्नाटकात उद्योग स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासंबंधीची चर्चा करण्यासाठी ‘गोशिमा’चे अध्यक्ष अजित आजरी, माजी अध्यक्ष उदय दुधाणे, संजय हुरमनहट्टी, राहुल बुधले, ज्येष्ठ संचालक के. आर. मोटवाणी, आर. पी. पाटील, ‘स्मॅक’चे अध्यक्ष सुरेंद्र जैन, राजू पाटील, कागल वसाहतीतील संजय जोशी, श्रीनिवास कुलकर्णी, फौंड्री असोसिएशनचे सुरेश चौगुले आदींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीनंतर दुधाणे यांनी चर्चेची माहिती पत्रकारांना दिली. मुंबई-बंगलोर हा कॉरिडॉर लवकरच विकसित होत आहे. त्यामध्ये कर्नाटकास मोठे महत्त्व आहे. त्यामुळे औद्योगिक विकासास प्रोत्साहन देण्याचा कर्नाटक शासनाचा प्रयत्नच आहे. महाराष्ट्रातील उद्योजक येथे प्रकल्प सुरू करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना तवंदी घाटातील ८४८ एकर जागा तातडीने उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करावी. आवश्यकता असल्यास त्या जागेच्या शेजारची आणखी ५०० एकर जमीनही संपादित करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. उद्योजकांना विजेचे दर किती राहतील यासंबंधीचीही प्राथमिक चर्चा मुख्यमंत्र्यांबरोबर झाली असल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना उद्योजकांनी उद्योग स्थलांतर करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आता भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. कोल्हापुरात शिवसेनेचे सहा आमदार आहेत व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडेच उद्योगखाते असल्याने हे सरकार काय करते हे पाहून मगच कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेऊया, असाही काही उद्योजकांचा होरा आहे तर हे सरकार सत्तेत आल्यावरच वीज दरवाढ झाली असल्याने सरकार आमच्या अडचणींसंदर्भात काही सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता नाही म्हणून स्थलांतर केलेले बरे, असाही एका गटाचा आग्रह आहे.