शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

बर्ड फ्ल्यूसाठी सहा पथके कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण नसली तरी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूची लागण नसली तरी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यासाठी सहा पथके तालुका स्तरावर कार्यरत आहेत. जिल्ह्यात दोन ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. परंतु, त्यांचा मृत्यू हा विविध कारणांनी झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बर्ड फ्ल्यूची कुठलीही लक्षणे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले   आहे.जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरवड्यापासून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या दरम्यान प्रकाशा व रायसिंगपूर (ता. अक्कलकुवा) याठिकाणी कावळे मरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. पशुचिकित्सा विभागाने मृत कावळ्यांचे शवविच्छेदन केले असता, त्यांचा मृत्यू जखमा झाल्याने व इतर कारणाने झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी जिल्हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने स्थलांतरित पक्षी, कोंबडी यांच्यावर विशेष नजर ठेवली जात   आहे.२००६मधील बर्ड फ्ल्यूने नवापूर येथील पोल्ट्री उद्योगाचे कंबरडेच मोडले होते. उद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. लाखो कोंबड्या मारून पुराव्या लागल्या. लाखो अंडी नष्ट करावी लागली. त्यानंतर हा उद्योग अद्यापही पुरेशा प्रमाणात उभा राहू शकलेला नाही. पोल्ट्री हब म्हणून राज्यात नवापूरचे नाव अग्रभागी होते. ३०पेक्षा अधिक पोल्ट्री येथे होत्या. एका पोल्ट्रीमध्ये किमान एक लाख व जास्तीत जास्त दोन लाख पक्षी अर्थात कोंबड्या होत्या. अर्थात जवळपास ५० ते ६० लाख कोंबड्या, त्यापासून मिळणारी अंडी हे पाहता कोट्यवधींचा टर्नओव्हर त्यातून होत होता. सद्यस्थितीत केवळ १३ पोल्ट्री याठिकाणी आहेत. जवळपास १८ ते २० लाख कोंबड्या त्यामध्ये आहेत. जिल्ह्याचा विचार करता, जवळपास ७० पोल्ट्री उद्योग आहेत. त्यातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असते.बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. राज्य शासनाच्या कृती आराखड्यांतर्गत तालकुा स्तरावर सहा पथके व जिल्हा स्तरावर एक अशी सात पथके तयार केली आहेत. प्रत्येक पथकात पशुधन अधिकारीपासून इतर कर्मचारी आहेत. त्यांना शासनाच्या कृती आराखड्याचे दोनवेळा प्रशिक्षण दिले गेले आहे.