शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीबाबत जिल्हा बॅँकेचे बुधवारी धोरण ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:42 IST

जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. कर्जदारांनी अशी भूमिका घेतल्यास बॅँकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेला जवळपास २२०० कोटी रुपये मार्चअखेर वसूल करण्याचे आव्हान असून, अधिकाधिक कर्ज वसुली केल्यावरच बॅँकेचे गतवैभव प्राप्त होऊन गरजू शेतकऱ्यांना पुढील काळात कर्जपुरवठा करणे शक्य होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कर्जवसुली मोहिमेंतर्गत रविवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे वसुली पथकासमोरच मुकुंद वाजे या कर्जदाराने विषारी औषध सेवन केल्याची घटना घडली. अशा घटनेतून कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कर्जदारांना तगादा लावायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़ पांढुर्ली येथील घटनेने अन्य कर्जदारदेखील त्याच पावलावर पाऊल ठेवून आत्महत्येची धमकी देत वसुलीत खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतील अशा परिस्थितीत नेमके काय करावे, यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात बुधवारी सर्व संचालकांची बैठक बोलविण्यात आल्याचे सांगितले. कर्जदारांकडून बॅँकेला सहकार्याची गरज असून, वसूल केलेल्या कर्जातून अन्य ठेवीदार शेतकºयांना कर्ज दिले जाणार आहे. परंतु जर थकबाकीदारांकडून असे प्रकार होत असतील तर एकप्रकारे ते अन्य गरजू शेतकºयांवर अन्यायकारक ठरणार असून, कर्जवसुलीत आडकाठी आणणाºया थकबाकीदारांबाबत लवकरच जिल्हा बॅँक ठोस धोरण स्वीकारणार असल्याचेही केदा अहेर यांनी सांगितले. मुकुंद वाजे यांच्याकडे सन २००६ पासून कर्ज थकले असून, त्यासाठी वेळोवेळी नोटिसाही देण्यात आल्याचे व पुरेसा वेळही दिला गेल्याचे सांगण्यात आले.वसुलीचा तगादाजिल्हा बॅँकेने मार्च अखेरीस बड्या व जुन्या थकबाकीदार शेतकºयांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला असून, त्यातून वाहन कर्जापोटी ट्रॅक्टर जप्तीची मोहीम सुरू आहे. ऐपतदार शेतकºयांच्या मालमत्तांवर कर्जापोटी बोझा चढविण्याची प्रकियाही हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी