शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात जिल्ह्यात तीन कोटी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोस्टल विभागाने सुरू केलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागात अडकून पडलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोस्टल विभागाने सुरू केलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेकडून लाॅकडाऊन काळात ग्रामीण भागात अडकून पडलेल्या नागरिकांना मोठे सहाय्य केले आहे. जिल्ह्यात पोस्ट बँकेचे एकूण ५३ हजार खातेदार असून, या खातेदारांना ३ कोटी रुपयांचे वाटप मे महिन्यापासून अविरत करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोस्ट पेमेंट बँकेचे मुख्यालय नवापूर येथे करण्यात आले आहे. याठिकाणी पोस्ट खात्याकडून खाती काढण्यात आलेल्या ५३ हजार ग्राहकांच्या खात्यांचे कामकाज करण्यात येते. प्रत्यक्षात घरापर्यंत पोहोचणा-या पोस्टमनच्या आधारे हे कामकाज सुरू करण्यात आले आहे. पोस्टमनकडे असलेल्या मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करून देत घरोघरी असलेल्या खातेधारकांना घरी जावून त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. पैसे काढण्याची मागणी, शासनाकडून आलेले पैसे आदीप्रकारे हे कामकाज करण्यात आले आहे. जिल्ह्यात पोस्ट बँकेचे प्रमुख खातेदार हे ग्रामीण भागातील नागरिक, मातृवंदना योजनेच्या महिला लाभार्थी, शालेय विद्यार्थी, आदिवासी आश्रमशाळांचे विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक महाविद्यालयीन विद्यार्थी, रोजगार हमी योजनेत काम करणारे मजूर यासह विविध निराधार योजनांचे लाभार्थी आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे या नागरिकांना घराबाहेर न पडता आल्याने तसेच शहरी भागातील बँकांमध्ये येणे शक्य नसल्याने त्यांना घरपोच पैसे देण्यात आले. तब्बल चार महिने खातेदारांना वेळेवर घरी पैसे पोहोचवण्यासाठी पोस्टमन मेहनत घेत होते. नंदुरबार जिल्ह्यातील १३ पोस्टल बिटमधून हे कामकाज सुरू होते. अद्यापही निराधार व शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना या पोस्ट पेमेंट बँकेचा मोठा आधार आहे. पोस्टमनची संख्या कमी असली तरीही वेळेवर रक्कम पोहोचती करण्यासाठी परिश्रम घेतले जात असल्याची माहिती पोस्ट खात्याकडून देण्यात आली आहे. पोस्टल बँकेत दर दिवशी खाते काढणाऱ्यांची संख्याही वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे.गुजरातमध्ये अडकलेल्यांना करता आली मदत पोस्ट पेमेंट बँकेमुळे शहरी भागातील बँकांमध्ये होणारी गर्दी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लाॅकडाऊनमध्ये थेट घरपोच पोस्टमन जात असल्याने या योजनेची विश्वासार्हता वाढली. बाहेरगावी असलेल्यांनाही यातून पैसे पाठवणे शक्य असल्याने गुजरातसह महाराष्ट्रातील विविध भागात अडकून पडलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी, तसेच त्यांना किमान पैसे पाठवण्यात पोस्ट बँकेचा मोठा हातभार आहे. या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून गुजरातमध्ये कामासाठी गेलेल्या व लाॅकडाऊनमुळे उपासमार झेलणाऱ्या अनेकांना पैसे पाठवण्यात येथील ग्रामस्थांना यश आले होते.  

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि डीबीटीची रक्कम घरपोच आदिवासी विद्यार्थ्यांना मंजूर झालेली शिष्यवृत्ती पोस्ट बँकेकडून प्राप्त करता आली. प्रामुख्याने परीक्षा आटोपून घराकडे जाण्यासाठी पैसे नसल्याने ही बँक कामी आली होती. डीबीटीची थकीत रक्कमही या बँकेच्या माध्यमातून अनेकांना गावी मिळाल्याचे सांगण्यात आले.

निराधारांना लाभ झालाजिल्ह्यातील ५३ हजार खातेधारकांना या बँकेचा मोठा लाभ झाला. ट्रान्सफर केलेले पैसे थेट घरपोच जात होते. दुर्गम व अती दुर्गम भागापर्यंत पोस्टमन जात असल्याने विविध योजनांची जमा झालेली रक्कम माता व निराधार वृद्धांना मिळाली. मजूरांना मजूरी प्राप्त झाली.  - बी.एस.जाेशी, पोस्टमास्टर, नंदुरबार. डाक कार्यालय.