शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

५५ लीटर पाण्यासाठी येणार ७८२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात ...

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात येत होती. मोदी सरकारने याच योजनेचे नाव बदलून आता राष्ट्रीय जलजीवन मिशन नावाने २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात सन २०२० पासून झाली असून, त्यात यापूर्वी प्रत्येक नागरिकाला त्याच्या दिवसभराची पाण्याची गरज ४४ प्रति लीटर धरण्यात आली होती. आता नवीन योजनेनुसार त्याची मर्यादा १५ लीटरने वाढविण्यात आली असून, यापुढे प्रत्येकाला ५५ लीटर पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन त्याची माहिती ऑनलाइन भरण्यात आलेली आहे. त्यात किती घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होतो व किती घरांना नळजोडणी नाही याची माहिती गोळा करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील १९२२ गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १६१४ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तर ३०८ गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. या गावांच्या सर्वेक्षणानुसार एक लाख, ९२ हजार ३९२ घरांमध्ये नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर पाच लाख, २१ लाख, ३८१ घरांमध्ये अद्यापही जोडणी नसल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेत एका वर्षात दोन लाख, २४ हजार घरांना जोडणी देण्यात आली असून, ते काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.

आगामी तीन वर्षांत चार लाख, ११ हजार ३२३ घरांना नळजोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी ७८२ कोटी २९ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच जलजीवन मिशन योजनेंतर्गंत तयार करण्यात आलेल्या आराखड्यास पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

=======

चौकट====

प्रत्येक घराला नळजोडणी व वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्बांधणी म्हणजेच जलकुंभांच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

---------

तालुकानिहाय नळजोडणी व येणारा खर्च

* बागलाण- १६५ (८०.६८)

* चांदवड- ७७ (३४.८७)

* देवळा- ४९ (२७.६६)

* दिंडोरी- १५७ (५१.७३)

* इगतपुरी- ११६ (४७.८३)

* कळवण- १५१ (६३.०४)

* मालेगाव- ४९ (३६.३८)

* नांदगाव- ६० (१२.५९)

* नाशिक- ७५ (३९.९०)

* निफाड- ११९ (७४.९३)

* पेठ- १४५ (४२.९७)

* सिन्नर- ८९ (११५.९३)

* सुरगाणा- १९१ (९२.७०)

* त्र्यंबक- ८८ (४५.१२)

* येवला- ८३ (१५.९६)

---------

जिल्ह्यातील एकूण गावे- १९२२

नळजोडणी नसलेली घरे- ५,२१,३८१

तीन वर्षात द्यावयाची जोडणी- ४,११,३२३

येणारा एकूण खर्च- ७८२.२९

--------