शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

महिनाभराने संमेलन कार्यालयास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर गुरुवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : साहित्य संमेलन नाशिकला होण्याचे जाहीर झाल्यानंतर तब्बल एक महिन्याहून अधिक कालावधी उलटून गेल्यानंतर गुरुवारी साहित्य संमेलनाच्या अधिकृत पत्रव्यवहारासाठी लेटरहेड प्राप्त झाले आहे. एवढ्या छोट्या कामासाठी लागलेला विलंब पाहता संमेलनाच्या निमंत्रणात दाखविलेल्या तत्परतेनंतरच ती धडाडी लुप्त झाली का? अशी चर्चा त्यानिमित्ताने साहित्य रसिकांमध्ये सुरू झाली आहे.

जोपर्यंत कोणत्याही संस्थेचे अधिकृत लेटरहेड तयार होत नाही, तोपर्यंत कोणताही पत्रव्यवहार अधिकृत करता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कवी संमेलनासाठीच्या कवींना निमंत्रण देणे असो की अन्य साहित्यिकांचे निमंत्रण असो, कोणतेही कार्य लेटरहेडशिवाय अधिकृतरित्या पार पडू शकत नाही. कार्यालयीन नियमावलीनुसार संमेलनाशी संबंधित सर्व पत्रव्यवहार हा लेटरहेडनेच केला तरच तो अधिकृत मानला जातो. मात्र, हे अधिकृत लेटरहेड मिळण्यासच महिनाभराचा विलंब लागल्याने हा ‘विलंबित ख्याल’ संमेलनात अजून किती काळ चालणार त्याच चर्चेला बहर आला आहे.

इन्फो

स्वागताध्यक्षांच्या संदेशाचा पडला विसर

स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी गोएसो कॅम्पसमध्ये घेतलेल्या पहिल्याच बैठकीत प्रत्येक दिवस महत्त्वाचा मानून एकेक काम हातावेगळे करण्याचा उपदेशवजा सल्ला उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला होता. संमेलनापूर्वी ८-१० दिवस आधीच सर्वप्रकारे तयारी पूर्ण झालेली असली पाहिजे, असेही सांगितले होते. मात्र, साधे लेटरहेड मिळविण्यासाठीच इतका विलंब झाल्याने आयोजक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना जणू स्वागताध्यक्षांच्या संदेशाचाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.

इन्फो

रजिस्टर नाही म्हणून प्रतीक्षा

नाशिकच्या साहित्यिकांनी त्यांच्या प्रकाशित पुस्तकांच्या दोन प्रती संमेलनाच्या कार्यालयात आणून देण्याचे आवाहन आयोजक संस्थेच्यावतीने करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात काही साहित्यिक त्यांच्या पुस्तकांच्या प्रती देण्यास गेल्यानंतर त्यांना विपरीत अनुभव आला. आलेल्या पुस्तकांची नोंद करण्यासाठी कार्यालयात रजिस्टर नसल्याने नंतर घेऊन या किंवा काही काळ थांबण्यास सांगण्यात आले. अखेर कार्यालयास रजिस्टर मिळेपर्यंत संबंधितांना तिष्ठत रहावे लागले. मात्र, अजून चार माणसेदेखील कार्यालयात येत नसताना अशा प्रकारची कार्यालयीन तत्परता असेल तर संमेलनावेळी काय होणार ? असाच सूर रसिकांकडून व्यक्त होत आहे.

लोगो

साहित्य संमेलनाचा लोगो वापरावा.