शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

माझी कन्या भाग्यश्री योजनेतून अवघ्या 45 मुलींना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना गेल्या दोन वर्षापासून सुरू केली असली तरी या दोन वर्षात संपूर्ण जिल्ह्यात 45 मुलींनाच आजतागायत लाभ मिळाला आहे. योजनेबाबत पालक अनभिज्ञ असल्यामुळे योजनेलाही समाधानकारक प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे संबंधीत प्रशासनाने गाव पातळीवर जनजागृती करण्याची अपेक्षा आहे.लिंग निवडीस प्रतिबंध घालून मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे याशिवाय त्यांचा आरोग्याचा दर्जा वाढवावा. यासाठी राज्यशासनाने सुकन्या योजनेच्या धर्तीवरच माझी सुकन्या भाग्यश्री ही योजना सन 2017 मध्ये सुरू केली आहे. या योजनेंतर्गत समाजातील साडेसात लाख रुपये उत्पन्न असणा:या सर्व पालकांना त्याचा लाभ देण्यात येतो.  या कुटुंबास एक किंवा दोन मुली असणे अपेक्षित आहे. या दोनच मुलींवर संबंधीत आई-वडीलांनी दोघांपैकी एकाचा संतती नियमनाची शस्त्रक्रियाचा दाखला आवश्यक आहे. अशाच लाभार्थी पात्र ठरतात. ज्या पालकांना एक मुलगी असेल तिच्या नावावर शासन 50 हजार तर दुसरी मुलगी असेल तिच्या नावावर 25 हजार अशी फिक्स डिपॉझीट महाराष्ट्र बँकेत आई व मुलीच्या संयुक्त बँकेत शासन ठेवत असते. ही मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती रक्कम काढता येते. शासनाच्या या चांगल्या योजनेमुळे निश्चितच मुलींच्या आई-वडीलांना आर्थिक मदत होऊन काळजीदेखील कमी होणार आहे. तथापि या योजनेला नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत अल्पप्रतिसाद अशा पालकांकडून मिळत असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या दोन वर्षात केवळ 45 मुलींनाच योजनेचा फायदा मिळाला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार व नवापूर वगळता तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तीन आदिवासी तालुक्यांमध्ये तर लाभाथ्र्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. तळोद्यात दोनच लाभाथ्र्याना लाभ मिळाला आहे. अक्कलकुवा एक तर धडगावात एकही लाभार्थी उपलब्ध झालेला नाही.शहादा हा पुढारलेला तालुका असतांना तेथेही दहाच लाभाथ्र्यानी योजनेचा लाभ घेतला आहे. यंदा तर एकही लाभार्थीचा प्रस्ताव त्या-त्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडे दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक योजना अतिशय चांगली आहे. मात्र तिच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी प्रकल्प कार्यालयांना लाभार्थीच  मिळत नसल्याचे चित्र आहे. बालविकास प्रकल्पांचा जनजागृतीचा दावा केला जात असला तरी ग्रामीण भागात या योजनेबाबत पालक अन्भिज्ञ असल्याचे म्हटले जात         आहे. जिल्हा परिषद व एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत ही योजना राबविली जात असल्याने या दोन्ही यंत्रणांनी गाव-पातळीवर जावून अशा पालकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. तरच योजनेस चांगला प्रतिसाद लाभून शासनाचा मुळहेतूदेखील सफल होईल. मात्र यासाठी दोन्ही यंत्रांनी उदासिनता झटकण्याची गरज आहे. दोन वर्षात या योजनेतून 22 हजार 50 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

तालुके    लाभार्थी संख्या वर्ष               2017-18    2018-19नंदुरबार    07    06शहादा     06    05नवापूर     06    07तळोदा      00    02

अक्कलकुवा    00  01धडगाव    00    00एकूण    19    21