शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

नाशकात डेंग्यूचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:12 IST

राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या आठ-दहा दिवसांत दिवाळीच्या सुटीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशेषत: सिडको परिसरात डेंग्यूच्या आजाराची सर्वाधिक लागण झालेली आहे.

नाशिक : राज्यात डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून, रुग्णसंख्येत मुंबई, पुणेनंतर नाशिक तिसºया स्थानावर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत नाशिकला यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ४९ टक्के घट झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी गेल्या आठ-दहा दिवसांत दिवाळीच्या सुटीत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. विशेषत: सिडको परिसरात डेंग्यूच्या आजाराची सर्वाधिक लागण झालेली आहे. दरम्यान, शहरातील तपमानात घट होत नाही तोपर्यंत डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती रोखणे महापालिकेपुढे आव्हानात्मक असल्याचे सांगितले जात आहे.  शहरात गेल्या आठ-दहा दिवसांत डेंग्यूच्या आजाराची लागण झालेल्या रुग्णसंख्येत भर पडताना दिसून येत आहे. आॅक्टोबर महिन्यात आतापर्यंत दीडशेहून अधिक रुग्ण डेंग्यू दूषित आढळले असून, जानेवारी ते आॅक्टोबर या कालावधीपर्यंत ही संख्या ४०० च्या पुढे गेली आहे. मागील वर्षी आॅक्टोबर २०१६ मध्ये १३५ डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आले होते, तर जानेवारी ते आॅक्टोबर २०१६ पर्यंत ७७५ रुग्ण डेंग्यू दूषित आढळून येऊन त्यातील चार रुग्णांचा बळी गेला होता. यंदा, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचा दावा आरोग्य विभागामार्फत केला जात असला तरी, गेल्या काही दिवसांत त्यात भर पडत चालल्याचे दिसून येत आहे. विशेषत: सिडको भागात त्याचे प्रमाण अधिक आहे. प्रामुख्याने, दिवाळीच्या सुटीमुळे अनेक घरे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे घरांमध्ये साठविलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती झाल्याचा संशय आरोग्य विभागाला आहे. त्यामुळेच डेंग्यूची रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये सिडको विभागात सर्वाधिक ८० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. डेंग्यू व मलेरिया नियंत्रणासाठी महापालिकेमार्फत ६२ पथकांद्वारे दर आठवड्याला अळीनाशक फवारणी, पाणी साठे तपासणी व अ‍ॅबेटिंगची मोहीम राबविली जात असून, ६ मोठी व २८ लहान धूरफवारणी यंत्राद्वारे फवारणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दिवाळी सुटी संपल्यानंतर आता गावाकडे परतलेले बांधकाम मजूर पुन्हा शहरात येत असून, बांधकामांची कामे सुरू होत आहेत. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी साठविल्या जाणाºया पाण्याकडेही लक्ष केंद्रित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.थंडीमुळे होणार प्रमाण कमीआता पावसाळा संपला असला तरी काही ठिकाणी पाणी साचलेले आहे. याशिवाय, अजून वातावरणात काही प्रमाणात उष्णतामान आहे. त्यामुळे सदर वातावरण हे डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक आहे. वातावरणातील तपमानात घट होत गेल्यानंतर डासांची उत्पत्ती थांबण्यास मदत होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आणखी आठ ते दहा दिवसांनी तपमानात घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी दहा दिवस आरोग्य विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे.