शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभराने संमेलन कार्यालयास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर गुरुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर गुरुवारी साहित्य संमेलनाच्या अधिकृत पत्रव्यवहारासाठी लेटरहेड प्राप्त झाले आहे. एवढ्या छोट्या कामासाठी लागलेला विलंब पाहता संमेलनाच्या निमंत्रणात दाखविलेल्या तत्परतेनंतरच ती धडाडी लुप्त झाली का? अशी चर्चा त्यानिमित्ताने साहित्य रसिकांमध्ये सुरू झाली आहे.

जोपर्यंत कोणत्याही संस्थेचे अधिकृत लेटरहेड तयार होत नाही, तोपर्यंत कोणताही पत्रव्यवहार अधिकृत करता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कवी संमेलनासाठीच्या कवींना निमंत्रण देणे असो की अन्य साहित्यिकांचे निमंत्रण असो, कोणतेही कार्य लेटरहेडशिवाय अधिकृतरित्या पार पडू शकत नाही. कार्यालयीन नियमावलीनुसार संमेलनाशी संबंधित सर्व पत्रव्यवहार हा लेटरहेडनेच केला तरच तो अधिकृत मानला जातो. मात्र, हे अधिकृत लेटरहेड मिळण्यासच महिनाभराचा विलंब लागल्याने हा ‘विलंबित ख्याल’ संमेलनात अजून किती काळ चालणार त्याच चर्चेला बहर आला आहे.

इन्फो

स्वागताध्यक्षांच्या संदेशाचा पडला विसर

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी गोएसो कॅम्पसमध्ये घेतलेल्या पहिल्याच बैठकीत प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानून एकेक काम हातावेगळे करण्याचा उपदेशवजा सल्ला उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला होता. संमेलनापूर्वी ८-१० दिवस आधीच सर्वप्रकारे तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे, असेही सांगितले होते. मात्र, साधे लेटरहेड मिळविण्यासाठीच इतका विलंब झाल्याने आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जणू स्वागताध्यक्षांच्या संदेशाचाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

रजिस्टर नाही म्हणून प्रतीक्षा

नाशिकच्या साहित्यिकांनी त्यांच्या प्रकाशित पुस्तकांच्या दोन प्रती संमेलनाच्या कार्यालयात आणून देण्याचे आवाहन आयोजक संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काही साहित्यिक त्यांच्या पुस्तकांच्या प्रती देण्यास गेल्यानंतर त्यांना विपरीत अनुभव आला. आलेल्या पुस्तकांची नोंद करण्यासाठी कार्यालयात रजिस्टर नसल्याने नंतर घेऊन या किंवा काही काळ थांबण्यास सांगण्यात आले. अखेर कार्यालयास रजिस्टर मिळेपर्यंत संबंधितांना तिष्ठत रहावे लागले. मात्र, अजून चार माणसेदेखील कार्यालयात येत नसताना अशा प्रकारची कार्यालयीन तत्परता असेल तर संमेलनावेळी काय होणार ? असाच सूर रसिकांकडून व्यक्त होत आहे.

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.