शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
3
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
4
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
5
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
6
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक
7
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
8
एपीएमसीच्या १७९ एकर जमिनीवर कोणाचा डोळा? नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट हलणार?
9
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
10
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
11
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
12
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
13
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
14
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
15
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
16
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
17
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
18
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
19
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
20
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...

शेतकरी, कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाचा काँग्रेसतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाचा काँग्रेसतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध करण्यात आला. गांधींजींना आदरांजली अर्पण करून नंतर हुतात्मा स्मारकात धरणे धरण्यात आले. यावेळी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते.भाजप सरकारच्या शेतकरी, कामगार कायदे व इतर धोरणांचा निषेध म्हणून गांधी जयंतीदिनी हे आंदोलन झाले. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, आमदार शिरिष नाईक, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, सुहास नाईक, देवमन पवार, पंडितराव पवार, राजेंद्र पाटील, देवा चौधरी, रऊफ शाह आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलतांना पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केंद्र सरकार हे भांडवालदारांना पाठीशी घालणारे आणि शेतकरी, कामगारांना उघड्यावर आणणारे सरकार आहे. सामान्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय या सरकारने घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने जाऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मोदी सरकारने शेती आणि शेतकरी यांच्या विरोधात षडयंत्र रचले आहे. तीन काळ्या कायद्याच्या माध्यमातून देशातील हरीतक्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे एक मोठे षडयंत्र आहे. देशातील ६२कोटी शेतकरी, कामगार व २५० पेक्षा अधीक शेतकरी संघटना या काळ्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. पण पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार या आवाजाकडे दुर्लक्ष करून देशाची दिशाभूल करीत आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणे तर दुरच शेतकºयांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्यांचा आवाजही बंद केला आहे. शेतकºयांवर लाठीमार करून त्यांना वेठीस धरले जात आहे. बहुमताच्या जोरावर तीन काळे कायदे मंजूर करून घेतले असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.