शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

५५ लीटर पाण्यासाठी येणार ७८२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात ...

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात येत होती. मोदी सरकारने याच योजनेचे नाव बदलून आता राष्ट्रीय जलजीवन मिशन नावाने २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात सन २०२० पासून झाली असून, त्यात यापूर्वी प्रत्येक नागरिकाला त्याच्या दिवसभराची पाण्याची गरज ४४ प्रति लीटर धरण्यात आली होती. आता नवीन योजनेनुसार त्याची मर्यादा १५ लीटरने वाढविण्यात आली असून, यापुढे प्रत्येकाला ५५ लीटर पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन त्याची माहिती ऑनलाइन भरण्यात आलेली आहे. त्यात किती घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होतो व किती घरांना नळजोडणी नाही याची माहिती गोळा करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील १९२२ गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १६१४ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तर ३०८ गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. या गावांच्या सर्वेक्षणानुसार एक लाख, ९२ हजार ३९२ घरांमध्ये नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर पाच लाख, २१ लाख, ३८१ घरांमध्ये अद्यापही जोडणी नसल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेत एका वर्षात दोन लाख, २४ हजार घरांना जोडणी देण्यात आली असून, ते काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.

आगामी तीन वर्षांत चार लाख, ११ हजार ३२३ घरांना नळजोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी ७८२ कोटी २९ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच जलजीवन मिशन योजनेंतर्गंत तयार करण्यात आलेल्या आराखड्यास पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

=======

चौकट====

प्रत्येक घराला नळजोडणी व वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्बांधणी म्हणजेच जलकुंभांच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

---------

तालुकानिहाय नळजोडणी व येणारा खर्च

* बागलाण- १६५ (८०.६८)

* चांदवड- ७७ (३४.८७)

* देवळा- ४९ (२७.६६)

* दिंडोरी- १५७ (५१.७३)

* इगतपुरी- ११६ (४७.८३)

* कळवण- १५१ (६३.०४)

* मालेगाव- ४९ (३६.३८)

* नांदगाव- ६० (१२.५९)

* नाशिक- ७५ (३९.९०)

* निफाड- ११९ (७४.९३)

* पेठ- १४५ (४२.९७)

* सिन्नर- ८९ (११५.९३)

* सुरगाणा- १९१ (९२.७०)

* त्र्यंबक- ८८ (४५.१२)

* येवला- ८३ (१५.९६)

---------

जिल्ह्यातील एकूण गावे- १९२२

नळजोडणी नसलेली घरे- ५,२१,३८१

तीन वर्षात द्यावयाची जोडणी- ४,११,३२३

येणारा एकूण खर्च- ७८२.२९

--------