शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

५५ लीटर पाण्यासाठी येणार ७८२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात ...

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात येत होती. मोदी सरकारने याच योजनेचे नाव बदलून आता राष्ट्रीय जलजीवन मिशन नावाने २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात सन २०२० पासून झाली असून, त्यात यापूर्वी प्रत्येक नागरिकाला त्याच्या दिवसभराची पाण्याची गरज ४४ प्रति लीटर धरण्यात आली होती. आता नवीन योजनेनुसार त्याची मर्यादा १५ लीटरने वाढविण्यात आली असून, यापुढे प्रत्येकाला ५५ लीटर पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन त्याची माहिती ऑनलाइन भरण्यात आलेली आहे. त्यात किती घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होतो व किती घरांना नळजोडणी नाही याची माहिती गोळा करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील १९२२ गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १६१४ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तर ३०८ गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. या गावांच्या सर्वेक्षणानुसार एक लाख, ९२ हजार ३९२ घरांमध्ये नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर पाच लाख, २१ लाख, ३८१ घरांमध्ये अद्यापही जोडणी नसल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेत एका वर्षात दोन लाख, २४ हजार घरांना जोडणी देण्यात आली असून, ते काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.

आगामी तीन वर्षांत चार लाख, ११ हजार ३२३ घरांना नळजोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी ७८२ कोटी २९ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच जलजीवन मिशन योजनेंतर्गंत तयार करण्यात आलेल्या आराखड्यास पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

=======

चौकट====

प्रत्येक घराला नळजोडणी व वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्बांधणी म्हणजेच जलकुंभांच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

---------

तालुकानिहाय नळजोडणी व येणारा खर्च

* बागलाण- १६५ (८०.६८)

* चांदवड- ७७ (३४.८७)

* देवळा- ४९ (२७.६६)

* दिंडोरी- १५७ (५१.७३)

* इगतपुरी- ११६ (४७.८३)

* कळवण- १५१ (६३.०४)

* मालेगाव- ४९ (३६.३८)

* नांदगाव- ६० (१२.५९)

* नाशिक- ७५ (३९.९०)

* निफाड- ११९ (७४.९३)

* पेठ- १४५ (४२.९७)

* सिन्नर- ८९ (११५.९३)

* सुरगाणा- १९१ (९२.७०)

* त्र्यंबक- ८८ (४५.१२)

* येवला- ८३ (१५.९६)

---------

जिल्ह्यातील एकूण गावे- १९२२

नळजोडणी नसलेली घरे- ५,२१,३८१

तीन वर्षात द्यावयाची जोडणी- ४,११,३२३

येणारा एकूण खर्च- ७८२.२९

--------