शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
5
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
6
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
7
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
8
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
9
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
10
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
11
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
12
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
13
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
14
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
15
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
16
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
17
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
18
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
19
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
20
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले

जून ते सप्टेंबर दरम्यान ३५ हजार शेतकर्यांच्या १५ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 13:10 IST

भूषण रामराजे  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जून ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील ३५ हजार शेतकर्यांच्या १५ हजार हेक्टर ...

भूषण रामराजे लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जून ते सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील ३५ हजार शेतकर्यांच्या १५ हजार हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून १० कोटी रूपयांची नुकसान भरपाई प्रस्तावित करण्यात आली आहे.  गेल्या वर्षाची अतीवृष्टी, लांबलेला कापूस आणि त्याची विक्री सुरू होत नाही तोच आलेला कोरोना यातून सावरलेला शेतकरी पुढे निघाला असताना पुन्हा पावसाने जोर लावत नुकसान केले आहे. या नुकसानीने शेतकरी कोलमडले असून शासनाने पंचनामे केल्याने भरपाईची प्रतिक्षा आहे. 

सोयाबीनचे  नुकसान यंदाच्या वर्षात सोयाबीन व ज्वारी पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती आहे. यात सोयाबीनचे सर्व सहा तालुक्यात १ हजार ९४० हेक्टर तर ज्वारीचे २ हजार २५४ हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे. कडधान्य पिकांचे यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक ६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. 

१५ हजार शेतकरी बाधितजून ते सप्टेंबर या काळात झालेल्या पावसामुळे ३५ हजार ९०९ शेतकर्यांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. एकूण १५ हजार ५३५ हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे हे नुकसान झाले असून या नुकसानीच्या भरपाई पोटी १० कोटी ९० लाख रूपयांची भरपाई प्रस्तावित असून आयुक्ताकडे प्रस्ताव दिला गेला आहे. 

धडगाव व नवापूरात नुकसान जून ते सप्टेबर या काळात नंदुरबार तालुक्यात ६०२, नवापूर ५ हजार ५५१, अक्कलकुवा २ हजार ५९९, शहादा १ हजार २१८, तळाेदा ३३५ तर धडगाव तालुक्यात ५ हजार २२६ हेक्टर नुकसान झाले आहे. नवापूर तालुक्यात ७०० हेक्टर भात तर धडगाव तालुक्यात मूूग व उडीद पिकांचे सर्वाधिक नुकसान आहे.