शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
5
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
6
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
7
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
8
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
9
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
10
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
11
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
12
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
13
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
14
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
15
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
16
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
17
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
18
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
19
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
20
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू

माझी कन्या भाग्यश्री योजनेतून अवघ्या 45 मुलींना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना गेल्या दोन वर्षापासून सुरू केली असली तरी या दोन वर्षात संपूर्ण जिल्ह्यात 45 मुलींनाच आजतागायत लाभ मिळाला आहे. योजनेबाबत पालक अनभिज्ञ असल्यामुळे योजनेलाही समाधानकारक प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे संबंधीत प्रशासनाने गाव पातळीवर जनजागृती करण्याची अपेक्षा आहे.लिंग निवडीस प्रतिबंध घालून मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे याशिवाय त्यांचा आरोग्याचा दर्जा वाढवावा. यासाठी राज्यशासनाने सुकन्या योजनेच्या धर्तीवरच माझी सुकन्या भाग्यश्री ही योजना सन 2017 मध्ये सुरू केली आहे. या योजनेंतर्गत समाजातील साडेसात लाख रुपये उत्पन्न असणा:या सर्व पालकांना त्याचा लाभ देण्यात येतो.  या कुटुंबास एक किंवा दोन मुली असणे अपेक्षित आहे. या दोनच मुलींवर संबंधीत आई-वडीलांनी दोघांपैकी एकाचा संतती नियमनाची शस्त्रक्रियाचा दाखला आवश्यक आहे. अशाच लाभार्थी पात्र ठरतात. ज्या पालकांना एक मुलगी असेल तिच्या नावावर शासन 50 हजार तर दुसरी मुलगी असेल तिच्या नावावर 25 हजार अशी फिक्स डिपॉझीट महाराष्ट्र बँकेत आई व मुलीच्या संयुक्त बँकेत शासन ठेवत असते. ही मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती रक्कम काढता येते. शासनाच्या या चांगल्या योजनेमुळे निश्चितच मुलींच्या आई-वडीलांना आर्थिक मदत होऊन काळजीदेखील कमी होणार आहे. तथापि या योजनेला नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत अल्पप्रतिसाद अशा पालकांकडून मिळत असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या दोन वर्षात केवळ 45 मुलींनाच योजनेचा फायदा मिळाला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार व नवापूर वगळता तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तीन आदिवासी तालुक्यांमध्ये तर लाभाथ्र्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. तळोद्यात दोनच लाभाथ्र्याना लाभ मिळाला आहे. अक्कलकुवा एक तर धडगावात एकही लाभार्थी उपलब्ध झालेला नाही.शहादा हा पुढारलेला तालुका असतांना तेथेही दहाच लाभाथ्र्यानी योजनेचा लाभ घेतला आहे. यंदा तर एकही लाभार्थीचा प्रस्ताव त्या-त्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडे दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक योजना अतिशय चांगली आहे. मात्र तिच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी प्रकल्प कार्यालयांना लाभार्थीच  मिळत नसल्याचे चित्र आहे. बालविकास प्रकल्पांचा जनजागृतीचा दावा केला जात असला तरी ग्रामीण भागात या योजनेबाबत पालक अन्भिज्ञ असल्याचे म्हटले जात         आहे. जिल्हा परिषद व एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत ही योजना राबविली जात असल्याने या दोन्ही यंत्रणांनी गाव-पातळीवर जावून अशा पालकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. तरच योजनेस चांगला प्रतिसाद लाभून शासनाचा मुळहेतूदेखील सफल होईल. मात्र यासाठी दोन्ही यंत्रांनी उदासिनता झटकण्याची गरज आहे. दोन वर्षात या योजनेतून 22 हजार 50 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

तालुके    लाभार्थी संख्या वर्ष               2017-18    2018-19नंदुरबार    07    06शहादा     06    05नवापूर     06    07तळोदा      00    02

अक्कलकुवा    00  01धडगाव    00    00एकूण    19    21