शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
2
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
3
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
4
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
5
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
6
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
7
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
8
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
9
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
10
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
11
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
12
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
13
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
14
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
16
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
17
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
18
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
19
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
20
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल

लेटरपॅड चोरीचा बनाव रचून दिशाभूल करणाऱ्या रघुवंशींविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवा- प्रा.चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

माजी आमदार रघुवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर आरोपांची तोफ डागण्यात आली. यात प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांच्याकडून ...

माजी आमदार रघुवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर आरोपांची तोफ डागण्यात आली. यात प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रकानुसार माजी आमदार रघुवंशी हे जनतेची दिशाभूल करीत असतात. जनतेच्या नजरेत धूळफेक करून जे त्यांच्याकडे नाही, ते दातृत्व दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. ग्रामपंचायतींना निधी मिळवून देण्याच्या बढाईखोर आवाहनाने त्यांचा हा बुरखा फाटला आहे. बिनविरोध निवडून येईल, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत जनसुविधा योजनेतून १५ लाख रुपयांचा निधी मिळवून देऊ, अशी घोषणा त्यांनी १५ दिवसांपूर्वी केली होती. १ जानेवारी, २०२१ अशी तारीख घातलेल्या रघुवंशी यांच्याच लेटर हेडवर अधिकृतपणे हे आवाहन करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त सर्वत्र छापून आले होते. यावर भाजपचे नगरपालिकेतील विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर श्यामराव पाटील यांनी राजभवनात तक्रार केल्यानंतर या प्रकाराची सत्यता समोर आली आहे. त्यांनी राजभवनात दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना आणि निवडणूक प्रक्रिया सुरू असताना, १५ लाख रुपये निधीचे प्रलोभन दाखविणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. माजी आमदार रघुवंशी हे जिल्हा परिषद सभागृह अथवा डीपीडीसीचे सदस्य नसल्याने, त्यांना अशी घोषणा करण्याचे अधिकार नसतानाही निधी मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले, शिवाय राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला. या सर्व कारणाने रघुवंशी यांच्याविरोधात आचारसंहिता भंग करणे, राजमुद्रेचा गैरवापर करणे, तसेच कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना प्रलोभन दाखवून बेकायदेशीर वर्तन करणे, याविषयी चौकशी होऊन गुन्हा दाखल केला जावा, अशीही मागणी आहे. आता राजभवनातून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. यातून चंद्रकांत रघुवंशी यांचे धाबे दणाणले आहेत. ती चूक झाकण्यासाठी व आपला खोटारडेपणा लपवण्यासाठी आता ते कांगावा करत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करावी, अशी मागणीही प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांनी केली आहे. या संबंधीचे सर्व पुरावे समोर आणून रघुवंशींचा खोटारडेपणा जनतेसमोर आणला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.