शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

महामार्गाची डागडुजी होईपर्यंत एक महिना टोल बंद करा; अन्यथा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:16 IST

नाशिक : इगतपुरीपर्यंत महामार्गाची अनेक ठिकाणी चाळण झाली असल्याने रस्ते अपघातामुळे जाणाऱ्या बळींची जबाबदारी कुणाची? असा सवाल करीत खासदार ...

नाशिक : इगतपुरीपर्यंत महामार्गाची अनेक ठिकाणी चाळण झाली असल्याने रस्ते अपघातामुळे जाणाऱ्या बळींची जबाबदारी कुणाची? असा सवाल करीत खासदार हेमंत गोडसे यांनी रस्त्याची जबाबदारी असलेल्या टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच जोपर्यंत महामार्गाची डागडुजी पूर्ण होऊन नियमांनुसार सर्व सुविधा दिल्या जात नाहीत, तोपर्यंत किमान एक महिना कंपनीने स्वत:हून टोल घेणे बंद करावे; अन्यथा वरिष्ठ स्तरावर रस्त्याची वस्तुस्थिती मांडून टोल बंद करायला भाग पाडू, असा इशारा खासदार हेमंत गोडसे यांनी घोटी टोलनाका प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिला.

खासदार हेमंत गोडसे यांनी शनिवारी महामार्गावरून नाशिक ते कसारा रस्त्याची पाहणी करीत नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (न्हाई) तसेच टोल कंपनीच्या अधिकाऱ्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कडक शब्दांत जाब विचारला. घोटी, वासाळी फाटा, पिंपरी सदो फाटा ते इगतपुरीदरम्यान रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. येत्या ३० तारखेच्या आत संपूर्ण महामार्ग शंभर टक्के सुविधांसह प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज न झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारादेखील त्यांनी दिला. शासनाशी झालेल्या करारात स्पष्ट केलेल्या बाबी आणि सुविधा देत नसताना टोलवसुली करणे नैतिकदृष्ट्या अयोग्य असून, त्याबाबत नैतिक जबाबदारी म्हणून महामार्गाचे काम होत नाही, तोपर्यंत किमान महिनाभर टोलवसुली थांबवावी, असेही खासदार गोडसे यांनी नमूद केले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी राष्ट्रीय महामार्गाचे बी. एम. साळुंके, व्यवस्थापक दिलीप पाटील, आर्टिफॅक्टचे महेंद्र सूर्यवंशी, टोल प्रशासनाचे गिरीश कामत, आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घोटी, इगतपुरी आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इन्फो

रस्त्याच्या दुर्दशेपायी हकनाक बळी

पावसाळ्याच्या प्रारंभापासूनच महामार्गाची चाळण झाली असून, या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाला असणाऱ्या साईडपट्ट्या आणि कॅटआय नसल्याने गत काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आजपर्यंत प्रवाशांचे हकनाक बळी गेले आहेत. कित्येक प्रवाशांना अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. अपघातातील बळींबाबत ‘लोकमत’च्या बातमीची ई-कॉपी दाखवत अजून किती प्रवाशांचे बळी जाण्याची वाट बघणार आहात, अशा शब्दांत खासदार गोडसे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले. ९९ किलोमीटरचा रस्ता महिनाअखेरपर्यंत दुरुस्त झालाच पाहिजे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा गर्भित इशारावजा सूचना खासदार हेमंत गोडसे यांनी महामार्ग पाहणी दौऱ्याप्रसंगी टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

इन्फो

या गंभीर स्थितीला जबाबदार कोण?

यावेळी अत्यंत दुरवस्था झालेल्या गोंदे फाटा, मुढेगाव फाटा, भंडारदरा फाटा, घोटी, भावली फाटा, घोटी वाहतूक टॅप, इगतपुरी, कसारा घाट या ठिकाणी घेऊन जात महामार्गाची पाहणी केली. महामार्गालगत दोनही बाजूंना पाच फूट डांबर आणि पाच फूट मुरूम अशी साईडपट्टी असायलाच हवी. मग ९९ किलोमीटरच्या दरम्यान साईडपट्टी कोठेच का नाही, असा सवाल करीत गोडसे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या गंभीर परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल देखरेखीची जबाबदारी असलेल्या आर्टिफॅक्ट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि टोल प्रशासनाला विचारला.

-------------

फोटो (७६/ ७९ ) घोटीनजीक महामार्गाची दुर्दशा दाखवून अधिकाऱ्यांना जाब विचारताना खासदार हेमंत गोडसे. (छाया : राजू ठाकरे)

फोटो (७२) - ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेली या महामार्गावरील अपघातातील बळींच्या बातमीची ‘ई-कॉपी’ दाखविताना खासदार हेमंत गोडसे.