शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

५५ लीटर पाण्यासाठी येणार ७८२ कोटी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात ...

गेल्या दहा वर्षांपासून केंद्र सरकारकडून प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पुरेसे पाणी मिळावे यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गंत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात येत होती. मोदी सरकारने याच योजनेचे नाव बदलून आता राष्ट्रीय जलजीवन मिशन नावाने २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे ठरविले आहे. त्याची सुरुवात सन २०२० पासून झाली असून, त्यात यापूर्वी प्रत्येक नागरिकाला त्याच्या दिवसभराची पाण्याची गरज ४४ प्रति लीटर धरण्यात आली होती. आता नवीन योजनेनुसार त्याची मर्यादा १५ लीटरने वाढविण्यात आली असून, यापुढे प्रत्येकाला ५५ लीटर पाणी देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना देऊन त्याची माहिती ऑनलाइन भरण्यात आलेली आहे. त्यात किती घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा होतो व किती घरांना नळजोडणी नाही याची माहिती गोळा करण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील १९२२ गावांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार १६१४ गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तर ३०८ गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. या गावांच्या सर्वेक्षणानुसार एक लाख, ९२ हजार ३९२ घरांमध्ये नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर पाच लाख, २१ लाख, ३८१ घरांमध्ये अद्यापही जोडणी नसल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार गेल्या वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेत एका वर्षात दोन लाख, २४ हजार घरांना जोडणी देण्यात आली असून, ते काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे.

आगामी तीन वर्षांत चार लाख, ११ हजार ३२३ घरांना नळजोडणीचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी ७८२ कोटी २९ लाख रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच जलजीवन मिशन योजनेंतर्गंत तयार करण्यात आलेल्या आराखड्यास पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे.

=======

चौकट====

प्रत्येक घराला नळजोडणी व वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या पाणीपुरवठा योजनांची पुनर्बांधणी म्हणजेच जलकुंभांच्या क्षमतेत वाढ करण्याबरोबरच नवीन पाण्याचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

---------

तालुकानिहाय नळजोडणी व येणारा खर्च

* बागलाण- १६५ (८०.६८)

* चांदवड- ७७ (३४.८७)

* देवळा- ४९ (२७.६६)

* दिंडोरी- १५७ (५१.७३)

* इगतपुरी- ११६ (४७.८३)

* कळवण- १५१ (६३.०४)

* मालेगाव- ४९ (३६.३८)

* नांदगाव- ६० (१२.५९)

* नाशिक- ७५ (३९.९०)

* निफाड- ११९ (७४.९३)

* पेठ- १४५ (४२.९७)

* सिन्नर- ८९ (११५.९३)

* सुरगाणा- १९१ (९२.७०)

* त्र्यंबक- ८८ (४५.१२)

* येवला- ८३ (१५.९६)

---------

जिल्ह्यातील एकूण गावे- १९२२

नळजोडणी नसलेली घरे- ५,२१,३८१

तीन वर्षात द्यावयाची जोडणी- ४,११,३२३

येणारा एकूण खर्च- ७८२.२९

--------