शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

विद्यार्थी गळतीचे प्रमाण अवघे चार टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 18:10 IST

नंदुरबार : जिल्ह्यात प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी गळतीचे आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. परंतु जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक शाळांमधील ...

नंदुरबार : जिल्ह्यात प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी गळतीचे आणि शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक आहे. परंतु जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक शाळांमधील गळतीचे प्रमाण अवघे ४.२ टक्के आहे. उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे माध्यमिक शाळांमध्ये मात्र, शिक्षणाचे प्रमाण अगदीच कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ३५ उर्दू प्राथमिक शाळांपैकी २५ शाळा डिजीटल करण्यात आल्या असून व्हर्च्यूअल लर्निंगला प्राधान्य दिले जात आहे.जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण दर्जेदार व्हावे यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यात अल्पसंख्याक असलेल्या उर्दू प्राथमिक शाळा देखील मागे नसल्याची स्थिती आहे. पालिका आणि जिल्हा परिषदेअंतर्गत उर्दू शाळा चालविल्या जातात. त्यांच्यातील विद्यार्थी संख्या देखील समाधानकारक आहे. परंतु प्राथमिक शाळेतून माध्यमिकला गेल्यानंतर विद्यार्थी संख्या अगदीच रोडावते. असे विद्यार्थी स्वयंरोजगाराला प्राधान्य देवून आपल्या कुटूंबाला हातभार लावत असल्याचे सर्व्हेक्षण देखील यापूर्वी करण्यात आलेले आहे.जिल्ह्यात उर्दू माध्यमाच्या एकुण ३५ शाळा आहेत. या सर्वच शाळांमध्ये दर्जेदार आणि चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केला जातो. विशेष म्हणजे लोकसहभाग देखील घेतला जातो. त्यामुळे २५ शाळा या डिजीटल झालेल्या आहेत. उर्वरित शाळा देखील लवकरच डिजीटल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय उर्दू की तालीमी संदूक या शैक्षणिक साहित्य विषयक पेटी वापरण्याचे प्रशिक्षण सर्व उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांना देण्यात आले आहे. उर्दू शाळांसाठी १०० टक्के मुलभूत वाचन क्षमता कार्यक्रमचा पहिल्या टप्प्याची देखील अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आयोजित करून साहित्य निर्मिती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे स्थलांतर १०० टक्के रोखण्यात आले आहे. रिक्त पदाची संख्या ही नेहमीच डोकेदुखी ठरली आहे.जिल्ह्यातील या शाळांमध्ये गणितत व विज्ञान विषयाची रिक्त पदे देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. एकुण १७ पदे रिक्त असून पवित्र प्रणालीमध्ये पद भरण्यासाठी मागणी करण्यात आली आहे. गुणवत्ता सुधारसाठी देखील विविध माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यांना देखील बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.