शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी सेलने वाढवली जातपडताळणीची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:13 IST

नाशिक : अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सीईटी सेलने जातवैधता प्रमाणपत्र सक्तीचे केल्यामुळे असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी राज्यातील जातपडताळणी समितीच्या कार्यालयांमध्ये झालेल्या ...

नाशिक : अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सीईटी सेलने जातवैधता प्रमाणपत्र सक्तीचे केल्यामुळे असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी राज्यातील जातपडताळणी समितीच्या कार्यालयांमध्ये झालेल्या गर्दीने जातपडताळणी कार्यालयांची चांगलीच दमछाक झाली. निर्धारित वेळेत प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे विद्यार्थीदेखील तगादा लावत असल्याच्या तणावाच्या परिस्थितीत या कार्यालयांना रात्रंदिवस कामकाज करावे लागले. आता मात्र पडताळणीसाठी कागदपत्रे जमा केल्याची पावतीही प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचे सीईटी सेलने जाहीर केल असले तरी या आगोदरच्या निर्णयाने साऱ्यांचीच चांगलीच परवड झाली.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या सीईटी सेलने ऐनवेळी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सक्तीचे केले. यासाठी जानेवारीपर्यंतीची मुदत देण्यात आली होती. प्रमाणपत्र नसेल तर विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल आणि त्यासाठीचे शुल्कदेखील भरण्याची वेळ येणार असल्याने विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातपडताळणी कार्यालयात धाव घेतली. प्रकरण सादर केल्यानंतर लगेचच पडताळणी प्रमाणपत्र मिळावे असा तगादा सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे कार्यालयावरील कामकाजाचा ताणही वाढत गेला.

जातपडताळणी समितीला दिवसरात्र काम करीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करावी लागली. यासाठी ऑनलाइनची प्रकिया थांबविण्यात येऊन ऑफलाइन प्रकरण निकाली काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिकचे तास कार्यालयात बसावे लागले. दाखल झालेल्या प्रकरणांची संख्या पाहता वेळेत काम पूर्ण होणार हे शक्य नसल्याचे सीईटीने अखेर पाच दिवसांची मुदत वाढवून देत २० तारखेपर्यंतची मुदत केली. तरीही पडताळणी समिती समोरील प्रकरणे कमी होत नसल्याने अखेरच्या दोन दिवसात कर्मचाऱ्यांना रात्र जागून कामकाज करावे लागले. आता केवळ पावतीही ग्राह्य धरणार असल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

--इन्फो--

यापूर्वी सीईटी सेलकडून लागलीच जातपडताळणीची मागणी केली जात नव्हती. त्यामुळे विद्यार्थीदेखील गाफील होते. मात्र सीईटी सेलच्या निर्णयामुळे एकच धावपळ झाली आणि विद्यार्थ्यांनी प्रकरणे दाखल करण्यासाठी पडताळणी कार्यालयांमध्ये गर्दी केली. त्यामुळे उर्वरित प्रकरणे बाजूला ठेवून २० तारखेची मुदत असलेली प्रकरणे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कामकाज केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना २० तारखेला रात्री ११ वाजेपर्यंत पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.