शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

सागरानंदांकडून दिलेल्या पदव्या वादात

By admin | Updated: September 15, 2015 22:33 IST

सागरानंदांकडून दिलेल्या पदव्या वादात

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरच्या श्री आनंद पंचायती आखाड्याच्या नावावर स्वामी सागरानंद सरस्वती व स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी आतापर्यंत जवळपास पाच पदव्या दिलेल्या आहेत. त्या पदव्यांशी श्री पंचायती आनंद आखाड्याचा काही संबंध नसून आनंद आखाड्याचे रमता पंच यांनी त्या पदव्यांना आक्षेप घेतला आहे. ज्या साधूंना अशा पदव्या दिल्या आहेत, त्यांना रमता पंच वतीने निष्कासित करण्यात येत आहे, अशा आशयाचे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.या पत्रकात म्हटले आहे की, आनंद आखाड्याच्या नावाने स्वामी सागरानंद सरस्वती व स्वामी शंकरानंद सरस्वती धर्माचार्यसारख्या पदव्या बहाल करीत आहे. यासंदर्भात आनंद आखाड्याच्या रमता पंचने सागरानंद महाराज यांना विचारणा केली असता सागरानंद यांनी सदर पदव्या या आखाड्याच्या नावावर दिल्या नसून आश्रमाच्या नावावर दिल्या आहेत. गुरुकुलाच्या नावाने संबंधीतांना धर्माचार्य बनविल्याचा खुलासा त्यांनी केला. या घटनेमुळे आनंद आखाड्याचे महंत तसेच पंचांनी सागरानंद यांनी दिलेल्या पदव्या गैर ठरवत ज्या साधूंना धर्माचार्य बनविले आहे त्यांच्या पदव्या निष्कासीत करण्याची घोषणा आनंद आखाड्यानी केली आहे. या पत्रकावर रमता पंच परमेश्वर श्री महंत काळू गिरी महाराज, श्री महंत धनराजगिरी महाराज, श्री महंत लक्ष्मण गिरी महाराज, श्री महंत कैलाशपुरी महाराज आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे हे पत्रक प्रसिद्ध करताना ‘तपोनिधी श्री आनंद आखाडा पंचायती, दसनाम नागा संन्यासी कपिलधारा, वाराणसी, इलाहाबाद, (प्रयागराज), तथा त्र्यंबकेश्वर (नाशिक) असे प्रत्रक प्रसिद्ध केले आहे. (वार्ताहर)