शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाशकात डेंग्यूचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST

राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या आठ-दहा दिवसांत दिवाळीच्या सुटीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशेषत: सिडको परिसरात डेंग्यूच्या आजाराची सर्वाधिक लागण झालेली आहे.

नाशिक : राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या आठ-दहा दिवसांत दिवाळीच्या सुटीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशेषत: सिडको परिसरात डेंग्यूच्या आजाराची सर्वाधिक लागण झालेली आहे. दरम्यान, शहरातील तपमानात घट होत नाही तोपर्यंत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखणे महापालिकेपुढे आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे.  शहरात गेल्या आठ-दहा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णसंख्येत भर पडताना दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यात आतापर्यंत दीडशेहून अधिक रुग्ण डेंग्यू दूषित आढळले असून, जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीपर्यंत ही संख्या ४०० च्या पुढे गेली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये १३५ डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आले होते, तर जानेवारी ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ७७५ रुग्ण डेंग्यू दूषित आढळून येऊन त्यातील चार रुग्णांचा बळी गेला होता. यंदा, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी, गेल्या काही दिवसांत त्यात भर पडत चालल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सिडको भागात त्याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने, दिवाळीच्या सुटीमुळे अनेक घरे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे घरांमध्ये साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे. त्यामुळेच डेंग्यूची रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये सिडको विभागात सर्वाधिक ८० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेमार्फत ६२ पथकांद्वारे दर आठवड्याला अळीनाशक फवारणी, पाणी साठे तपासणी व अ‍ॅबेटिंगची मोहीम राबविली जात असून, ६ मोठी व २८ लहान धूरफवारणी यंत्राद्वारे फवारणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दिवाळी सुटी संपल्यानंतर आता गावाकडे परतलेले बांधकाम मजूर पुन्हा शहरात येत असून, बांधकामांची कामे सुरू होत आहेत. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी साठविल्या जाणाºया पाण्याकडेही लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.थंडीमुळे होणार प्रमाण कमीआता पावसाळा संपला असला तरी काही ठिकाणी पाणी साचलेले आहे. याशिवाय, अजून वातावरणात काही प्रमाणात उष्णतामान आहे. त्यामुळे सदर वातावरण हे डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक आहे. वातावरणातील तपमानात घट होत गेल्यानंतर डासांची उत्पत्ती थांबण्यास मदत होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आणखी आठ ते दहा दिवसांनी तपमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस आरोग्य विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे.