शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

नुकसानग्रस्तांना डावलून बोगस लाभार्थ्यांना विम्याचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST

पिंपरवाडी (यशवंतनगर) येथे बहुतेक शेतकऱ्यांनी भारती एक्सा कंपनीचा पीक विमा उतरवला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील बहुसंख्य ...

पिंपरवाडी (यशवंतनगर) येथे बहुतेक शेतकऱ्यांनी भारती एक्सा कंपनीचा पीक विमा उतरवला होता. ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, संबंधित कंपनीच्या एजंटने हितसंबंध जपत नुकसान नसलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. दुसरीकडे प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना या विम्याची तक्रार करूनही संबंधित कंपनीच्या विमा एजंटने पीक विम्यापासून वंचित ठेवले. त्यांची तातडीने चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी येथील शिष्टमंडळाने तहसीलदार कोताडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनाच्या प्रती आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा कृषी अधिकारी नाशिक, तालुका कृषी अधिकारी, कामगार तलाठी आदींना देण्यात आल्या आहेत. याप्रसंगी विजय गुरुळे, विष्णू गायकवाड, हरिभाऊ कापसे, नवनाथ गायकवाड, रवींद्र गुरुळे, संपत शिंदे, किरण शिंदे, पोपट गुरुळे, मंगेश काकड, सुधाकर काकड, सविता काकड, शिवाजी काकड, रघुनाथ शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

फोटो - २० सिन्नर फार्मर

पिंपरवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळावा, या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना शेतकरी.