शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

सीईटी सेलने वाढवली जातपडताळणीची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:13 IST

नाशिक : अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सीईटी सेलने जातवैधता प्रमाणपत्र सक्तीचे केल्यामुळे असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी राज्यातील जातपडताळणी समितीच्या कार्यालयांमध्ये झालेल्या ...

नाशिक : अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी सीईटी सेलने जातवैधता प्रमाणपत्र सक्तीचे केल्यामुळे असे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी राज्यातील जातपडताळणी समितीच्या कार्यालयांमध्ये झालेल्या गर्दीने जातपडताळणी कार्यालयांची चांगलीच दमछाक झाली. निर्धारित वेळेत प्रमाणपत्र आवश्यक असल्यामुळे विद्यार्थीदेखील तगादा लावत असल्याच्या तणावाच्या परिस्थितीत या कार्यालयांना रात्रंदिवस कामकाज करावे लागले. आता मात्र पडताळणीसाठी कागदपत्रे जमा केल्याची पावतीही प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार असल्याचे सीईटी सेलने जाहीर केल असले तरी या आगोदरच्या निर्णयाने साऱ्यांचीच चांगलीच परवड झाली.

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा घेणाऱ्या सीईटी सेलने ऐनवेळी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातवैधता प्रमाणपत्र सक्तीचे केले. यासाठी जानेवारीपर्यंतीची मुदत देण्यात आली होती. प्रमाणपत्र नसेल तर विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागेल आणि त्यासाठीचे शुल्कदेखील भरण्याची वेळ येणार असल्याने विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातपडताळणी कार्यालयात धाव घेतली. प्रकरण सादर केल्यानंतर लगेचच पडताळणी प्रमाणपत्र मिळावे असा तगादा सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे कार्यालयावरील कामकाजाचा ताणही वाढत गेला.

जातपडताळणी समितीला दिवसरात्र काम करीत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करावी लागली. यासाठी ऑनलाइनची प्रकिया थांबविण्यात येऊन ऑफलाइन प्रकरण निकाली काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना अधिकचे तास कार्यालयात बसावे लागले. दाखल झालेल्या प्रकरणांची संख्या पाहता वेळेत काम पूर्ण होणार हे शक्य नसल्याचे सीईटीने अखेर पाच दिवसांची मुदत वाढवून देत २० तारखेपर्यंतची मुदत केली. तरीही पडताळणी समिती समोरील प्रकरणे कमी होत नसल्याने अखेरच्या दोन दिवसात कर्मचाऱ्यांना रात्र जागून कामकाज करावे लागले. आता केवळ पावतीही ग्राह्य धरणार असल्याने विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

--इन्फो--

यापूर्वी सीईटी सेलकडून लागलीच जातपडताळणीची मागणी केली जात नव्हती. त्यामुळे विद्यार्थीदेखील गाफील होते. मात्र सीईटी सेलच्या निर्णयामुळे एकच धावपळ झाली आणि विद्यार्थ्यांनी प्रकरणे दाखल करण्यासाठी पडताळणी कार्यालयांमध्ये गर्दी केली. त्यामुळे उर्वरित प्रकरणे बाजूला ठेवून २० तारखेची मुदत असलेली प्रकरणे प्रथम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी कामकाज केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना २० तारखेला रात्री ११ वाजेपर्यंत पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.